त्र्यंबकेश्वरला दिवसाआड पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2016 00:02 IST2016-02-18T23:57:41+5:302016-02-19T00:02:05+5:30
त्र्यंबकेश्वरला दिवसाआड पाणीपुरवठा

त्र्यंबकेश्वरला दिवसाआड पाणीपुरवठा
त्र्यंबकेश्वर : शहराला दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नगरपालिका प्रशासनाने ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना फिरवली आहे. त्र्यंबकला दिवसाआड पाणीपुरवठ्याने अंबोली धरणातील पाण्याचा साठा जुलैपर्यंतची तहान भागविण्यासाठीची उपाययोजना होय. १६ फेब्रुवारीपासून पाणीकपात करण्यात आली आहे. गौतमी गोदावरी प्रकल्प महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून अद्याप पालिकेच्या ताब्यात देण्यात आलेला नाही. जीवन प्राधिकरणाची ताब्यात देण्याची तयारी असली तरी पालिकेची आर्थिक बाब वीजबिल, कर्मचारी वर्ग आदि बाबी सांभाळण्याजोगी नसल्याने त्या पाण्यावरच भागवून घेण्याचे ठरविले आहे. (वार्ताहर)