शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

सप्तशृंगगडावरील चैत्रोत्सवाची सांगता : कीर्तिध्वज फडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 00:42 IST

साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या सप्तशृंगगडावर शुक्रवारी रात्री कीर्तिध्वज फडकवत चैत्रोत्सवाची सांगता झाली. कीर्तिध्वजाचे मानकरी एकनाथ गवळी-पाटील यांनी गडाच्या शिखरावर ध्वज लावला. शेकडो मैल पायी प्रवास करत तळपत्या उन्हात केवळ भगवतीच्या दर्शनाची ओढ घेऊन सप्तशृंगगडावर दाखल होत तब्बल १६ लाख भाविक भगवतीचरणी लीन झाले.

कळवण : साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या सप्तशृंगगडावर शुक्रवारी रात्री कीर्तिध्वज फडकवत चैत्रोत्सवाची सांगता झाली. कीर्तिध्वजाचे मानकरी एकनाथ गवळी-पाटील यांनी गडाच्या शिखरावर ध्वज लावला. शेकडो मैल पायी प्रवास करत तळपत्या उन्हात केवळ भगवतीच्या दर्शनाची ओढ घेऊन सप्तशृंगगडावर दाखल होत तब्बल १६ लाख भाविक भगवतीचरणी लीन झाले. श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या मुख्य कार्यालयात पारंपरिक पद्धतीने मानकरी पुजारी व कीर्तिध्वजाची विधिवत पूजा मुख्य जिल्हा सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे, जिल्हा न्यायाधीश तथा सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या अध्यक्ष श्रीमती यू.एन. नंदेश्वर, विश्वस्त डॉ. रावसाहेब शिंदे, राजेंद्र सूर्यवंशी, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, ध्वजाचे मानकरी दरेगावचे गवळी कुटुंबीय, पोलीसपाटील शशिकांत बेनके-पाटील, शिवसेनेचे गिरीश गवळी, सरपंच राजेश गवळी, माजी सरपंच संदीप बेनके-पाटील, पोलीस निरीक्षक सुजय घाटगे, पोलीस उपनिरीक्षक विनोद जाधोर आदींसह नागरिक उपस्थित होते.  मान्यवर कुटुंबीयांच्या हस्ते कीर्तिध्वजाची विधिवत पूजाअर्चा होऊन देवस्थानच्या मुख्य कार्यालयापासून शिरपूरच्या गोल्डन बॅण्डच्या गजरात पहिल्या पायरीपर्यंत मिरवणूक काढण्यात आली. कीर्तिध्वजाचे मानकरी एकनाथ गवळी पाटील व सहकाऱ्यांकडे कीर्तिध्वज सुपूर्द करण्यात आला. ‘सप्तशृंगीमाता की जय, परशुराम बाला की जय, मार्कंडेय महाराज की जय’ असा जयघोषाने गड परिसरदुमदुमून गेला होता.  कीर्तिध्वज मिरवणुकीदरम्यान लाखोंच्या संख्येने भाविकांनी गर्दी केल्याने पोलीस निरीक्षक सुजय घाटगे, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, माजी सरपंच संदीप बेनके पाटील, सरपंच राजेश गवळी, मयूर बेनके, गणेश बर्डे यांनी गर्दीवर नियंत्रण ठेवले. मध्यरात्री १२ वाजता सप्तशृंगीच्या शिखरावर भगव्या रंगाचा कीर्तिध्वज फडकविण्यात आला. शनिवारी पहाटेपासून देवीभक्तांनी कीर्तीध्वजाचे दर्शन घेतले. राज्याच्या विविध भागातून आलेल्या भाविकांमुळे गड परिसर गजबजून गेला होता. अनेक भाविक घरी परतले असून काही परतण्याच्या मार्गावर आहेत.  समुद्रसपाटीपासून ४६०० फूट उंची असलेल्या सप्तशृंग-गडावरील दरेगावचे पाटील गवळी-पाटील कुटुंबीय सप्तशृंगीच्या शिखरावर चढतात. चढण्यासाठी कुठलाही मार्ग नाही. झाडेझुडपे नाही, खाचखळगे नाहीत मग पाटील शिखरावरती जातात तरी कसे, असा प्रश्न भाविकांमध्ये चर्चेचा असतो. हा चमत्कारिक अनुभव अनुभवण्यासाठी हजारो भाविक गडावर उपस्थित राहातात. कीर्तिध्वज फडकविण्याची परंपरा गवळी कुटुंबाची असून, रात्री ते शिखरावरती जाऊन ध्वजारोहण करतात. दुसºया दिवशी सकाळी कीर्तिध्वज फडकताना दिसतो.  नवरात्रोत्सवात विजयादशमीच्या आदल्या दिवशी म्हणजेच नवमीच्या मध्यरात्री व चैत्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशी (चावदस) च्या मध्यरात्री निशाण लावतात. कीर्तिध्वजासाठी  ११ मीटर उंच व लांब कापड साधारणपणे त्याच मापाची काठीही लागते.  ३ शिखरावर जाताना मार्गातील अनुषंगिक देवतांची पूजा करण्यासाठी ३० ते ३५ किलो वजनाचे पूजा साहित्य, धान्य इत्यादी वस्तू घेऊन जातात. दुपारी ४ वा. सुमारास संपूर्ण गावातून कीर्तिध्वजाची मिरवणूक निघून लाखो भक्तांच्या साक्षीने हा सोहळा पार पडतो.  सायंकाळी ७.३० वा. देवी भगवतीच्या मंदिरात पोहोचून गवळी पाटील कुटुंबीय आई भगवतीसमोर नतमस्तक होऊन शिखरावरती चढून जुना ध्वज काढून त्याजागी नवा ध्वज फडकवून त्याची विधिवत पूजा करण्याची परंपरा कायम आहे. शिखरावर ध्वज फडकविल्यानंतर झेंड्याचे दर्शन घेऊन खान्देशातील देवीभक्त परतीच्या मार्गाला लागतात.

टॅग्स :saptashrungi templeसप्तश्रृंगी देवी मंदिर