शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

गणेशोत्सव साजरा करा, मात्र उथळपणा नको: महाराष्टÑ अंनिसचे  कार्याध्यक्ष अविनाश पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 23:32 IST

नाशिक- निर्माल्य दान त्यानंतर विसर्जित गणेश मूर्ती दान आणि आता पर्यावरण स्नेही उत्सव अशा विविध टप्प्यातून जनतेला सुखावेल असा उत्सव साजरा करण्यााबत आता जागृती झाली आहे. त्या मागे महाराष्टÑ अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे कार्य मोठे आहे. श्रध्देला धक्का न लावता ही लोकचळवळ झाली आहे. अर्थात, सोमवारपासून राज्यभरात गणेशोत्सव साजरा होत असताना तो उत्सव असावा मात्र उथळपणा त्यात नसावा असे मत समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देपर्यावरण स्नेही उत्सवासाठी समिती आग्रहीलोकांमध्ये प्रबोधन चांगले झाले आहे

नाशिक- निर्माल्य दान त्यानंतर विसर्जित गणेश मूर्ती दान आणि आता पर्यावरण स्नेही उत्सव अशा विविध टप्प्यातून जनतेला सुखावेल असा उत्सव साजरा करण्यााबत आता जागृती झाली आहे. त्या मागे महाराष्टÑ अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे कार्य मोठे आहे. श्रध्देला धक्का न लावता ही लोकचळवळ झाली आहे. अर्थात, सोमवारपासून राज्यभरात गणेशोत्सव साजरा होत असताना तो उत्सव असावा मात्र उथळपणा त्यात नसावा असे मत समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी व्यक्त केले.प्रश्न- पर्यावरण पूरक गणेशोत्सव सुरू करण्याच्या महाराष्टÑ अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या आता पर्यंतच्या चळवळीकडे बघून काय वाटते ?पाटील: अंधश्रध्दा निर्मुलन समिती स्थापन होऊन सुमारे ३५ वर्षे झाली तर निर्माल्य मूर्ती दान आणि मूर्ती दानाची संकल्पना राबवून सतरा ते अठरा वर्षे झाली आहेत. कोल्हापुर येथे पंचगंगा नदी प्रदुषीत होऊ नये यासाठी सर्व प्रथम निर्माल्य दानाची संकल्पना राबविण्यात आली आणि नंतर ती पुढे अनेक जिल्ह्यात राबविली गेली. पुढे श्रध्दास्थानाला धक्का न लावता विसर्जित गणेशमूर्ती दान करण्याची संकल्पना डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी राबवली. त्यालाही प्रतिसाद मिळु लागला. नाशिक शहरात तर दरवर्षी मूर्ती दान लाखापेक्षा अधिक होते. त्यावेळी समितीने उत्सव पर्यावरणपुर्वक कसा साजरा करावा यासाठी प्रदर्शन तयार करून घेतले होते त्यातील भित्ती चित्रे अनेक मंडळांच्या देखाव्यात वापरली जात होती. ध्वनीक्षेपकावर मर्यादा, प्लास्टीक बंदी, वेळेचे बंधन ही त्यावेळी प्रदर्शनात असलेली चित्रेच आज पर्यावरण पूरक गणेशोत्सव म्हणून अमलात येत आहेतप्रश्न: शासनाचा प्रतिसाद कसा आहे, आणखी काय केले पाहिजे?पाटील : मुळात कोणत्याही उत्सवात होणारे प्रदुषण रोखण्याासाठी जबाबदारी निश्चीत झाली पाहिजे यासाठी समितीच्या कार्यकर्त्याने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यानुसार शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर जबाबदारी देण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत योग्य ती अंमलबजावणी होते आहे किंवा नाही याबाबत पहाण्याची जबाबदारी उच्च न्यायलयाने दिली. शासनाने नियम केले वगैरे ठीक आहे. परंतु शासनाचे प्रदुषण नियंत्रण विभाग अत्यंत पंगू आहे. तेव्हा आर्थिक तरतूद आणि सुविधा देऊन असे विभाग सक्षम केले पाहिजे.प्रश्न: यंदा होऊ घातलेल्या गणेशोत्सवाविषयी काय सांगाल?पाटील : पर्यावरणाबाबत लोकांमध्ये जागृकता झाली आहे. गणेशोत्सवाचे स्वरूप बदलु लागले आहे. त्यात गैरप्रकार देखील होऊ लागले आहेत. तथापि, मनुष्य हा समाजशील असल्याने एकत्र येण्याचे साधन म्हणून उत्सवाकडे बघायचे ठरले तर त्यातील उथळपणा थांबला पाहिजे. उत्सवाबाबत मुल्यमापन झाले पाहिजे.मुलाखत- संजय पाठक

टॅग्स :NashikनाशिकMaharashtra Andhashraddha Nirmulan Samitiमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीAvinash Patilअविनाश पाटील