दशक्रिया घाटाची वाट बनली बिकटवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 15:24 IST2018-08-28T15:24:19+5:302018-08-28T15:24:29+5:30

विंचूर : मृतात्म्यास शांती मिळण्यासाठी त्याच्यावर अंत्यसंस्कार आणि दशक्रि या विधी चांगल्या वातावरणात व्हावे ही आप्तेष्ठांची रास्त अपेक्षा. मात्र दशक्रि याविधीच्या शेडची अस्वच्छता, शेडकडे जाणा-या रस्त्यावरील घाणीचे साम्राज्य, पाण्याची अपुरी व्यवस्था,सर्वत्र चिखलमय झालेला परिसर यामुळे या विंचूरकरांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

Dashashriya Ghat is the gate of the deficit | दशक्रिया घाटाची वाट बनली बिकटवाट

दशक्रिया घाटाची वाट बनली बिकटवाट

विंचूर : मृतात्म्यास शांती मिळण्यासाठी त्याच्यावर अंत्यसंस्कार आणि दशक्रि या विधी चांगल्या वातावरणात व्हावे ही आप्तेष्ठांची रास्त अपेक्षा. मात्र दशक्रि याविधीच्या शेडची अस्वच्छता, शेडकडे जाणा-या रस्त्यावरील घाणीचे साम्राज्य, पाण्याची अपुरी व्यवस्था,सर्वत्र चिखलमय झालेला परिसर यामुळे या विंचूरकरांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शहरीकरणाकडे झुकणा-या विंचूर गावातील दशक्रि याविधीच्या शेड दुरवस्था अन भौतिक असुविधांमुळे नागरिकांमध्ये दिवसेंदिवस प्रचंड नाराजी वाढत असून, समस्या दूर करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. गेल्या वर्षाभरापूर्वी येथील रस्त्यालगत असलेल्या स्मशानभूमीच्या अनेक समस्या मार्गी लागल्याने ग्रामपालिकेने स्मशानभूमीचा कायापालट घडवून आणला आहे. असे असले तरी येथील लोणगंगा नदीपात्रालगत असलेल्या दशक्रि या विधीच्या ठिकाणी समस्यांचा महापुर ओसांडुन वाहत आहे. येथे आल्यास आपण विंचूरसारख्या शहरात आहोत की, आदिवासी दुर्गम भागात आलो? असाच प्रश्न स्थानिक नागरिकांसह विधीसाठी आलेल्या आप्तेष्टांना पडावा इतकी दुरावस्था या ठिकाणची आहे.शेड एका बाजुस झुकले असून पावसाळ्यात अडचणीचे ठरत असल्याचे निदर्शनास येते.गावातून दशक्रि या शेडकडे येणा-या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या घाटाच्या ठिकाणी गावातुन येणा-या रस्त्यावर घाणीचे साम्राज्य असल्याने पावसाळ्यात दशक्रि या विधीच्या शेडकडे यायला जागा नसते. चिखलमय रस्त्यातून वाट काढत नागरिकांना येथे येऊन कुठेतरी आसरा घ्यावा लागतो. किमान पावसाळ्यात शेडलगत आजुबाजुला मुरु म टाकुन हा प्रश्न तात्पुरता सोडविला जाऊ शकतो. मात्र यंदा पावसाळ्यात गेल्या पंधरा दिवसात तीन ते चार वेळा दशक्रि या विधी कार्यक्र मासाठी आलेल्या नागरिकांना अतोनात समस्यांना तोंड द्यावे लागले. परिणामी नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. शेडच्या ओट्याची लांबी वाढवून घ्यावी, विधीसाठी आलेल्या लोकांना बसण्याची व्यवस्था, शेडलगत स्वच्छता करावी, पावसाळ्यात होणारी गैरसोय दूर करावी, परिसरात विविध प्रकारची झाडे लावून सुशोभीकरण केल्यास नदी परिसराचे सुशोभिकरण होईल, पाण्यासाठी येथे नळाची सोय करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Web Title: Dashashriya Ghat is the gate of the deficit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक