शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
3
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
4
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
5
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
6
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
7
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
8
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
9
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
10
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
11
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
12
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
13
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
14
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
15
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
16
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
17
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
18
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
19
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
20
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल

कोरोनामुळे वाटा बंद : आता डोळ्यांपुढे काजवे चमकणार नाहीत !

By अझहर शेख | Updated: May 28, 2020 17:05 IST

पर्यटकांनी कुठल्याही छुप्या मार्गाने अभयारण्यक्षेत्रात प्रवेश केल्यास वन कायद्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्देमागील वर्षी ७ लाख ६४ हजार ६४० रुपयांचा महसूल पर्यटनाच्या हंगामावर पाणीकोरोना या साथीच्या आजारामुळे ‘पाहुणे’ येणे बंद

नाशिक : कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसरात मेअखेर काजव्यांची चमचम पहावयास मिळते. वळव्याच्या पावसानंतर येथील वृक्षराजीवर जणु तारकादळे लखलखते; मात्र यावर्षी कोरोनाच्या सावटाखाली काजवा महोत्सव सापडला आहे. रोजगार बुडाला तर चालेल; मात्र काजवा महोत्सवाद्वारे कोरोनाला निमंत्रण द्यायचे नाही, असा कठोर निर्णयच या वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सर्व गावांच्या गावकऱ्यांनी ठरावाद्वारे घेतला. नाशिक वन्यजीव विभागानेदेखील मागील दोन महिन्यांपासून अभयारण्याची वाट पर्यटकांसाठी बेमुदत कालावधीसाठी बंद केली आहे.नाशिक-अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवरील भंडारदरा वनपरिक्षेत्रांतर्गत येणा-या कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात यावर्षी काजवा महोत्सव पार पडणार नसल्याचे नाशिक वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी जाहीर केले आहे. पर्यटकांनी कुठल्याही छुप्या मार्गाने अभयारण्यक्षेत्रात प्रवेश केल्यास वन कायद्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. कोरोनाचा प्रार्दूभाव रोखण्याकरिता नाशिक वनवृत्तासह राज्यभरातील अभयारण्य, राखीव वने प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या आदेशान्वये दोन महिन्यांपासून बेमुदत बंद ठेवण्यात येत आहेत.

दरवर्षी मे अखेरीस कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातील अर्जुनसादडा, उंबर, जांभूळ, बेहडा, हिरडा, सादडा यांसारख्या वृक्षराजीवर काजव्यांची चमचम अनुभवयास येते. मान्सूनच्या सरीं कोसळेपर्यंत काजवे या भागात लुकलुकतात. रात्रीच्याअंधारात जणू धरतीवर प्रकाशफुलेच अवतरली की काय असा भास होतो. खरं तर हा कालावधी जैवविविधतेतील काजवा या किटकाचा प्रजननाचा असतो.दरवर्षी महिनभर निसर्गाचा हा अद्भूत व डोळ्यांची पारणे फेडणारा नजारा बघण्यासाठी नाशिक, अहमदनगर या जवळ्या जिल्ह्यांसह मुंबई, पुणे या शहरांमधून मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होतात. तसेच गुजरात राज्यातील सुरत, अहमदाबाद, भावनगर या भागातूनही पर्यटक येथे हजेरी लावतात. यावर्षी या नाशिक वन्यजीव विभागाला मिळणाºया महसुलावर पाणी सोडावे लागणार आहे. या भागातील विविध आदिवासी गाव, पाड्यांवरील सुमारे ३५० कुटुंबियांचा रोजगारही बुडणार आहे. निवास-न्याहारी, गाईड, जंगल भ्रमंती आदिंच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला दर दिवसाला या महोत्सवात किमान १ हजार तर कमाल ५ हजार रुपये मिळत होते.
साडेतीनशे आदिवासी कुटुंबाचा रोजगार बुडाला
अभयारण्य क्षेत्रातील गावांवर मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट कोरोनामुळे आहे. येथील आदिवासींचा मुख्य व्यवसाय शेती आहे. दुसरा आधार म्हणजे पर्यटन. मात्र यावर्षी कोरोना या जीवघेण्या साथीच्या आजारामुळे ‘पाहुणे’ येणे बंद झाले. परिणामी आदिवासींचा रोजगार हिरावला गेला आहे.
मागील वर्षी सुमारे ७ लाख ६४ हजार ६४० रुपयांचा महसूल नाशिक वन्यजीव विभागाला काजवा महोत्सवाच्या माध्यमातून मिळाला होता. २०१८ सालापासून पर्यटकांकडून शुल्क आकारणी वन्यजीव विभाग करत आहे. गेल्या वर्षी २०१८च्या महोत्सवाच्या तुलनेत दहा हजाराने पर्यटक वाढले होते. यावर्षी कोरोनामुळे अभयारण्य मागील दोन महिन्यांपासून बंदच असून पुढील आदेश अद्याप प्राप्त नाही. काजवा महोत्सवदेखील वरिष्ठांच्या आदेशानुसार रद्द करण्यात आला आहे.- दत्तात्रय पडवळे, वनक्षेत्रपाल, भंडारदरा

 

पर्यटनाच्या हंगामावर पाणीउन्हाळ्यात संध्याकाळनंतर भंडारदरा धरणाच्या काठालगत कॅम्पेनिंग, पावसाळ्याच्या तोंडावर काजवा महोत्सव आणि नंतर पावसाळी पर्यटन असा हा हंगाम असतो. या नऊ दे दहा महिन्यांत येथील आदिवासी तरुणांना चांगली कमाई होते; मात्र यंदा सगळा हंगाम संकटात सापडला आहे. साधारणत: सरासरी तीनशे ते साडेतीनशे कुटुंबांना यावर्षी मोठा आर्थिक फटका बसणार आहे. - केशव खाडे, स्थानिक गाइड

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसtourismपर्यटनforest departmentवनविभागwildlifeवन्यजीव