शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

क्रशर, ब्लास्टिंगमुळे शेतपिकांची हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 14:53 IST

सिन्नर: समृद्धी महामार्गाचे काम सध्या प्रगतिपथावर असून, क्रशरसह मिक्सर मशीन, सिमेंट प्लांट तसेच ब्लास्टिंगमुळे शेजारील बागायतदार शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान ...

सिन्नर: समृद्धी महामार्गाचे काम सध्या प्रगतिपथावर असून, क्रशरसह मिक्सर मशीन, सिमेंट प्लांट तसेच ब्लास्टिंगमुळे शेजारील बागायतदार शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांना रस्त्यावर येण्याची वेळ आली असून, गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना उत्पन्नाचे साधन राहिलेले नाही. तालुका कृषी अधिकारी तसेच उपविभागीय कृषी अधिकारी यांनी गेल्या दोन वर्षांपासून पंचनामे करूनही महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ठाणेस्थित कार्यालयापासून नाशिकच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवले आहे. समृद्धी महामार्गाचे व्यवस्थापक राधेश्याम मोपलवार यांनाही वैयक्तिक मेसेज पाठवून प्रकरणांची माहिती दिली आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनाही सर्व कागदपत्रांची माहिती त्यांचे स्वीय सहायक यांच्यामार्फत सादर केली आहेत. तरीही अजून कुठलीही ठोस कार्यवाही झालेली नाही. रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता नाशिक यांच्यामार्फत शेतकऱ्यांना योग्य ती कार्यवाही होईल, असे आश्वासन देऊन बोळवणी केली जात आहे.--------------चारा पिकांवर धूळशेती पिकांबरोबरच जनावरांसाठी चारा उत्पादन थांबले आहे. चारा पिकांवरही धूळ, सिमेंटने विपरीत परिणाम केला असून, दुभत्या गाई-म्हशींना बाधा होऊ लागली आहे. त्यामुळे शेतीला जोडधंदा असलेला दुग्ध व्यवसायही बाधित झाला आहे. त्यामुळे जगायचे तरी कसे, असा प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडला आहे. लवकरात लवकर संबंधित विभागाने पंचनाम्याच्या ठरलेल्या मोबदल्याप्रमाणे योग्य नुकसान भरपाई देऊन न्याय द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे; अन्यथा लवकरच तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही येथील नामदेव वाघ यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे.---------------------फळबागांसह शेतमालाचे नुकसानगेल्या दोन वर्षांपासून सीताफळ, पेरू, आंब्याच्या बागा, टोमॅटो, कांदा, काकडी, वांगे तसेच इतर कडधान्य पिकांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. तसेच ब्लास्टिंगमुळे शेजारील घरांचेही अतोनात नुकसान झाले आहे. याची जाणीव कंपनी अधिकाऱ्यांनाही असून, त्यांनी तसेच एमएसआरडीसीनेही पाहणी केलेली आहे. तसेच आजी-माजी लोकप्रतिनिधींनाही या गोष्टीची माहिती दिलेली आहे, त्यांनी या विषयाकडे कधी गांभीर्याने पाहिले नाही. आज अशा कोरोना महामारीच्या काळात शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक