शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

चाचणीसाठी पुणेगाव कालव्याची सफाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 1:24 AM

पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याद्वारे येवला तालुक्यातील लाभक्षेत्रात येणाऱ्या गावांना पाणी सोडण्यासाठी करण्यात येणा-या चाचणीसाठी कालव्याच्या साफसफाईस प्रारंभ करण्यात आला आहे.

येवला : पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याद्वारे येवला तालुक्यातील लाभक्षेत्रात येणाऱ्या गावांना पाणी सोडण्यासाठी करण्यात येणा-या चाचणीसाठी कालव्याच्या साफसफाईस प्रारंभ करण्यात आला आहे.  माजी उपमुख्यमंत्री तथा येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांनी मागील आठवड्यात मतदारसंघातील काही भागाचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी विखरणी येथे जनतेशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या होत्या. याप्रसंगी पुणेगाव डोंगरगाव पोहच कालव्याची पूरपाण्याने चाचणी घेण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली होती. त्या मागणीची दखल घेऊन धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाला तर पूरपाण्याने या कालव्याची चाचणी घेण्याचे छगन भुजबळ यांनी चाचणीपूर्वी कालव्यातील अडथळे दूर करण्यात यावे अशी मागणी संबंधित विभागाकडे केली होती. या मागणीला साद घालत संबंधित विभागाने कालव्याच्या दुरुस्तीच्या कामाला तत्काळ सुरुवात केल्याची माहिती सहायक बाळासाहेब लोखंडे व पंचायत समितीचे सदस्य मोहन शेलार यांनी दिली आहे.  या कालव्यात मोठमोठे दगड व माती साठली असून, त्यामुळे पाण्याचा वेग कमी होऊ शकतो तसेच या मोठमोठ्या अडथळ्यांमधून पाणी पुढे जाऊ शकणार नाही. तरी सदर कालवा स्वच्छतेबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणीही या पत्रान्वये आमदार भुजबळ यांनी केली होती. कालवा प्रशासनाने या पत्राची तत्काळ दखल घेत कालवा सफाईला सुरुवात केली असून, पुणेगाव ते दरसवाडी या ६३ किमी अंतरापैकी २८ ते ६३ किमी दरम्यान कालव्यातील अडथळे तसेच सफाईचे काम सुरू करण्यात आले असून, दरसवाडी ते बाळापूर दरम्यान काम सुरू करण्याच्या सूचनाही संबंधित विभागाला देण्यात आल्या असल्याची माहितीही मोहन शेलार यांनी दिली आहे. गेल्या वर्षी कालव्याची चाचणी घेण्यात यावी या मागणीसाठी मोहन शेलार यांच्यासह नागरीक कालव्यावरच उपोषणाला बसले होते. उपोषणाची दखल घेत चाचणीला सुरवात झाली होती मात्र दुदैवाने पाउस थांबल्याने व काही ठिकाणी कालवा फोडण्यात आल्याने चाचणी पूर्ण होऊ शकली नव्हती. त्या वेळी आ. छगन भुजबळ तुरु ंगात नसते तर चाचणी पूर्ण झाली असती अशी त्या भागातील शेतकर्यांची भावना आहे. आता छगन भुजबळ स्वत सक्र ीय झाल्याने पुणेगाव आण िदरसवाडी धरण ओव्हरफ्लो झाले तर या वेळेस कालव्याची चाचणी पूर्ण होणारच असा आशावाद लाभक्षेत्रातील जनतेला वाटत आहे. नांदूरमध्यमेश्वर प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याद्वारे येवला लाभक्षेत्रात येणाºया गावांना कालव्याद्वारे पाणी सोडण्याचे प्रस्तावित आहे; मात्र सदर कालव्याची पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढली असून, पूरपाणी सोडल्यास पाण्याच्या प्रवाहाला अडथळा येऊ शकतो.

टॅग्स :Waterपाणी