शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

वातावरणातील बदलाने द्राक्षपंढरीत शेतकरी चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 11:13 PM

दिंडोरी तालुक्यातील द्राक्षपंढरी सध्या वातावरणातील बदलावाच्या परिस्थितीमुळे चिंतातुर झाली आहे. त्यामुळे यंदाचा द्राक्षे हंगाम कसा घ्यावा ही मोठी समस्या निर्माण झाल्याने बळीराजा हतबल झाला आहे.

ठळक मुद्देसंकट : यंदाचा हंगाम कसा घ्यावा; शेतकऱ्यांपुढे प्रश्न

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील द्राक्षपंढरी सध्या वातावरणातील बदलावाच्या परिस्थितीमुळे चिंतातुर झाली आहे. त्यामुळे यंदाचा द्राक्षे हंगाम कसा घ्यावा ही मोठी समस्या निर्माण झाल्याने बळीराजा हतबल झाला आहे.दिंडोरी तालुक्याचा संपूर्ण जिल्ह्यात द्राक्षपंढरी म्हणून नामोल्लेख केला जातो. परंतु सध्या या द्राक्षपंढरीला हवामानातील बदल, वातावरणातील बदलाव आदी संकटांनी आक्रमण केल्याने द्राक्षहंगाम पुढील काळासाठी डोकेदुखी बनती काय, असा सवाल उपस्थित होत आहे. सध्या तालुक्यात परतीच्या पावसाने कहर केला असून, शेतकरीवर्गाच्या तोंडातला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने भांडवलाचा तुटवडा ही गहन समस्या शेतकरीवर्गापुढे आ वासून उभी राहिली आहे. तालुक्यात सध्या त्रिसूत्री वातावरण पाहायला मिळत आहे. सकाळी दाट धुके, दुपारी कडक ऊन आणि संध्याकाळी परतीच्या पावसाचे आगमन यामुळे शेतकरीवर्ग मेटाकुटीस आला आहे. दिंडोरी तालुक्यातील द्राक्षे पिकाचे माहेरघर समजले जाणारे लखमापूर, म्हेळुस्के, ओझे, करंजवन, दहिवी, दहेगाव वागळुद, अवनखेड, कोराटे, मोहाडी, मडकीजांब, जांबुटके, परमोरी, राजापूर, मातेरेवाडी, बोपेगाव, खेडगाव, सोनजांब, तिसगाव बहादुरी, मावडी, शिवरे बोराळे, वणी इत्यादी गावांना वातावरणातील बदलावाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. 

द्राक्ष हंगामात अनेक संकटाचा सामना करावा लागत असल्याने द्राक्षे पीक जिवावर बेतत आहे. भरपूर खर्च करून ही उत्पन्नाची एक कवडीही हातात न मिळाल्याने पुढे भांडवल कसे उभे करायचे हा प्रश्न भेडसावत आहे.     - जयदीप देशमुख, द्राक्ष उत्पादक, करंजवण

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी