शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
5
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
6
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
7
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
8
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
9
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
10
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
11
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
12
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
13
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
14
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
15
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
16
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
17
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
18
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
19
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
20
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."

‘टीईटी’ उत्तीर्ण शिक्षकांच्या माहितीचे संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 00:06 IST

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित शाळांमध्ये १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्तझालेल्या आणि शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी अनुत्तीर्ण असलेल्या शिक्षकांची सेवा ३१ डिसेंबर २०१९ रोजीच समाप्त करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिले आहेत.

ठळक मुद्देवेतन विभागाकडून कार्यवाही : अनुत्तीर्णांविषयी शिक्षण विभाग अनभिज्ञ; माहिती कळविण्याची सूचना

नाशिक : राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित शाळांमध्ये १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्तझालेल्या आणि शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी अनुत्तीर्ण असलेल्या शिक्षकांची सेवा ३१ डिसेंबर २०१९ रोजीच समाप्त करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. परंतु, अशा शिक्षकांची एकत्रित माहितीच शिक्षण विभागाकडे नसल्याने वेतन विभागाने १३ फेब्रुबारी २०१३ नंतर नियुक्त सर्व शिक्षकांना टीईट उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र सादर करण्याच्या सूचना केल्या असून, शनिवारपासून (दि.१८) टीईटी उत्तीर्णतेच्या प्रमाणपत्रांची पडतळणी सुरू करण्यात आली असून, सदर काम दि. २२ पर्यंत चालणार आहे.टीईटी अनुत्तीर्ण असूनही कार्यरत असलेल्या शिक्षकांची माहिती जिल्हा परिषेच्या शिक्षण विभागाकडे नसल्याने जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी अनुदानित शाळांनी संबंधित माहिती तत्काळ शिक्षण उपसंचालक कार्यालयास कळविण्याच्या सूचना जिल्हा परिषद शिक्षण विभागाने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच दिल्या होत्या. तसेच जानेवारी महिन्याचे वेतन मिळविण्यासाठी १३ फेब्रुवारीनंतर मान्यता मिळलेल्या शाळांमधील शिक्षकांनी अथवा पूर्वीच्या रिक्त जागेवर नियुक्त केलेल्या शिक्षकांचे टीईटी प्रमाणपत्र वेतन विभागालाही सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार शनिवारपासून वेतन विभागाने शिक्षकांचे वेतन करताना त्यांच्या टीईटी प्रमाणपत्रांचीही पडताळणी सुरू केली असून, ही प्रक्रिया पुढील चार दिवस सुरू राहणार आहे. त्यामुळे सर्व अनुदान प्राप्त शाळांनी नियोजित वेळेत शिक्षकांच्या टीईटी प्रमाणपत्रांची माहिती सादर करण्याचे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहेत.विशेष म्हणजे नाशिक मनपा क्षेत्रातील खासगी अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक शाळांमधील २३ शिक्षकांची समाप्त करण्याच्या सूचना दि. ३१ डिसेंबर २०१९ रोजीच संबंधित विद्यालयांना करण्यात आल्या आहेत. परंतु, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये अशाप्रकारे किती शिक्षक टीईटी अनुत्तीर्ण असतानाही डिसेंबर २०१९ पर्यंत वेतन घेत होते.याविषयीची माहितीच उपलब्ध नसल्याने संबंधित शिक्षकांची सेवा समाप्त करून त्यांचे वेतन थांबविण्यासंदर्भात कारवाई करण्यासाठी वेतन विभागाला १३ फेब्रुवारी २०१३ नंतरच्या सर्वच शिक्षकांच्या टीईटी प्रमाणपत्रांची पडताळणी करावी लागणार आहे.राज्याची मुदतवाढ केंद्राच्या धोरणाशी विसंगतटीईटी प्रमाणपत्रांची पडताळणी राज्य सरकारने १३ डिसेंबर २०१३ नंतर नियुक्त शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी तीन संधी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यापूर्वीच २०१५ मध्ये केंद्र सरकारने टीईटी उत्तीर्णतेसाठी चार वर्षांची मुदतवाढ दिल्याने राज्याची मुदतवाढ केंद्र सरकारच्या धोरणाशी विसंगत असल्याचे दिसून आले. त्यामुळे राज्य सरकारने निर्णयात बदल करून नवीन परिपत्रक जाहीर केले. त्यानुसार ३० मार्च २०१९ पर्यंत जे शिक्षक टीईटी उत्तीर्ण होणार नाहीत, त्यांच्या सेवा समाप्त करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आता १३ फेब्रुवारी २०१३ नंतर रुजू झालेल्या शिक्षकांच्या टीईटी उत्तीर्णतेच्या प्रमाणपत्रांची वेतन विभागाकडून पडताळणी सुरू झाली असून २२ जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील किती शिक्षकांची सेवा समाप्त होणार याविषयीचे चित्र स्पष्ट होऊ शकणार आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रTeacherशिक्षक