शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये ९१ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 18:13 IST

नऊ धरणांतून विसर्ग : बारा धरणे शंभर टक्के भरली

ठळक मुद्देजिल्ह्यात जुलै-आॅगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पावसाने वार्षिक सरासरी कधीच ओलांडली आहे.

नाशिक : नांदगाव, चांदवड, देवळा आणि कळवण तालुक्यात अद्याप समाधानकारक पावसाची नोंद नसली तरी जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठा मात्र ९१ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. तब्बल १२ धरणांमध्ये पाणीसाठा १०० टक्के झाला आहे तर ९ धरणांतून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. गतवर्षाच्या तुलनेत धरणांतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाल्याने काही तालुके वगळता सिंचनासह पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.जिल्ह्यात जुलै-आॅगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पावसाने वार्षिक सरासरी कधीच ओलांडली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी १०१३ मि.मी. इतकी असून आतापावेतो १२५० मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे. जिल्ह्यातील नांदगाव, चांदवड, देवळा आणि चांदवड तालुक्यात मात्र अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. या तालुक्यात ५० ते ६५ टक्क्यांच्या आसपासच पावसाची नोंद झालेली आहे. त्यातही येवला, चांदवड तालुक्यात काही गावांमध्ये अजूनही टॅँकरची मागणी होत आहे. एकीकडे चार-पाच तालुक्यांमध्ये पावसाने वक्रदृष्टी केली असतानाच जिल्ह्यातील लघु व मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झालेली आहे. धरणांमध्ये तब्बल ९१ टक्के पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी ४ सप्टेंबर रोजी धरणांतील पाणीसाठा ७९ टक्के होता. यंदा मात्र पावसाने उच्चांक मोडले आणि तब्बल १२ धरणांतील पाणीसाठा १०० टक्के झाला आहे तर काही धरणे ओसंडून वाहू लागली आहेत. त्यामुळे धरणांतून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. शंभर टक्के भरलेल्या धरणांमध्ये गंगापूर, काश्यपी, आळंदी, करंजवण, वाघाड, तिसगाव, दारणा, भावली, वालदेवी, नांदूरमध्यमेश्वर, हरणबारी, केळझर यांचा समावेश आहे.

टॅग्स :NashikनाशिकDamधरण