शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

देवळा तालुका दुष्काळी जाहीर करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 18:56 IST

पावसाळ्याचे तीन महीने उलटत आले तरी देवळा तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. नदी-नाले, विहीरी कोरड्या झाल्याने शेती व पिण्याच्या पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे.

उमराणे : पावसाळ्याचे तीन महीने उलटत आले तरी देवळा तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. नदी-नाले, विहीरी कोरड्या झाल्याने शेती व पिण्याच्या पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. देवळा तालुका दुष्काळी जाहीर करण्यात यावा अशी मागणी जाणता राजा मित्र मंडळाने तहसिलदार दत्तात्रय शेजवळ यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली.  तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, यावर्षी पावसाळा उशीरा सुरु झाला. थोड्याफार प्रमाणात झालेल्या पावसाच्या पाण्यावर शेतकऱ्यांनी पेरणी केली. पेरणीनंतर तब्बल दीड महीना पावसाने दडी मारल्याने खरीपातील मका, बाजरी, मुग, भुईमूग पीके करपली आहेत. मध्यंतरी पावसाने हजेरी लावल्याने पीके कशीतरी तग धरु लागली. संपूर्ण देवळा तालुक्यात पाऊस बेपत्ता झाल्याने खरीप हंगाम वाया जाणार असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे तालुक्यातील बळीराजा धास्तावला आहे. जोरदार पावसा अभावी विहिरींना पाणी नाही. गेल्या पाच वर्षापासून सततच्या अवर्षणग्रस्त परीस्थिती मुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. तालुक्यातील पूर्व भागातील उमराणे परीसरातील आठ गावांची स्थिती वाळवंटा सारखी झाली आहे. खरीप हातचा गेला व रब्बी हंगामाची शास्वती न उरल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. शासनाने देवळा तालुका तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी मंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे, हेमंत देवरे, उमेश देवरे, बाळा पवार, गोरख देवरे, सुनिल देवरे, पंकज देवरे, दत्तु देवरे , योगेश देवरे, यशवंत देवरे, आबा देवरे आदीसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :droughtदुष्काळTahasildarतहसीलदार