शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

छगन भुजबळ यांची शासकीय अधिकाऱ्यांना तंबी

By श्याम बागुल | Published: December 26, 2019 7:01 PM

Metro Project : गेल्या पाच वर्षांपासून सत्तेपासून दूर गेलेल्या छगन भुजबळ यांना शासकीय अधिका-यांच्या वर्तणुकीचा चांगलाच अनुभव आला असून, मतदारसंघातील कामे असो वा सर्वसामान्यांच्या कामांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करताना अधिका-यांच्या उदासीनतेचे प्रदर्शनही घडले आहे.

ठळक मुद्देअधिका-यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली भुजबळ यांच्या कार्यालयात सर्वच अधिका-यांनी पायधूळ झाडण्यास सुरुवात

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : गेल्या दोन दिवसांपासून नाशिक दौ-यावर आलेले ग्रामविकास मंत्री छगन भुजबळ यांनी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून शासकीय कामकाजाचा आढावा व विकासकामांची सद्यस्थिती जाणून घेतानाच अधिका-यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली आहे. शेतकरी कर्जमाफी, शिवभोजन योजना व प्रस्ताविक मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी करताना अधिका-यांनी कर्तव्याचे भान ठेवावे, अशा शब्दात भुजबळ यांनी जाहीरपणे तंबी दिल्याने शासकीय अधिका-यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

गेल्या पाच वर्षांपासून सत्तेपासून दूर गेलेल्या छगन भुजबळ यांना शासकीय अधिका-यांच्या वर्तणुकीचा चांगलाच अनुभव आला असून, मतदारसंघातील कामे असो वा सर्वसामान्यांच्या कामांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करताना अधिका-यांच्या उदासीनतेचे प्रदर्शनही घडले आहे. मात्र पाच वर्षांनंतर पुन्हा परिस्थिती बदलताच, नाशिक दौ-यावर आलेल्या छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयात सर्वच अधिका-यांनी पायधूळ झाडण्यास सुरुवात केली आहे. मंत्रिपद धारण केल्यानंतर पहिल्याच जाहीर कार्यक्रमात मार्गदर्शन करताना भुजबळ यांचा अधिका-यांच्या वर्तनाप्रती असलेला रोष व्यक्त झाला. गेल्या सरकारच्या काळात शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी साडेसहाशे कोटी रुपये जाहीर झालेले असताना दोनशे कोटीच वाटण्यात आले, उर्वरित चारशे कोटी कुठे गेले असा जाहीर सवाल विचारतानाच भुजबळ यांनी महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, त्यासाठी शासनाकडून दिला जाणाºया निधीला इकडे, तिकडे वाटा फुटणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सूचना नागरिकांसमक्ष दिल्या. एवढ्यावरच भुजबळ थांबले नाहीत तर प्रस्तावित शिवभोजन योजनेची यशस्वीता अधिका-यांवर अवलंबून असल्याचे सांगून अधिकारी, मंत्र्यांच्या अधिकाराचे विकेंद्रीकरण सामान्य जनतेसाठी करण्यात आले होते याची आठवण करून दिली. स्व. यशवंतराव चव्हाण यांचा दाखला देत भुजबळ यांनी, लोकप्रतिनिधींनी नको म्हणायला तर अधिका-यांनी होय म्हणायला शिकले पाहिजे, असे यशवंतराव चव्हाण सांगत होते. आता मात्र लोकप्रतिनिधी होय म्हणतात आणि अधिकारी नको म्हणतात ही परिस्थिती मात्र आता बदलावी लागेल, असे जाहीरपणे सुनावले. आपल्या अर्ध्यातासाच्या भाषणात भुजबळ यांनी अधिका-यांच्या कामकाजावरच अधिक जोर दिल्याने व्यासपीठावर बसलेल्या वरिष्ठ अधिका-यांमध्ये चुळबूळ दिसून आली.चौकट===माझा विकासाला विरोध नाहीमाझा कोणत्याही विकास कामाला विरोध नाही, असे स्पष्ट करून भुजबळ यांनी नाशिकमध्ये विकासाची अनेक कामे २०१४ पूर्वी आपण केली आहेत. काही कामे मधल्या काळात रखडली मात्र, आता पुन्हा जोमाने ती कामे पूर्ण करण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले. समाजाला काय हवे याचा शांततेत अधिका-यांनी विचार करून प्रकल्प राबवावेत, अशी सूचना करून नागपूरचा मेट्रो प्रकल्प कसा फेल गेला याची माहिती भुजबळ यांनी उपस्थितांना दिली. विकासकामे करताना त्याची व्यवहार्यता, समाजाला होणारा लाभ व शहराचे सौंदर्य अबाधित कसे राहील याचा विचार अधिका-यांनी करावा असे सांगून, भुजबळ यांनी अधिका-यांना उद्देशून ‘मी विकास करणारा माणूस आहे’ अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.

टॅग्स :FarmerशेतकरीMetroमेट्रोChagan Bhujbalछगन भुजबळNashikनाशिकPoliticsराजकारण