शहरं
Join us  
Trending Stories
1
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
2
"मामला 'गंभीर' है..."! वारंवार बोलावूनही विजयाच्या जल्लोषात सहभागी झाला नाही कोहली, नेमकं घडलं काय? बघा Video
3
बाजार विक्रमी पातळीवरून घसरला! सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगाग बंद; ऑटो शेअर्सची मात्र कमाल!
4
VPN वापरताय? थांबा! आताच सावध व्हा; गुगलने दिलीय 'रेड अलर्ट' वॉर्निंग, बँक खातं होऊ शकतं रिकामी
5
GST दरात कपात होऊनही तिजोरीत वाढ! नोव्हेंबरमध्ये १.७० लाख कोटी रुपये संकलन, पण, 'या' क्षेत्रात घट
6
“मीरा-भाईंदर मेट्रोचे डोंगरी कारशेड रद्द, लवकर अधिसूचना”; प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती
7
शेख हसीना पुन्हा बांगलादेशच्या पंतप्रधान होणार? मृत्यूदंडाची शिक्षा असतानाच हालचालींना वेग
8
दत्त जयंती २०२५: तुम्ही ‘श्रीदत्त अथर्वशीर्ष’ म्हणता का? कायमची कृपा होते; पुण्य लाभते!
9
"त्या बाजूला फार बघू नका..., धोका आहे...!", भरसंसदेत उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांना नेमकं काय म्हणाले खर्गे?
10
सामन्यानंतर विराटला एक प्रश्न विचराला गेला, त्यानं बोलता बोलता BCCI अन् गौतम गंभीरवरच निशाणा साधला, स्पष्टच बोलला
11
VIRAL VIDEO : पाकिस्तानी व्लॉगरनं रशियन तरुणींना विचारला एक प्रश्न! त्यांनी जे उत्तर दिलं ऐकून फटक्यात झाला गप्प
12
१००% पर्यंत माफीची संधी! सीटबेल्ट, सिग्नल तोडणे यांसारख्या ट्रॅफिक चलनांवर मिळणार सूट! कसा करायचा अर्ज?
13
छोटा शेअर, मोठा धमाका, ज्यानं ₹१ लाख गुंतवले, त्याचं मूल्य आज झालं ₹८१ लाख; तुमच्याकडे आहे का?
14
विराटचा प्रोटीन बार, रोहितचा डाळ-भात! क्रिकेटर्सचं व्हायरल 'डाएट' सिक्रेट, मॅचमध्ये कशी मिळते एनर्जी?
15
मार्गशीर्ष भौम प्रदोष २०२५: मंगलदोष मुक्त, हनुमंत प्रसन्न; ‘असे करा’ शिवव्रत, शुभ-लाभ होतील!
16
५० वर्षांनी चतुर्ग्रही योग: ९ राशींना कल्पनेपलीकडे चौफेर लाभ; चौपट नफा-फायदा, मनासारखा काळ!
17
SMAT 2025 : दोन टी-२० सामन्यात नाबाद २१४ धावा! १८ वर्षीय मुंबईकराचा शतकी धडाका
18
परदेशी झगमगाट हवा होता, अन् झाली जैश-ए-मोहम्मदची कमांडर! डॉक्टर शाहीनची ३ निकाहानंतरही एक इच्छा अपूर्ण
19
500 km रेंज, टॉप क्लास फीचर्स; लॉन्चला एक दिवस बाकी; कशी आहे मारुतीची पहिली EV कार?
20
पराभवाच्या चर्चेने विरोधक संतप्त, नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेची आठवण करून दिली
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ हवामानामुळे कांदा पिकाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2021 01:04 IST

येवला तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या राजापूर व परिसरात सध्या ढगाळ हवामानामुळे कांदा पिकावर मावा रोगांचा प्रादूर्भाव वाढला असल्याने महागडी औषधाची फवारणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पावसामुळे बऱ्याच लाल कांद्याची प्रतवारी ढासळली असून, आता पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. दरम्यान, यंदा रोपांअभावी उत्पादकांनी कांदा लागवडीऐवजी पेरणीचा मार्ग अवलंबला आहे.

ठळक मुद्देदुष्काळात तेरावा : यंदा लागवडीऐवजी पेरणीचा पर्याय

राजापूर : येवला तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या राजापूर व परिसरात सध्या ढगाळ हवामानामुळेकांदा पिकावर मावा रोगांचा प्रादूर्भाव वाढला असल्याने महागडी औषधाची फवारणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पावसामुळे बऱ्याच लाल कांद्याची प्रतवारी ढासळली असून, आता पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. दरम्यान, यंदा रोपांअभावी उत्पादकांनी कांदा लागवडीऐवजी पेरणीचा मार्ग अवलंबला आहे.

सध्या महागाईत भरमसाठ वाढ झाली असल्याने रासायनिक खते कीडनाशके, शेती औषधाची महागाई भरमसाठ वाढ झालेली. त्यात निसर्गाच्या हवामान बदलामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात संकटात सापडले आहेत . लाल कांदा लागवड झालेली असून, अपेक्षित त्या प्रमाणात यंदा कांदा रोपाअभावी सर्वच शेतकऱ्यांनी कांदा पेरणीचा पर्याय अवलंबला आहे. आता सध्या कांदा जगविण्यासाठी शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात महागडी औषधांची फवारणी करतानाचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. निसर्गाचा हवामान बदलामुळे शेतकऱ्यांना फटका बसतो आहे. सध्या दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असल्याने शेतकऱ्यांना कीटकनाशके, बुरशीनाशक यांचा कांदा पीक वाचविण्यासाठी खर्च होत आहे. कांद्याला कसा बाजारभाव मिळतो, हे माहीत नसले तरी सध्या शेतकरी आशावादी राहून आपल्या शेतामध्ये राबराब कष्ट करताना दिसत आहेत. पीक उत्पादन खर्च यात ताळमेळ बसेल की नाही, याचीही शाश्वती नसते, तरीही शेतकरी आपल्या कुटुंबाची जबाबदारी संपूर्णपणे शेतीवरच पार पाडीत असतो. शेतीत लागणारी रासायनिक खते, मजुरी, फवारणी असा एक एकरासाठी चाळीस ते पन्नास हजार रुपयांचा खर्च शेतकऱ्यांचा झालेला आहे. तरीदेखील आज ना उद्या योग्य भाव मिळेल, या अपेक्षेने पीक जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असल्याचे दिसून येत आहे.

कोट...

शेतकऱ्याला आशावादी राहून आपल्या शेतामध्ये काबाडकष्ट करून शेती कामात व्यस्त राहावे लागते; पण निसर्ग व हवामान बदलामुळे कांदा पीक वाचविण्यासाठी धडपड सुरू आहे. सध्या ढगाळ वातावरण निर्माण झाले असल्याने कांद्यावर मावा रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. शेतकऱ्यांच्या मागे संकटांची मालिका सुरूच असते; परंतु शासन त्यावर ठोस मार्ग काढत नाही.

- समाधान चव्हाण, शेतकरी राजापूर.

टॅग्स :NashikनाशिकweatherहवामानonionकांदाFarmerशेतकरी