शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

ढगाळ हवामानामुळे कांदा पिकाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2021 01:04 IST

येवला तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या राजापूर व परिसरात सध्या ढगाळ हवामानामुळे कांदा पिकावर मावा रोगांचा प्रादूर्भाव वाढला असल्याने महागडी औषधाची फवारणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पावसामुळे बऱ्याच लाल कांद्याची प्रतवारी ढासळली असून, आता पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. दरम्यान, यंदा रोपांअभावी उत्पादकांनी कांदा लागवडीऐवजी पेरणीचा मार्ग अवलंबला आहे.

ठळक मुद्देदुष्काळात तेरावा : यंदा लागवडीऐवजी पेरणीचा पर्याय

राजापूर : येवला तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या राजापूर व परिसरात सध्या ढगाळ हवामानामुळेकांदा पिकावर मावा रोगांचा प्रादूर्भाव वाढला असल्याने महागडी औषधाची फवारणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पावसामुळे बऱ्याच लाल कांद्याची प्रतवारी ढासळली असून, आता पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. दरम्यान, यंदा रोपांअभावी उत्पादकांनी कांदा लागवडीऐवजी पेरणीचा मार्ग अवलंबला आहे.

सध्या महागाईत भरमसाठ वाढ झाली असल्याने रासायनिक खते कीडनाशके, शेती औषधाची महागाई भरमसाठ वाढ झालेली. त्यात निसर्गाच्या हवामान बदलामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात संकटात सापडले आहेत . लाल कांदा लागवड झालेली असून, अपेक्षित त्या प्रमाणात यंदा कांदा रोपाअभावी सर्वच शेतकऱ्यांनी कांदा पेरणीचा पर्याय अवलंबला आहे. आता सध्या कांदा जगविण्यासाठी शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात महागडी औषधांची फवारणी करतानाचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. निसर्गाचा हवामान बदलामुळे शेतकऱ्यांना फटका बसतो आहे. सध्या दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असल्याने शेतकऱ्यांना कीटकनाशके, बुरशीनाशक यांचा कांदा पीक वाचविण्यासाठी खर्च होत आहे. कांद्याला कसा बाजारभाव मिळतो, हे माहीत नसले तरी सध्या शेतकरी आशावादी राहून आपल्या शेतामध्ये राबराब कष्ट करताना दिसत आहेत. पीक उत्पादन खर्च यात ताळमेळ बसेल की नाही, याचीही शाश्वती नसते, तरीही शेतकरी आपल्या कुटुंबाची जबाबदारी संपूर्णपणे शेतीवरच पार पाडीत असतो. शेतीत लागणारी रासायनिक खते, मजुरी, फवारणी असा एक एकरासाठी चाळीस ते पन्नास हजार रुपयांचा खर्च शेतकऱ्यांचा झालेला आहे. तरीदेखील आज ना उद्या योग्य भाव मिळेल, या अपेक्षेने पीक जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असल्याचे दिसून येत आहे.

कोट...

शेतकऱ्याला आशावादी राहून आपल्या शेतामध्ये काबाडकष्ट करून शेती कामात व्यस्त राहावे लागते; पण निसर्ग व हवामान बदलामुळे कांदा पीक वाचविण्यासाठी धडपड सुरू आहे. सध्या ढगाळ वातावरण निर्माण झाले असल्याने कांद्यावर मावा रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. शेतकऱ्यांच्या मागे संकटांची मालिका सुरूच असते; परंतु शासन त्यावर ठोस मार्ग काढत नाही.

- समाधान चव्हाण, शेतकरी राजापूर.

टॅग्स :NashikनाशिकweatherहवामानonionकांदाFarmerशेतकरी