शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

दररोज पाच वीज ग्राहकांच्या जोडण्या तोडण्याचे फर्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 1:53 AM

थकीत वीज बिल वसुलीसाठी महावितरण कंपनीने अधिक कठोर निर्णय घेत वीज ग्राहकांसह आपल्या कर्मचाऱ्यांनाही वेठीस धरले असून, तसे फर्मानच महावितरणने काढले आहे. दररोज किमान पाच थकबाकीदार ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्याची सक्ती कर्मचाऱ्यांवर करण्यात आली आहे,

नाशिक : थकीत वीज बिल वसुलीसाठी महावितरण कंपनीने अधिक कठोर निर्णय घेत वीज ग्राहकांसह आपल्या कर्मचाऱ्यांनाही वेठीस धरले असून, तसे फर्मानच महावितरणने काढले आहे. दररोज किमान पाच थकबाकीदार ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्याची सक्ती कर्मचाऱ्यांवर करण्यात आली आहे, तर वीजपुरवठा तोडण्याची कोणतीही लेखी नोटीस ग्राहकांना देण्यात येणार नसल्याची भूमिका घेतल्यामुळेही महावितरणचा हा निर्णय सुलतानी फतवा असल्याची टीका होऊ लागली आहे.सातत्याने विस्कळीत होणारा वीजपुरवठा आणि चुकीच्या वीज बिलांमुळे सोसावा लागणारा आर्थिक भुर्दंड यासारख्या प्राथमिक पातळीवरील अडचणींचे आजतागायत निवारण होऊ शकलेले नसताना थकीत वीज बिल वसुलीसाठी मात्र महावितरणकडून नेहमीच सक्तीची भूमिका घेतली जाते. यंदा तर महावितरणने कळसच गाठला आहे. ग्राहकांना त्यांचे म्हणणे मांडण्याची कोणतीही संधी न देता थेट वीजजोडणी तोडण्याचा इशारा देण्यात आला आहे. थकबाकीदार असतानाही वेळेत वीज बिल भरले नसेल आणि वारंवार बिल भरण्याच्या सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असेल तर अशा ग्राहकांना पूर्व सूचना न देता वीजपुरवठा खंडित केला जाणार असल्याचे महावितरणे म्हटले आहे. विशेष म्हणजे वीजपुरवठा खंडित करताना वायरमनला दमदाटी, शिवीगाळ, हाणामारीचे प्रकार केले किंवा धमकी दिली तरी कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा महावितरणने दिला आहे.थकबाकीदार ग्राहकांपैकी किमान पाच ग्राहकांची वीजजोडणी दररोज तोडण्याची सक्ती महावितरणच्या कर्मचाºयांना करण्यात आली आहे. थकबाकीदार ग्राहकांची यादी हातात आल्यानंतर कर्मचाºयाने संबंधीतील यादीतील पाच ग्राहक निवडून त्यांची वीजजोडणी खंडित करणे बंधनकारक केले आहे. तसे केले नाही तर कर्मचाºयांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहक हिताचे सर्व नियम मोडून ग्राहकांवर मनमानी करण्याचा हा प्रकार असल्याच्या संतप्त भावना ग्राहकांमध्ये उमटत आहेत.मागील महिन्यात शहर परिसरातील असंख्य ग्राहकांना जादा वीजबिल देण्यात आले होते. या ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण करण्याऐवजी त्यांना अगोदर वीजबिल भरण्यास सांगण्यात आले. असंख्य ग्राहकांना यामुळे आर्थिक फटका बसला आहे. अशा त्रुटींबाबत महावितरण मात्र कोणतीही भूमिका घेण्यास तयार नाही. मात्र वीजबिल वसुलीसाठी तत्पर भूमिका घेतली जाते. महावितरणच्या या भूमिकेविषयी शहरात मोठी नाराजी निर्माण झाली आहे.ग्राहकविरोधी भूमिकामहावितरणकडून अशाप्रकारे वीज बिल वसुलीची सक्ती केली जात असेल तर हा सुलतानी फतवा म्हटला पाहिजे. वीज कायद्याच्या विरोधात हा निर्णय असून, यामुळे ग्राहकांच्या हक्कांची पायमल्ली होणार आहे. ग्राहकांना सात दिवसांची पूर्व सूचना देऊनच कारवाई केली जाते. याप्रकरणी वेळीच लक्ष घालून ग्राहकांचे होणारे नुकसान टाळले पाहिजे. संबंधित खात्याचे मंत्री यांनी लक्ष घातलेच पाहिजे. या प्रकरणावरून ग्राहक संघटनांना स्वस्थ बसता येणार नाही. या निर्णयास न्यायालयात आव्हान द्यावे लागेल.-प्रा. दिलीप फडके, ग्राहक चळवळीतील ज्येष्ठ नेतेनियमानुसारच कारवाईथकीत वीजग्राहकांची जोडणी तोडणे हे अन्यायकारण नव्हे तर नियमित कारवाई आहे. ज्या थकीत वीजग्राहकांना एसएमएसद्वारे बिल भरण्याचे आवाहन केले जाते तीच नोटीस समजली जाते. आता पूर्वीसारखी नोटीस थेट दिली जात नाही. एसएमएसही ग्राह्य धरले जाते. त्यामुळे लिखित नोटीस दिलीच पाहिजे असे नाही. वीज बिल भरणे सर्वांचीच जबाबदारी आहे. त्यामुळे कारवाई ही होणारच. अकार्यक्षम कर्मचाºयांनाही दंड केला जातो. नियमानुसारच वीजजोडणी तोडली जाते.-प्रवीण दरोली, अधीक्षक अभियंताकर्मचाºयांची नाराजीविशेष म्हणजे वीजकर्मचारी अशा प्रकारच्या धमकीवजा आदेशामुळे प्रचंड नाराज आहेत. रोजच वीजजोडणी तोडण्याच्या प्रकारामुळे वायरमनला फिल्डवर काम करताना नाहक तणावाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. दैनंदिन एकाच गावात काम करीत असताना दांडगाई करून कारवाई केली तर विसंवाद निर्माण होण्याची शक्यता कर्मचारी व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :electricityवीजPower Shutdownभारनियमन