शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ ते ३० भाजपा आमदार फोडण्याचं सगळं प्लॅनिंग ठरलं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
3
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
4
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
5
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
6
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
7
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
8
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
9
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
10
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
11
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
12
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
13
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
14
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
15
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
16
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
17
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
18
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
19
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
20
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम

गेल्या वर्षीच्या तुलनेत पाऊस कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 12:34 AM

मान्सूनचे आगमन झाले असले तरी, अद्याप जिल्ह्यात समाधानकारक हजेरी न लागल्याने बळीराजा धास्तावला आहे. यंदा हवामान खात्याने समाधानकारक पाऊस पडण्याचे संकेत दिले असले तरी, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २२ जूनपर्यंत जिल्ह्णात ५.२७ टक्केच पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी याच दरम्यान दुपटीने पाऊस नोंदविला गेला होता. शुक्रवारी दुपारी जिल्ह्णातील काही तालुक्यांत पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची धावपळ उडाली.

नाशिक : मान्सूनचे आगमन झाले असले तरी, अद्याप जिल्ह्यात समाधानकारक हजेरी न लागल्याने बळीराजा धास्तावला आहे. यंदा हवामान खात्याने समाधानकारक पाऊस पडण्याचे संकेत दिले असले तरी, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २२ जूनपर्यंत जिल्ह्णात ५.२७ टक्केच पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी याच दरम्यान दुपटीने पाऊस नोंदविला गेला होता. शुक्रवारी दुपारी जिल्ह्णातील काही तालुक्यांत पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची धावपळ उडाली. मालेगाव शहरात एका तासात अतिवृष्टी झाली.  जिल्ह्यात अद्यापही दिंडोरी, पेठ, त्र्यंबकेश्वर, मालेगाव, कळवण, सुरगाणा, देवळा व निफाड या तालुक्यांमध्ये सरासरी २३ टक्के पाऊस झाला असून, त्यामुळे मे महिन्यातच लागवडीसाठी शेतीची मशागत करून बसलेल्या शेतकऱ्याच्या तोंडचे पाणी पळाले आहे. विशेष म्हणजे, जून महिन्याच्या दमदार पावसाच्या भरवशावर भाताच्या आवणीला सुरुवात केली जाते. परंतु जूनचा शेवटचा आठवडा उजाडूनही पावसाने पाहिजे त्या प्रमाणात हजेरी न लावल्यामुळे इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या तालुक्यांतील शेतकरी चिंतातुर झाले आहेत. १ जूनपासून जिल्ह्णात ८०१.७ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला असून, त्यात सर्वाधिक पावसाची नोंद इगतपुरी तालुक्यात १७० व त्यानंतर येवला येथे ११२ मिलिमीटर झाली आहे. येवला येथे गुरुवारी पावसाने चांगलेच झोडपून काढल्याने तालुक्यात एका दिवसातच ४४ मिलिमीटरची नोंद करण्यात आली. त्यामानाने निफाड तालुक्यात सर्वाधिक कमी म्हणजे फक्त ११ मिलिमीटर पाऊस गेल्या २० दिवसांत नोंदविला गेला आहे. १ ते २२ जून यादरम्यान पडलेल्या पावसाचे प्रमाण पाहता जून महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत ५३ टक्के दिसत असला तरी, गेल्या वर्षी याच दरम्यान जिल्ह्णात १६२१ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती व त्याची टक्केवारी १०.७ इतकी होती. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निम्माच पाऊस झाला आहे.  शुक्रवारी जिल्ह्णातील नाशिकसह मालेगाव, सटाणा, दिंडोरी आदी भागांत पावसाने हजेरी लावली. मालेगाव शहरात दुपारी १ वाजेच्या सुमारास जोरदार वाºयासह कोसळलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. एका तासात शहरात ७४ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. त्यानंतर मात्र पावसाने उघडीप दिली. पावसाळी वातावरणामुळे हवेतील उकाडा कमी होण्यास मात्र मदत झाली.

 

टॅग्स :Rainपाऊस