शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

ढगाळ हवामानामुळे कांदा पिकाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2021 01:04 IST

येवला तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या राजापूर व परिसरात सध्या ढगाळ हवामानामुळे कांदा पिकावर मावा रोगांचा प्रादूर्भाव वाढला असल्याने महागडी औषधाची फवारणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पावसामुळे बऱ्याच लाल कांद्याची प्रतवारी ढासळली असून, आता पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. दरम्यान, यंदा रोपांअभावी उत्पादकांनी कांदा लागवडीऐवजी पेरणीचा मार्ग अवलंबला आहे.

ठळक मुद्देदुष्काळात तेरावा : यंदा लागवडीऐवजी पेरणीचा पर्याय

राजापूर : येवला तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या राजापूर व परिसरात सध्या ढगाळ हवामानामुळेकांदा पिकावर मावा रोगांचा प्रादूर्भाव वाढला असल्याने महागडी औषधाची फवारणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पावसामुळे बऱ्याच लाल कांद्याची प्रतवारी ढासळली असून, आता पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. दरम्यान, यंदा रोपांअभावी उत्पादकांनी कांदा लागवडीऐवजी पेरणीचा मार्ग अवलंबला आहे.

सध्या महागाईत भरमसाठ वाढ झाली असल्याने रासायनिक खते कीडनाशके, शेती औषधाची महागाई भरमसाठ वाढ झालेली. त्यात निसर्गाच्या हवामान बदलामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात संकटात सापडले आहेत . लाल कांदा लागवड झालेली असून, अपेक्षित त्या प्रमाणात यंदा कांदा रोपाअभावी सर्वच शेतकऱ्यांनी कांदा पेरणीचा पर्याय अवलंबला आहे. आता सध्या कांदा जगविण्यासाठी शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात महागडी औषधांची फवारणी करतानाचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. निसर्गाचा हवामान बदलामुळे शेतकऱ्यांना फटका बसतो आहे. सध्या दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असल्याने शेतकऱ्यांना कीटकनाशके, बुरशीनाशक यांचा कांदा पीक वाचविण्यासाठी खर्च होत आहे. कांद्याला कसा बाजारभाव मिळतो, हे माहीत नसले तरी सध्या शेतकरी आशावादी राहून आपल्या शेतामध्ये राबराब कष्ट करताना दिसत आहेत. पीक उत्पादन खर्च यात ताळमेळ बसेल की नाही, याचीही शाश्वती नसते, तरीही शेतकरी आपल्या कुटुंबाची जबाबदारी संपूर्णपणे शेतीवरच पार पाडीत असतो. शेतीत लागणारी रासायनिक खते, मजुरी, फवारणी असा एक एकरासाठी चाळीस ते पन्नास हजार रुपयांचा खर्च शेतकऱ्यांचा झालेला आहे. तरीदेखील आज ना उद्या योग्य भाव मिळेल, या अपेक्षेने पीक जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असल्याचे दिसून येत आहे.

कोट...

शेतकऱ्याला आशावादी राहून आपल्या शेतामध्ये काबाडकष्ट करून शेती कामात व्यस्त राहावे लागते; पण निसर्ग व हवामान बदलामुळे कांदा पीक वाचविण्यासाठी धडपड सुरू आहे. सध्या ढगाळ वातावरण निर्माण झाले असल्याने कांद्यावर मावा रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. शेतकऱ्यांच्या मागे संकटांची मालिका सुरूच असते; परंतु शासन त्यावर ठोस मार्ग काढत नाही.

- समाधान चव्हाण, शेतकरी राजापूर.

टॅग्स :NashikनाशिकweatherहवामानonionकांदाFarmerशेतकरी