शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
2
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
3
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
4
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
5
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
6
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
7
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
8
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
9
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
10
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
11
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...
12
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
13
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
14
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
15
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
16
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
17
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
18
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
19
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
20
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश

बदलत्या वातावरणाचा द्राक्षांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 01:39 IST

जळगाव नेऊर : परिसरात बदलते वातावरण, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा शिल्लक द्राक्षबागांना फटका बसत असून, माल देण्यासाठी शेतकरी व्यापाऱ्यांच्या शोधात आहेत.

ठळक मुद्देखर्चही फिटेना : शेतकरी व्यापाऱ्यांच्या शोधात; डावणी, भुरी रोगाचा प्रादुर्भाव

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव नेऊर : परिसरात बदलते वातावरण, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा शिल्लक द्राक्षबागांना फटका बसत असून, माल देण्यासाठी शेतकरी व्यापाऱ्यांच्या शोधात आहेत.धुके, पाऊस, ढगाळ वातावरण तर कधी कडाक्याची थंडी यामुळे फुगवणीवर झालेला परिणाम, बेसुमार फवारण्या या सर्वांवर मात करून, आज जो काही द्राक्षमाल झाडाला आहे त्यासाठी व्यापाºयांची कमतरता शेतकºयांना भेडसावत आहे. ज्या शेतकºयांच्या मालाला दर्जा आहे अशा निर्यातक्षम द्राक्षांना बºयापैकी दर आहे. द्राक्षबागांना डावणी, भुरी, मण्यांना तडे जाणे हा प्रकार होत असल्याचे उत्पादक सांगत आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च कसा सुटेल, असा प्रश्न पडला आहे. त्यात शासनाने मागील अवकाळीचे अनुदान अद्यापही शेतकºयांच्या खात्यावर वर्ग केले नसल्याने अस्मानी व सुलतानी संकटात शेतकरी सध्यातरी दिसत आहे. माझी दोन एकर द्राक्षबाग असून, सध्या एक एकर द्राक्षबाग देण्यासाठी आलेली आहे; परंतु बदलते वातावरण आणि परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात खर्च होऊन मालाचे नुकसान झाले आहे. सध्या द्राक्षासाठी मिळणारा दर हा शेतकºयांसाठी परवडत नसून मालही कमी प्रमाणात असल्याने खर्चाचा आणि उत्पन्नाचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकºयांचा त्यातून खर्चही भरून निघत नाही. वर्षभर मेहनत करूनही शेतकºयांच्या पदरात काहीच पडत नसल्याने द्राक्षबागांचे संकट भविष्यात उभे राहिले आहे.- दीपक दाते,द्राक्ष उत्पादक, जळगाव नेऊरद्राक्षांला २५ ते ३० रुपयांपर्यंत भाव1सध्या द्राक्षाला २५ ते ३० रुपयांच्या आसपास दर मिळत आहे; परंतु आज सुरू असलेल्या द्राक्षबागा शेतकºयांनी मोठ्या संकटातून वाचविलेल्या आहे. खते, औषधे यांचा मोठ्या प्रमाणात खर्च झालेला असून, त्या प्रमाणात शेतकºयांना दर मिळत नसल्याने खर्चही भरून निघत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.2निर्यातक्षम द्राक्षांना बºयापैकी ८० ते ९० रुपयांपर्यंत दर मिळत आहे, परंतु एक महिना परतीचा चाललेला पाऊस यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकºयांना निर्यातक्षम द्राक्षासाठी अडचणी आल्या. मोठ्या प्रमाणात फवारण्या करूनही द्राक्षबागा लोकल व्यापाºयांना द्याव्या लागत आहेत.3जळगाव नेऊर, मुखेड परिसरात मोजक्याच शेतकºयांकडे द्राक्षबागा असल्याने व्यापारी या भागात येण्यास उत्सुक नसतात, परिणामी वाहतूक भाडे, मजुरी वाढत असल्याने द्राक्षबागा व्यापारी कमी दराने खरेदी करतात, यावर्षी मात्र वातावरणातील बदलामुळे, तसेच दर्जा घसरल्यामुळे व्यापारीवर्गाची वानवा आहे.

टॅग्स :Green Planetग्रीन प्लॅनेटFarmerशेतकरी