शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

क्रशर, ब्लास्टिंगमुळे शेतपिकांची हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 14:53 IST

सिन्नर: समृद्धी महामार्गाचे काम सध्या प्रगतिपथावर असून, क्रशरसह मिक्सर मशीन, सिमेंट प्लांट तसेच ब्लास्टिंगमुळे शेजारील बागायतदार शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान ...

सिन्नर: समृद्धी महामार्गाचे काम सध्या प्रगतिपथावर असून, क्रशरसह मिक्सर मशीन, सिमेंट प्लांट तसेच ब्लास्टिंगमुळे शेजारील बागायतदार शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांना रस्त्यावर येण्याची वेळ आली असून, गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना उत्पन्नाचे साधन राहिलेले नाही. तालुका कृषी अधिकारी तसेच उपविभागीय कृषी अधिकारी यांनी गेल्या दोन वर्षांपासून पंचनामे करूनही महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ठाणेस्थित कार्यालयापासून नाशिकच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवले आहे. समृद्धी महामार्गाचे व्यवस्थापक राधेश्याम मोपलवार यांनाही वैयक्तिक मेसेज पाठवून प्रकरणांची माहिती दिली आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनाही सर्व कागदपत्रांची माहिती त्यांचे स्वीय सहायक यांच्यामार्फत सादर केली आहेत. तरीही अजून कुठलीही ठोस कार्यवाही झालेली नाही. रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता नाशिक यांच्यामार्फत शेतकऱ्यांना योग्य ती कार्यवाही होईल, असे आश्वासन देऊन बोळवणी केली जात आहे.--------------चारा पिकांवर धूळशेती पिकांबरोबरच जनावरांसाठी चारा उत्पादन थांबले आहे. चारा पिकांवरही धूळ, सिमेंटने विपरीत परिणाम केला असून, दुभत्या गाई-म्हशींना बाधा होऊ लागली आहे. त्यामुळे शेतीला जोडधंदा असलेला दुग्ध व्यवसायही बाधित झाला आहे. त्यामुळे जगायचे तरी कसे, असा प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडला आहे. लवकरात लवकर संबंधित विभागाने पंचनाम्याच्या ठरलेल्या मोबदल्याप्रमाणे योग्य नुकसान भरपाई देऊन न्याय द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे; अन्यथा लवकरच तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही येथील नामदेव वाघ यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे.---------------------फळबागांसह शेतमालाचे नुकसानगेल्या दोन वर्षांपासून सीताफळ, पेरू, आंब्याच्या बागा, टोमॅटो, कांदा, काकडी, वांगे तसेच इतर कडधान्य पिकांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. तसेच ब्लास्टिंगमुळे शेजारील घरांचेही अतोनात नुकसान झाले आहे. याची जाणीव कंपनी अधिकाऱ्यांनाही असून, त्यांनी तसेच एमएसआरडीसीनेही पाहणी केलेली आहे. तसेच आजी-माजी लोकप्रतिनिधींनाही या गोष्टीची माहिती दिलेली आहे, त्यांनी या विषयाकडे कधी गांभीर्याने पाहिले नाही. आज अशा कोरोना महामारीच्या काळात शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक