शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

चाळीला आग लागून लाखोंचा कांदा खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 17:37 IST

जायखेडा : सुमारे १४ लाख रुपयांचे नुकसान

ठळक मुद्देझाडांच्या फांद्यांच्या सहाय्याने आग आटोक्यात

जायखेडा : जायखेडा येथील प्रगतशील शेतकरी तथा पंचायत समितीचे माजी सभापती सोमनाथ केदू ब्राम्हणकार यांच्या कांदा चाळीस सोमवारी (दि.२०) रात्री दोन वाजेच्या सुमारास अकस्मात आग लागल्याने जवळपास १५०० क्विंटल कांदा जळून खाक झाला. यात शेतीउपयोगी साहित्यासह कांदा चाळ व साठवून ठेवलेला कांदा असे सुमारे १३ लाख ८२ हजार रु पयांचे नुकसान झाले.जायखेडा गावाजवळील आदिवासी वस्तीलगत असलेल्या स्वमालकीच्या खळवाडीत ८० फुट लांब पाचटचे छत असलेल्या कांदा चाळीत शेतकऱ्याने दोनही बाजूंच्या कप्प्यात ५० ते ६० ट्रॉली कांदा साठवून ठेवला होता. आज सोमवारी उत्तररात्री दोन वाजेच्या सुमारास कांदा चाळीला अकस्मात आग लागल्याने मोठ्या प्रमाणात कांदा जळून खाक झाला. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. आग लागल्याची कुठलीही ठोस शक्यता नसतांना ही आग लागली कशी, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील रहिवाशी कन्हैया काठेवाडी, रज्जू मन्सुरी, योगेश ब्राम्हणकार, दिलीप लोंढे, अशोक अहिरे, उद्धव ब्राम्हणकार, मच्छिंद्र अहिरे, युनुस मन्सुरी, विजय अहिरे, जब्बार पठाण, अमोल अहिरे, शकील मन्सुरी, रामदास खैरनार, अमोल लोंढे, योगेश खैरनार, शिवाजी खैरनार, भावडू नाहिरे, दादाजी ठाकरे, किरण ब्राम्हणकार, डॉ. संदीप ब्राम्हणकार, आदींसह आदिवासी वस्तीवरील तरु णांनी घटनास्थळी धाव घेवून झाडांच्या फांद्यांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. दुर्दैवाने या आगीत साठवलेल्या कांद्याचे मोठे नुकसान झाले असून, दिवसभर गावातील अनेकांनी घटनास्थळी भेट देऊन हळहळ व्यक्त करीत ब्राम्हणकार कुटुंबियांना दिलासा दिला. जायखेडा मंडळ अधिकारी एस. के. खरे, तलाठी संतोष घोडेराव यांनी पाहणी करून पंचनामा केला. झालेल्या नुकसानीची शासनाकडून भरपाई मिळावी अशी मागणी सोमनाथ ब्राम्हणकार, सुदाम ब्राम्हणकार, देवदत्त ब्राम्हणकार, संजय ब्राम्हणकार यांनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकfireआग