शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

खबरदारी : मेनरोडसह बाजारपेठांमध्ये आता सम-विषमची आखणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 17:37 IST

शासनाने सर्व व्यवहार सुरळीत करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले आणि अडीच ते तीन महिन्यांनंतर बाजारपेठा सुरू झाल्याने मध्यवर्ती बाजारपेठेत प्रचंड गर्दी उसळली. त्यामुळे महापालिकेने हा गोंधळ टाळण्यासाठी आता मेनरोडसारख्या बाजारपेठांमध्ये सम आणि विषम तारखेला कोणती दुकाने सुरू राहतील याच्या आखणीला प्रारंभ केला आहे.

ठळक मुद्देमिशन बिगेन अंतर्गत शहरात दुकाने सुरूबाजारपेठांमध्ये सम-विषमची आखणी गोंधळ टाळण्यासाठी महापावलिकेचे पाऊल

नाशिक : मिशन बिगेन अंतर्गत शहरात दुकाने सुरू करण्याठी महापालिकेने परवानगी दिली. मात्र, त्यासाठी सम-विषमची अट असतानादेखील ती धुडाकावून सर्वच बाजारपेठा सुरू झाल्याने गोंधळ उडाला. शहरातील कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन महापालिकेने हा गोंधळ टाळण्यासाठी आता मेनरोडसारख्या बाजारपेठांमध्ये सम आणि विषम तारखेला कोणती दुकाने सुरू राहतील याच्या आखणीला मंगळवार (दि.९)पासून प्रारंभ केला आहे. आता त्यानंतरही व्यावसायिकांनी उल्लंघन केल्यास संंबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.  गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून शहरातील सर्व बाजारपेठा बंद आहेत. शासनाने आता सर्व व्यवहार सुरळीत करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले आणि महापालिका आयुक्तांना यासंदर्भातील शिथिलतेचे अधिकार दिले. त्यानुसार शहरातील बाजारपेठा सुरळीत करण्यासाठी गेल्या आठवड्यात शुक्रवारी (दि.५) आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी व्यापारी संघटना प्रतिनिधींची बैठक घेतली आणि सम-विषम यापद्धतीनेच दुकाने सुरू करता येतील असे सांगितले तर ज्या ठिकाणी सम-विषम लागू करण्यायोग्य बाजारपेठा नाही त्याबाबत विभागीय अधिकारी निर्णय घेतील, असे जाहीर केले. त्यानंतर शनिवारी (दि.६) बाजारपेठा खुल्या झाल्या; परंतु कोणत्याही प्रकारे सम-विषम तारखानुसार दुकाने सुरू करण्याचे पथ्य पाळले नाही. अडीच ते तीन महिन्यांनंतर बाजारपेठा सुरू झाल्याने मध्यवर्ती बाजारपेठेत प्रचंड गर्दी उसळली.  नाशिकमध्ये आधीच कोरोनाबाधितांची संख्या वाढत जाऊन चारशेच्या पुढे गेली असताना बाजारपेठात झालेली गर्दी धडकी भरवणारी ठरली. त्यातच अनेकांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले नव्हते की, मास्क नव्हते. जंतुनाशकांनी परिसर स्वच्छ ठेवण्याबाबतदेखील काळजी घेतली जात नव्हती. त्यानंतर महापालिकेने आता अशाप्रकारे नियम भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास दुकाने बंद करतानाच संबंधितांच्या विरोधात साथरोग प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. महापालिकेने आता स्वत: सम-विषमच्या अंमलबजावणीस पुुढाकार घेतला आहे. त्यानुसार मेनरोडसह अन्य भागांत बाजारपेठेतील कोणती दुकाने सम तारखेस उघडतील आणि कोणती विषम तारखेस त्यासंदर्भातील आखणी सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर मात्र, नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार आहे, असे महपालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNashikनाशिकMarketबाजारShoppingखरेदीconsumerग्राहक