शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

वादाने टोक गाठलं, आता थेट शिंदे-फडणवीस मध्यस्थी करणार?; गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 11:55 IST

छगन भुजबळ आणि जरांगे पाटील या दोघांकडूनही एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर ही मध्यस्थी केली जाण्याची शक्यता आहे.

नाशिक :मराठा आरक्षण प्रश्नावरून मनोज जरांगे पाटील विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यातील वादाने टोक गाठलं आहे. भुजबळ आणि जरांगे पाटील या दोघांकडूनही एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जात असल्याचं पाहायला मिळत आहे. या दोन नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांमुळे दोन समाजांमध्ये तणाव निर्माण होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. याबाबत प्रश्न विचारण्यात आल्यानंतर भाजप नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांना संयमी भूमिका घेण्यासाठी विनंती करणार असल्याचं महाजन यांनी म्हटलं आहे.

भुजबळ आणि जरांगे पाटलांमधील वादावर बोलताना गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे की, "राज्यातील वातावरण दूषित होता कामा नये. मी दोघांना देखील सांगितलं आहे की, संयम ठेवा. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील दोघांना विनंती करणार आहेत," अशी माहिती महाजन यांनी दिली. तसंच मराठा समाजाला न्याय मिळायला हवा, असंही ते म्हणाले. 

मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज होणार उपसमितीची बैठक

मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं, अशी भूमिका सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी मांडली असली तरी ते आरक्षण कशा पद्धतीने द्यावं, याबाबत मात्र मतभेद पाहायला मिळत आहेत. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाचं ओबीसीकरण करावं, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. या मागणीला काही नेत्यांनी पाठिंबा दिला असला तरी ही मागणी मान्य केल्यास ओबीसींवर अन्याय होईल, असा प्रतिवादही अनेक नेत्यांकडून होत आहे. आरक्षणावरून सुरू असलेल्या या वादात आता गिरीश महाजन यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. आपल्याला सरसकट आरक्षण कुणबी म्हणून देता येणार नाही, अशी भूमिका गिरीश महाजनांनी मांडली.

मराठा आरक्षणाबद्दल बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, "चुकीचं काम होणार नाही, सगळ्या नोंदी जुन्या आहेत. कुणबी नोंदी असलेल्या लोकांना दाखले मिळाले पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. परंतु आम्हाला जे आरक्षण द्यायचं आहे ते टिकणारं द्यायचं आहे. आपल्याला सरसकट आरक्षण कुणबी म्हणून देता येणार नाही. मात्र मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे," अशा शब्दांत महाजन यांनी सरकारची भूमिका मांडली आहे.

बिऱ्हाड मोर्चावरही दिली प्रतिक्रिया

बिऱ्हाड मोर्चाबद्दल बोलताना गिरीश महाजन यांनी मोर्चेकरांशी चर्चा झाली असून बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्याचं सांगितलं आहे. "बिऱ्हाड मोर्चा सुरू आहे. त्यांच्याशी मी काल सविस्तर चर्चा केली. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील चर्चा झाली आहे. त्यांच्या बऱ्याच मागण्या मान्य झाल्या आहेत. स्थानिक पातळीवरील  प्रश्नांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होईल. या बैठकीनंतर ते मोर्चा मागे घेतील, अशी अपेक्षा आहे,' असं महाजन म्हणाले. 

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलChhagan Bhujbalछगन भुजबळ