शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

कुंभनगरीत अचानक उंट येतात अन्...; ३५ दिवसांच्या पायी प्रवासानंतर पोहचणार वाळवंटात!

By अझहर शेख | Updated: May 20, 2023 15:13 IST

साधारणत: वीस दिवसांपुर्वी अचानकपणे कुंभनगरी नाशिकच्या तपोभूमीत १११उंटांचा कळप काही प्राणीप्रेमींना नजरेस पडला होता

नाशिक : शहरासह जिल्ह्यात पंधरवड्यापूर्वी अचानकपणे दाखल झालेल्या १५४ उंटांनी नाशिककरांना जसा आश्चर्याचा धक्का दिला; तसा शासकीय-प्रशासकीय यंत्रणांच्या विविध विभागांपुढेही आव्हान उभे केले होते. तपोवनातून ताब्यात घेण्यात आलेले १११ उंट आणि मालेगावजवळ ताब्यात घेतलेले ४३ उंटांच्या संगोपनाची जबाबदारी मालेगावच्या गाेशाळा, चुंचाळेच्या पांजरापोळ संस्थांनी लीलया पार पाडली. दुर्दैवाने पांजरापोळमध्ये १२ आणि गोशाळेत एक असे १३उंट या कालावधीत मृत्यूमुखी पडले. पांजरापोळमधून ९७उंटांचा कळप राजस्थानच्या दिशेने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर शुक्रवारी (दि.१९) पोलिस बंदोबस्तात रवाना झाला. गेली पंधरा दिवस ‘लोकमत’ने उंटांबाबतच्या घडामोडींवर लक्ष ठेवत सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या मुळभूमीत त्यांना पोहचविण्याचा निर्णय प्रशासनाने अखेर घेतला. मुळ राजस्थानच्या उंट संवर्धनासाठी कार्यरत संस्थाही प्रशासनाच्या संपर्कात आल्या आणि या उंटांचा अखेर मरूभूमीच्या दिशेने प्रवासक कुंभनगरीतून सुरू झाला. 

साधारणत: वीस दिवसांपुर्वी अचानकपणे कुंभनगरी नाशिकच्या तपोभूमीत १११उंटांचा कळप काही प्राणीप्रेमींना नजरेस पडला होता. शहरात इतक्या मोठ्यासंख्येने उंट दिसण्याची ही पहिलीच वेळ असल्याने प्राणीप्रेमी व आजुबाजुचे नागरिकही अवाक‌् झाले. पोलिसांनाही फोन फिरविले गेले अन् तेथून सरकारी यंत्रणा हलली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने हे सर्व उंट ताब्यात घेतले गेले आणि शहराजवळच्या चुंचाळे येथील पांजरापोळमध्ये रात्री पोहचविण्यात आले. उंटांसोबत जे ‘मदारी’ लोक होते, त्यांच्या आधारकार्डावरील पत्ते नाशिक तपोवनातीलच आढळले. त्यांनी सुरूवातीला हे उंट आमचे वडिलोपार्जित असल्याचा दावा केला; मात्र या दाव्यावर ते ठाम राहिले नाही, अन‌् ठोस कागदपत्रेही सादर करू शकले नाहीत. या उंटांची अवस्था मरणासन्न झालेली होती. पशुसंवर्धन विभागाने पंधरा दिवस अथक परिश्रम घेत उंटांवर औषधोपचार केले. उंटांची प्रकृती सुधारावी यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या चमूने अथक परिश्रम घेत आपले कौशल्य पणाला लावले. दुर्दैवाने बारा उंटांना ते वाचवू शकले नाही. नाशिक शहराच्या मध्यवर्ती भागातून मार्गस्थ होत उंटांचा जथा दिंडोरी रोडवर दुपारी साडेतीनच्या सुमारास सुरक्षितरीत्या पोहोचला. उंटांना बघण्यासाठी ठिकठिकाणी नागरिकांनी गर्दी केली होती.आनंदाची बाब म्हणजे चार दिवसांपूर्वीच एका गर्भवती सांडणीने मालेगावच्या गोशाळेत ‘टोडिया’ला (उंटाचे पिल्लू) जन्म दिला.

