शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
6
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
7
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
8
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
9
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
10
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
11
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
12
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
13
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
14
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
15
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
16
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
17
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
18
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
19
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
20
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...

देवळा तालुका दुष्काळी जाहीर करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 18:56 IST

पावसाळ्याचे तीन महीने उलटत आले तरी देवळा तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. नदी-नाले, विहीरी कोरड्या झाल्याने शेती व पिण्याच्या पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे.

उमराणे : पावसाळ्याचे तीन महीने उलटत आले तरी देवळा तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. नदी-नाले, विहीरी कोरड्या झाल्याने शेती व पिण्याच्या पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. देवळा तालुका दुष्काळी जाहीर करण्यात यावा अशी मागणी जाणता राजा मित्र मंडळाने तहसिलदार दत्तात्रय शेजवळ यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली.  तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, यावर्षी पावसाळा उशीरा सुरु झाला. थोड्याफार प्रमाणात झालेल्या पावसाच्या पाण्यावर शेतकऱ्यांनी पेरणी केली. पेरणीनंतर तब्बल दीड महीना पावसाने दडी मारल्याने खरीपातील मका, बाजरी, मुग, भुईमूग पीके करपली आहेत. मध्यंतरी पावसाने हजेरी लावल्याने पीके कशीतरी तग धरु लागली. संपूर्ण देवळा तालुक्यात पाऊस बेपत्ता झाल्याने खरीप हंगाम वाया जाणार असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे तालुक्यातील बळीराजा धास्तावला आहे. जोरदार पावसा अभावी विहिरींना पाणी नाही. गेल्या पाच वर्षापासून सततच्या अवर्षणग्रस्त परीस्थिती मुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. तालुक्यातील पूर्व भागातील उमराणे परीसरातील आठ गावांची स्थिती वाळवंटा सारखी झाली आहे. खरीप हातचा गेला व रब्बी हंगामाची शास्वती न उरल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. शासनाने देवळा तालुका तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी मंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे, हेमंत देवरे, उमेश देवरे, बाळा पवार, गोरख देवरे, सुनिल देवरे, पंकज देवरे, दत्तु देवरे , योगेश देवरे, यशवंत देवरे, आबा देवरे आदीसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :droughtदुष्काळTahasildarतहसीलदार