शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

चेंबर दुर्घटना : मनपाच्या गलथान कारभाराचा अजीम बळी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 17:09 IST

एका चेंबरमध्ये पडून सात वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या चिमुकल्याच्या मृत्यूला नेमके कोण जबाबदार? असा प्रश्न येथील संतप्त रहिवाशांनी उपस्थित केला असून आजीम हा लहानगा प्रशासकीय उदासिनतेचा बळी ठरल्याची भावना व्यक्त केली.

ठळक मुद्दे‘त्या’ दोघींचे प्रसंगावधान पण...,नुकसानभरपाईची मागणीसात वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

नाशिक : महापालिकेच्या भूयारी गटारीच्या उघड्या चेंबरच्या बाबतीत अनेकदा ओरड केली जाते; मात्र असे चेंबर अपघात जोपर्यंत घडत नाही, तोपर्यंत संबंधित विभागाकडून बंदिस्त केले जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वडाळागावातील सादिकनगर भागात अशाच एका चेंबरमध्ये पडून सात वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या चिमुकल्याच्या मृत्यूला नेमके कोण जबाबदार? असा प्रश्न येथील संतप्त रहिवाशांनी उपस्थित केला असून आजीम हा लहानगा प्रशासकीय उदासिनतेचा बळी ठरल्याची भावना व्यक्त केली.भूमीगत गटारींच्या चेंबरमध्ये पडून मजूरापासून प्राण्यांपर्यंत मृत्यूच्या अनेकदा घटना घडल्या आहेत; मात्र याबाबत महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने या घटना अद्यापही थांबलेल्या नाहीत. वडाळागावातील महेबुबनगर, सादिकनगर, साठेनगर हा स्लम परिसर आहे. या भागात बहुतांश चेंबरवरील ढापे गायब झाले असून मनपाने ते चेंबर बंदिस्त करण्याची मागणी वारंवार केली जाते, मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने अशाप्रकारच्या दुदैर्वी घटना घडत असल्याचे येथील रहिवाशी लाला शहा, इरफान शेख, युनुस खान, फिरोज फारूखी, जबेर खान आदिंनी सांगितले. उघडे चेंबर वेळोवेळी मनपाच्या भूयारी गटार विभागाने बंदिस्त केल्यास लहान मुलांपासून मुक्या प्राण्यांपर्यंत कोणाचाही जीव जाणार नाही, असे नागरिकंनी म्हटले आहे.‘त्या’ दोघींचे प्रसंगावधान पण...,मनपाच्या उर्दू शाळेत इयत्ता दुसरीत शिकणारा आजीम जुबेर खान (७) हा चिमुकला साधारणत: आठवडाभरापुर्वी सादिकनगरमधील एका गल्लीत असलेल्या उघडल्या चेंबरमध्ये पडला. यावेळी आजिम जोरात ओरडला, त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकून तत्काळ सुरय्या शेख, जकिया शेख या महिलांनी चेंबरच्या दिशेने धाव घेतली. दोघींनी क्षणाचाही विलंब न लावता आजिमला कसेबसे तत्काळ बाहेर काढले. तोपर्यंत स्थानिक नागरिकांची चेंबरभोवती मोठी गर्दी जमली होती. चिमुकल्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने जिल्हा रूग्णालयात उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत गुरूवारी (दि.२८) मालवली.नुकसानभरपाईची मागणीचिमुकला आजीमचा चेंबरच्या ढाप्यात कोसळून मृत्यू झाला. यास मनपाचा गलथान कारभार जबाबदार आहे. अजिमचे कुटुंब अत्यंत गरीब असून वडील फळविक्रेता आहे. अजिम अभ्यासात हुशार असल्याने सादिकनगरमध्ये तो सर्वांचाच लाडका होता. त्याच्या अचानकपणे जाण्याने मोठा आघात कुटुंबियांवर झाला. तसेच संपुर्ण परिसरात शोककळा व्यक्त होत आहे. या कुटुंबाला महापालिका प्रशासनाने नुकसानभरपाई म्हणून आर्थिक मदत देण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाAccidentअपघातDeathमृत्यूStudentविद्यार्थी