त्र्यंबकेश्वर शहरात दिवसाआड पाणी पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 22:45 IST2021-07-26T22:40:59+5:302021-07-26T22:45:20+5:30
त्र्यंबकेश्वर : शहरात यांत्रिक बिघाडामुळे अंबोली लघुपाट धरण ओव्हरफ्लो झाले असतांना शहरात तीन महिन्यांपासुन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तर बेझे येथील गौतमी प्रकल्प जवळपास ४५ टक्के भरले असतांना त्र्यंबकेश्वर शहरातील श्री निरंजनी अखाडा परिसरातील आनंद आखाडा, कैलासराजा नगर, तलाठी कॉलनी, श्रीस्वामी समर्थ केंद्र ,गुळवेवाडी, पेगलवाडी या परिसरातील रहिवासीयांना गेल्या सात दिवसांपासुन पाणीच नसल्याने इतरत्र जलाशयातुन पाणी भरुन नेण्याची वेळ आली आहे.

त्र्यंबकेश्वर शहरात दिवसाआड पाणी पुरवठा
त्र्यंबकेश्वर : शहरात यांत्रिक बिघाडामुळे अंबोली लघुपाट धरण ओव्हरफ्लो झाले असतांना शहरात तीन महिन्यांपासुन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तर बेझे येथील गौतमी प्रकल्प जवळपास ४५ टक्के भरले असतांना त्र्यंबकेश्वर शहरातील श्री निरंजनी अखाडा परिसरातील आनंद आखाडा, कैलासराजा नगर, तलाठी कॉलनी, श्रीस्वामी समर्थ केंद्र ,गुळवेवाडी, पेगलवाडी या परिसरातील रहिवासीयांना गेल्या सात दिवसांपासुन पाणीच नसल्याने इतरत्र जलाशयातुन पाणी भरुन नेण्याची वेळ आली आहे.
त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेत ह्यआंधळ दळतंय आणि कुत्र पीठ खातंयह्ण अशी परिस्थिती असतांना पाण्यासारख्या ज्वलंत प्रश्नावर नगरपरिषद गंभीर नाही. याचेच सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
वास्तविक अशा परिस्थितीत युध्द पातळीवर मोटार दुरुस्त करणे गरजेचे असतांना कासवगतीने व बेफिकीरीने मोटार दुरुस्तीला टाकण्यात आली ती आता दुरुस्त होवून झाली की नाही याबाबत कोणताच पाठपुरावा केलेला नाही.
अखेर सोमवारी (दि.२६) सायंकाळी मोटार दुरुस्त करुन आणल्याचे समजले. तो पर्यंत ज्या रहिवासीयांना सात आठ दिवस पाणीच न आल्याने ते लोक विहीरी, झरे याचा वापर करीत असल्याचे पहावयास मिळाले.पावसाळी वातावरण त्यात अशुद्ध पाणी पिल्याने काहींना सर्दी, खोकला, जुलाब असा त्रास होत आहे. त्यामुळे अनेकांच्या डॉक्टरांकडे फऱ्या वाढल्या आहेत.
वास्तविक नगरपरिषदेत अहिल्या धरण, अंबोली धरण, बेझे येथील गौतमी प्रकल्पातून नगरपरिषद पाणी उचलत असतांना त्र्यंबक पालिकेला आपल्या पदरी एखादी दोन मोटार जादा ठेवणे गरजेचे आहे. भविष्यात असा हलगर्जी पणाबद्दल नागरीकांनी तीव्र नाराजी बोलून दाखविली.