शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

कॉ. माधवराव गायकवाड यांचे निधन : आज अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 1:36 AM

विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते, माजी आमदार कॉ. माधवराव गायकवाड उपाख्य बाबूजी यांचे वयाच्या ९५व्या वर्षी मनमाड येथील निवासस्थानी निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते.

मनमाड : विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते, माजी आमदार कॉ. माधवराव गायकवाड उपाख्य बाबूजी यांचे वयाच्या ९५व्या वर्षी मनमाड येथील निवासस्थानी निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. श्रमिक, मजूर व कष्टकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी आयुष्य वेचणारा ‘आपला माणूस’ गमावल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. त्यांच्या पश्चात पत्नी कुसुमताई व मुलगी अ‍ॅड. साधना गायकवाड असा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी मंगळवारी (दि. १३) होणार आहे.  नगर जिल्हातील खंडकरी शेतकºयांच्या लढ्यामुळे सामान्य कष्टकरी शेतकºयांचे नेते म्हणून बाबूजींना ओळखले जात. १९५७ ते १९६२च्या कालावधीत विधान परिषदेची निवडणूक संयुक्त महाराष्ट्राच्या झेंड्यासाठी त्यांनी लढवली होती. त्या वेळेस दादासाहेब गायकवाड, आचार्य अत्रे, एस. एम. जोशी, साने गुरुजी, ना. ग. गोरे असे अनेक दिग्गज त्यांच्या बरोबर होते. त्याच बरोबर डॉ. ए.बी. वर्धन, सुधाकर रेड्डी, डी.राजा यांच्या सारखे अनेक कम्युनिष्ट नेते त्यांना सहकारी म्हणून लाभले. नांदगाव तालुक्यातून अनेक निवडणुका लढविल्या; परंतु प्रवाहाच्या विरुद्ध राजकारणात असल्याने त्यांना अनेक निवडणुकीत निसटता पराभव स्वीकारावा लागला. १९७४ ते १९८१ पर्यंत मनमाड शहराचे थेट नगराध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला होता. १९८४ मध्ये गायकवाड यांनी कोपरगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली. प्रतिस्पर्धी उमेदवार बाळासाहेब विखे पाटील असल्याने ती निवडणूक राज्यात प्रतिष्ठेची ठरली होती. त्यावेळी बीबीसी रेडीओने त्यांच्या उमेदवारीची दखल घेऊन वृत्त प्रसिध्द केले होेते. या वृत्तामुळे कॉँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी शेवटच्या दोन दिवसात प्रतिष्ठा पणाला लावली होती. या निवडणुकीत माधवराव गायकवाड यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर काही महिन्यातच विधानसभेची निवडणूक जाहीर झाली. १९८५ चा तो काळ होता. लोकसभेच्या निवडणुकीतील पराभव मनमाडसह परिसरातील ग्रामीण भागातील जनतेच्या जिव्हारी लागला होता. सर्व कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून विजयाची माळ गायकवाड यांच्या गळ्यात घातली होती. आपल्या आक्रमक शैलीने त्यांनी विधानसभेत आवाज उठवून तालुक्यासाठी अनेक योजना मंजूर करून आणल्या होत्या.अल्प परिचय...कॉ माधवराव गायकवाड यांचा जन्म १८ जुलै १९२४ रोजी मनमाड येथील सर्वसामान्य कुटुंबात झाला.बालपणापासून त्यांना सामाजिक कार्याची आवड होती. त्यांचे शिक्षण येथील छत्रे विद्यालयात झाले. परिसरात त्यांना बाबूजी म्हणून ओळखले जात.राज्यातील खंडकरी शेतकर्यांचे ते नेते होते . शेतकºयांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक वर्षे लढा उभारून शेतकºयांना न्याय मिळवून दिला.१९६० ते १९६२ पर्यंते ते विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते होते. त्यानंतर १९७४ साली राज्यात प्रथमच जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडीसाठी निवडणूक झाली.त्यात कॉ. गायकवाड यांना मनमाड नगर परिषदेवर जनतेतून थेट नगराध्यक्ष होण्याचा मान मिळाला. १९७४ ते १९८१ पर्यंत ते नगराध्यक्ष होते.१ सप्टेंबर १९७८ रोजी त्यांची भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव म्हणून निवड झाली. १९८५ साली नांदगाव-मनमाड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकून ते आमदार झाले. त्यांच्या कार्यकाळात नांदगाव तालुका हा भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा बालेकिल्ला मानला जात होता.जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली होती.

 

टॅग्स :NashikनाशिकDeathमृत्यू