शहरं
Join us  
Trending Stories
1
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
2
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
3
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
4
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
5
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
6
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
7
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
8
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
9
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
10
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
11
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
12
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
13
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
14
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
15
Hardik-Natasa Divorce : हार्दिक पांड्याबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांवर नताशाने दोन शब्दात दिलं उत्तर, म्हणाली...
16
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
17
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
18
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
19
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
20
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल

कमीशन बारा रूपये, खर्च ५१ रूपये ! रेशन दुकानदारांची व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 7:17 PM

नाशिक : फक्त अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांनाच प्रती कार्ड एक किलो साखर दरमहा देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका रेशन दुकानदारांनाच बसू लागला असून, चार ते चाळीस किलो पर्यंत दरमहा साखर वाटपासाठी मिळणा-या  दुकानदारांना मात्र चलन भरतांना साखरेच्या मिळणाºया कमिशनपेक्षा चार ते चाळीस पट जादा रक्कम बॅँकेत भरण्याचा भुर्दंड सोसावा लागत ...

नाशिक : फक्त अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांनाच प्रती कार्ड एक किलो साखर दरमहा देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका रेशन दुकानदारांनाच बसू लागला असून, चार ते चाळीस किलो पर्यंत दरमहा साखर वाटपासाठी मिळणा-या  दुकानदारांना मात्र चलन भरतांना साखरेच्या मिळणाºया कमिशनपेक्षा चार ते चाळीस पट जादा रक्कम बॅँकेत भरण्याचा भुर्दंड सोसावा लागत आहे. दुकानदारांच्या या आर्थिक व्यथेशी कोणतेही सोयरसुतक नसलेले पुरवठा खाते मात्र साखर न उचलणाºया दुकानदारांना नोटीसा पाठवून मानसिक छळ करीत असल्याचे धक्कादायक वृत्त आहे.सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गंत अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांनाच प्रती कार्ड एक किलो साखर देण्यात येत असल्यामुळे अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या पाहता प्रत्येक रेशन दुकानदारास चार ते चाळीस किलो या प्रमाणातच दरमहिन्याला साखरेचा कोटा दिला जातो. या साखरेसाठी दुकानदाराने साखरेवर मिळणारे कमीशनची रक्कम वजा जाता उर्वरित रकमेचे चलन म्हणजेच बॅँकेत पैसे जाऊन पैसे भरावे लागतात. सध्या रेशनवर मिळणा-या साखरेचा दर २० रूपये किलो इतका असून, त्याच्या विक्रीतून दुकानदारास एका किलोमागे दिड रूपये कमिशन मिळते. म्हणजे एका दुकानदाराला जर चार किलोच साखरेचा कोटा मंजुर असेल तर त्याने सहा रूपये कमिशनचे वजा करून ५४ रूपये चलनाद्वारे भरणे अपेक्षित आहे. परंतु ज्या राष्टयकृत बॅँकेत रेशन दुकानदारांना चलन भरावे लागते त्यात कमीत कमी ३०१ रूपयांचे चलन भरावे लागते. राष्टÑीयकृत बॅँका तीनशे रूपयांच्या आतील रक्कम चलनाद्वारे भरून घेत नाही. त्यामुळे दुकानदाराला तीनशे रूपयांहून अधिक रक्कम बॅँकेत चलनाद्वारे भरली तरच पुरवठा खाते त्यांना परमीट अदा करते ही वस्तुस्थिती आहे. म्हणजेच रेशन दुकानदाराला चार किलो साखरेच्या सहा रूपये कमिशनसाठी तीनशे रूपयांचा भुर्दंड बसत आहे. त्यामुळे बºयाचशा दुकानदारांना हा घाट्याचा व्यवसाय वाटू लागला असून, ज्यांना चार ते वीस किलो पर्यंत दरमहा साखर मिळते व ज्यांना तीनशे रूपयांच्या आत कमीशनची रक्कम मिळणार आहे अशा दुकानदारांना घरातून रक्कम भरून अंत्योदयच्या लाभार्थ्यांना साखर वाटप करावी लागत आहे. त्यामुाळे गेल्या तीन महिन्यांपासून दुकानदार नाखुषीने साखरेची उचल करीत असून, काहींनी याच कारणास्तव साखर न उचलल्याने पुरवठा खात्याने त्यांना नोटीसा पाठवून फौजदारी कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.