शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ हवामानामुळे कांदा पिकाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2021 01:04 IST

येवला तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या राजापूर व परिसरात सध्या ढगाळ हवामानामुळे कांदा पिकावर मावा रोगांचा प्रादूर्भाव वाढला असल्याने महागडी औषधाची फवारणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पावसामुळे बऱ्याच लाल कांद्याची प्रतवारी ढासळली असून, आता पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. दरम्यान, यंदा रोपांअभावी उत्पादकांनी कांदा लागवडीऐवजी पेरणीचा मार्ग अवलंबला आहे.

ठळक मुद्देदुष्काळात तेरावा : यंदा लागवडीऐवजी पेरणीचा पर्याय

राजापूर : येवला तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या राजापूर व परिसरात सध्या ढगाळ हवामानामुळेकांदा पिकावर मावा रोगांचा प्रादूर्भाव वाढला असल्याने महागडी औषधाची फवारणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पावसामुळे बऱ्याच लाल कांद्याची प्रतवारी ढासळली असून, आता पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. दरम्यान, यंदा रोपांअभावी उत्पादकांनी कांदा लागवडीऐवजी पेरणीचा मार्ग अवलंबला आहे.

सध्या महागाईत भरमसाठ वाढ झाली असल्याने रासायनिक खते कीडनाशके, शेती औषधाची महागाई भरमसाठ वाढ झालेली. त्यात निसर्गाच्या हवामान बदलामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात संकटात सापडले आहेत . लाल कांदा लागवड झालेली असून, अपेक्षित त्या प्रमाणात यंदा कांदा रोपाअभावी सर्वच शेतकऱ्यांनी कांदा पेरणीचा पर्याय अवलंबला आहे. आता सध्या कांदा जगविण्यासाठी शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात महागडी औषधांची फवारणी करतानाचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. निसर्गाचा हवामान बदलामुळे शेतकऱ्यांना फटका बसतो आहे. सध्या दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असल्याने शेतकऱ्यांना कीटकनाशके, बुरशीनाशक यांचा कांदा पीक वाचविण्यासाठी खर्च होत आहे. कांद्याला कसा बाजारभाव मिळतो, हे माहीत नसले तरी सध्या शेतकरी आशावादी राहून आपल्या शेतामध्ये राबराब कष्ट करताना दिसत आहेत. पीक उत्पादन खर्च यात ताळमेळ बसेल की नाही, याचीही शाश्वती नसते, तरीही शेतकरी आपल्या कुटुंबाची जबाबदारी संपूर्णपणे शेतीवरच पार पाडीत असतो. शेतीत लागणारी रासायनिक खते, मजुरी, फवारणी असा एक एकरासाठी चाळीस ते पन्नास हजार रुपयांचा खर्च शेतकऱ्यांचा झालेला आहे. तरीदेखील आज ना उद्या योग्य भाव मिळेल, या अपेक्षेने पीक जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असल्याचे दिसून येत आहे.

कोट...

शेतकऱ्याला आशावादी राहून आपल्या शेतामध्ये काबाडकष्ट करून शेती कामात व्यस्त राहावे लागते; पण निसर्ग व हवामान बदलामुळे कांदा पीक वाचविण्यासाठी धडपड सुरू आहे. सध्या ढगाळ वातावरण निर्माण झाले असल्याने कांद्यावर मावा रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. शेतकऱ्यांच्या मागे संकटांची मालिका सुरूच असते; परंतु शासन त्यावर ठोस मार्ग काढत नाही.

- समाधान चव्हाण, शेतकरी राजापूर.

टॅग्स :NashikनाशिकweatherहवामानonionकांदाFarmerशेतकरी