शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
3
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
4
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
5
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
6
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
7
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
8
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
9
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
10
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
11
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
12
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
13
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
14
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
15
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
16
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
17
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
18
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
19
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
20
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

कंटेनेरने देवीभक्तांना चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 5:59 PM

सिन्नर : नवरात्रोत्सवासाठी तुळजापूर येथून धावत मशालज्योत घेऊन येणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील देवीभक्तांना कंटेनेरने चिरडल्याची घटना नांदूरशिंगोटे शिवारात निमोण रस्त्यावरील उड्डाण पुलाजवळ घडली.

सिन्नर : नवरात्रोत्सवासाठी तुळजापूर येथून धावत मशालज्योत घेऊन येणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील देवीभक्तांना कंटेनेरने चिरडल्याची घटना नांदूरशिंगोटे शिवारात निमोण रस्त्यावरील उड्डाण पुलाजवळ घडली. मंगळवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास सदर भीषण अपघात झाला. यात दोन देवीभक्तांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर नाशिक व संगमनेर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर अन्य १५ भाविक जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.इगतपुरी तालुक्यातील विल्होळी जवळील सारुळ येथे भवानी मातेचे मंदिर आहे. सारुळ परिसरातील सांजेगाव, लहांगेवाडी व अन्य गावातील युवक ट्रक घेऊन रविवारी (दि. ७) रोजी तुळजापूर येथे गेले होते. तुळजापूर येथून मशालज्योत घेऊन धावत व सोबत तीन दुचाकीसह युवक इगतपुरी तालुक्याकडे कूच करीत होते. नांदूरशिंगोटे गावाजवळ रस्त्याच्या कडेला थांबून मशालीत तेल टाकण्यासाठी व ज्योतीची काजळी काढण्यासाठी धावणारे युवक व त्यांच्यासोबत असलेले दुचाकीवरील युवक थांबले होते. त्यांच्यासोबत असणारा ट्रकही रस्त्याच्या कडेला उभा करण्यात आला होता. काही युवक ट्रकखाली उतरले होते.याचवेळी लोणीकडून नांदूरशिंगोटेकडे येणाºया कंटेनेरने (क्र. एम. एच. ०४ जी. सी. ६८७) रस्त्याच्या कडेला असलेल्या तीन दुचाकींना व उभ्या असलेल्या युवकांना चिरडले. त्यानंतर एक दुचाकी कंटेनेरमध्ये अडकली. सदर कंटेनेरने दुचाकी सुमारे एक किलोमीटर नांदूरशिंगोटे गावापर्यंत फरफटत नेली.या अपघात अक्षय शिवाजी बोकुड (२२) रा. सांजेगाव ता. इगतपुरी व बबन गोविंदराव खंदाळे (२३) रा. लहांगेवाडी ता. इगतपुरी हे जागीच ठार झाले. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर अन्य जखमींना संगमनेर व नाशिक येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.या अपघातात गोरख तुकाराम डगळे, अनिल रामदास भोईर, समाधान मधु शिंदे, प्रकाश पांडू गुंड, गौरव संजय ढगे, हिरामण गोटे, रवी लहू भोईर, विनोद अशोक तांबडे, मच्छिंद्र लक्ष्मण भोईर, राजाराम लक्ष्मण आचारी यांच्यासह अन्य आठ जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर कंटेनेरचालक फरार झाला. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात कंटेनेर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रकाश गवळी, शशिकांत उगले, नवनाथ शिंदे, उमेश खेडकर, प्रकाश सोनवणे तपास करीत आहेत.चौकट- नांदूरशिंगोटे येथे घेणार होते विश्रांती..तुळजापूर येथून धावत मशालज्योत घेऊन येणारे युवक नांदूरशिंगोटे येथे काही काळ विश्रांती घेऊन पुन्हा इगतपुरी तालुक्याकडे प्रस्थान करणार होते. काही मिनिटांसाठी मशालीत तेल टाकण्यासाठी ते निमोण रस्त्याजवळील उड्डाण पुलाजवळ थांबले होते. याच काळात त्यांच्यावर काळाने घाला घातला. 

टॅग्स :Accidentअपघात