दोन उंट नाशिकलाच!

पांजरापोळमधून कळप बाहेर पडताच त्यामधील एक उंट अचानकपणे प्रवेशद्वाराबाहेर कोसळला. यामध्ये एका उंटाच्या तोंडाला जखमाही झालेल्या आहेत. त्याची प्रकृती गंभीर आहे. त्यास पांजरापोळमध्ये ठेवण्यात आले आहे. एक्स्लो पॉइंटला चक्कर येऊन आणखी एका कमी वयाच्या उंटाने अस्वस्थ होऊन जमिनीवर बसून घेतले होते. त्यालाही त्वरित रेस्क्यू करीत पशुसंवर्धन विभागाच्या पथकांनी तातडीचे वैद्यकीय उपचार दिले. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. गिरीष पाटील यांनी सांगितले. सिडकोतील मंगलरूप गोशाळेत त्या उंटाचा पुढील काही दिवस सांभाळ करणार असल्याचे पुरुषोत्तम आव्हाड यांनी सांगितले.

उंटांच्या संगोपनासाठी या संस्था झटल्या

राजस्थानच्या सिरोहीमधील महावीर कॅमल सेंच्युरी, पाली जिल्ह्यातील सादडी येथील लोकहित पशुपालक संस्था, गुजरातच्या धरमपूरमधील श्रीमद राजचंद्र मिशन आणि नाशिकच्या मंगलरूप गोशाळा या संस्थांनी उंटांच्या संवर्धनासाठी चांगला पुढाकार घेतला. पंधरा दिवस पांजरापोळ संस्थेने शंभर उंटांचा सांभाळ केला. तसेच मालेगावच्या गोशाळेनेही ४३ उंटांचे संगोपन केले. तसेच पशुसंवर्धन विभागाचे डॉ. सचिन वेंदे, डॉ. वैशाली थोरात, डॉ. संदीप पवार यांनीही सतत वॉच ठेवत उंटांना वेळोवेळी औषधोपचार दिले. यामुळे उंटांचा कळप पुन्हा राजस्थानच्या दिशेने कूच करू शकला.

लोकहित पशुपालक संस्थेचे सात रायकांची मोठी जबाबदारी

नाशिकमधील उंटांना त्यांच्या मातृभूमी राजस्थानपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी पाली जिल्ह्यातील सादडी गावाच्या आजुबाजुला राहणाऱ्या लोकहित पशुपालक संस्थेच्या सात ‘रायका’लोकांनी स्वीकारली आहे. रायका म्हणजे अर्ध भटका समाज जो राजस्थान, गुजरातमध्ये वास्तव्यास आहे. त्यांना देवासी, रबारी अशा नावानेही ओळखले जाते. हा समाज पिढीजात उंटपालक म्हणून ओळखला जातो. उंटांचे पालनकरत आपली उपजिविका चालविणे हा या समाजाचा मुळ पारंपरिक व्यवसाय राहिला आहे. 

मालेगावातील उंटांचा प्रवास अडकला ‘कोर्टा’त

मालेगावाच्या गोशाळेत दाखल असलेल्या ४२ उंट आणि एका नवजात पिल्लाचा राजस्थानच्या दिशेने होणारा प्रवास आता ‘कोर्टा’त अडकला आहे. शुक्रवारी उंटांचा जत्था प्रवास करू शकला नाही, कारण या उंटांसोबत जे लोक होते ते मुळत: अहमदनगरचे ‘मदारी’ लोक आहेत. त्यांनी उंटांवर दावा करत मालेगाव न्यायालयाकडे दाद मागितली. यामुळे उंटांचा या प्रकरणावर सुनावणी झाल्यानंतर तालुका न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार उंटांच्या प्रवासाबाबत जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनाकडून निर्णय घेतला जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. 

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसRajasthanराजस्थान