शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
3
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
4
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
5
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
6
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
7
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
8
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
9
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
10
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
11
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
12
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
13
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
14
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

थेट सरपंचपदासाठी उमेदवारांमध्ये चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 1:04 AM

: स्थानिक संस्थांच्या निवडणुकीमध्ये झालेल्या सत्ता हस्तांतरणानंतर होऊ घातलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत व विशेषत: जनतेतून थेट सरपंच निवडण्यात येणार असल्यामुळे गावोगावी अधिक चुरस निर्माण झाल्याचे दाखल झालेल्या उमेदवारी अर्जातून स्पष्ट होत आहे. सरपंचपदाच्या १७१ जागांसाठी ८०९ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे ही निवडणूक रंगतदार ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नाशिक : स्थानिक संस्थांच्या निवडणुकीमध्ये झालेल्या सत्ता हस्तांतरणानंतर होऊ घातलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत व विशेषत: जनतेतून थेट सरपंच निवडण्यात येणार असल्यामुळे गावोगावी अधिक चुरस निर्माण झाल्याचे दाखल झालेल्या उमेदवारी अर्जातून स्पष्ट होत आहे. सरपंचपदाच्या १७१ जागांसाठी ८०९ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे ही निवडणूक रंगतदार ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मुदत संपणाºया नाशिक जिल्ह्णातील १७१ ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू झाली असून, शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी सर्वच ठिकाणी इच्छुकांची झुंबड उडाली. राज्य सरकारने सरपंचांची थेट जनतेतून निवड करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्यांदाच होणाºया ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ग्रामीण भागात प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. राज्यात झालेले सत्तांतर व त्यापाठोपाठ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही परिवर्तनाचे वारे वाहिल्यामुळे या निवडणुकीत राजकीय पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविता येणार नसल्या तरी, प्रामुख्याने सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद अजमाविण्याचा निर्णय घेऊन उमेदवारांचे पॅनल तयार केले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी दुरंगी, तर काही ठिकाणी तिरंगी, चौरंगी लढत होत असल्याने निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्याही कमालीची वाढली आहे.  जिल्ह्णात १७१ ग्रामपंचायतींसाठी ५९३ प्रभागातील १६४७ जागांसाठी येत्या ७ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार असून, त्यासाठी ग्रामपंचायत सदस्यपदासाठी ३९६७ उमेदवारांनी, तर सरपंचपदासाठी ८०९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या सर्व अर्जांची सोमवारी छाननी करण्यात येणार असून, २७ सप्टेंबर रोजी माघारीची अंतिम मुदत व त्यानंतर निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकीसाठीही आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्यामुळे उमेदवारांना त्यांच्या खर्चमर्यादेतच उधळपट्टी करता येणार आहे.