शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Dabholkar Case: मोठी बातमी! अखेर डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला; अंदुरे, कळसकरला जन्मठेप
2
‘पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, त्यांना सन्मान द्या, तसं न झाल्यास...’ मणिशंकर अय्यर यांचं विधान 
3
'५ वर्षांसाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार'; खासदार अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय
4
विरोधकांचा आरोप करण्याचा स्तर ढासळला, आम्ही त्यांना.., एकनाथ शिंदेंचं प्रियंका चतुर्वेदी आणि ठाकरे गटाला प्रत्युत्तर 
5
Akshaya Tritiya च्या मुहूर्तावर Gold महागलं, चांदीही ८५००० रुपयांपार; जाणून घ्या आजचा भाव
6
भाजपा आमदार सुरेश धस यांचं धमाकेदार भाषण; घरफोडीवरून शरद पवार, रोहित पवारांना सुनावलं
7
हैदराबादच्या राणीची मेट गालामध्ये हवा; ८३ कोटींचा ड्रेस परिधान करुन रेड कार्पेटवर केली एन्ट्री
8
शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार
9
SBI Share Target Price : ₹१००० पर्यंत पोहोचणार SBI चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले, "खरेदी...."
10
गजकेसरीसह अक्षय्य तृतीयेला अद्भूत योग: ६ राशींना लाभ, लक्ष्मीची अक्षय्य कृपा; शुभच होईल!
11
भाजपने मोदींच्या बाजूला औरंगजेबाचा फोटो लावावा; 'त्या' विधानावरून संजय राऊत संतापले
12
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
13
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा
14
Opening Bell: गुरुवारच्या मोठ्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात तेजी, BPCL वधारला, पिरामलचे शेअर घसरले
15
जस्टीन बीबरचं होणार 'प्रमोशन'; लवकरच बाबा होणाऱ्या गायकाने पत्नीसोबत केलं खास मॅटर्निटी फोटोशूट
16
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
17
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
18
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
19
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
20
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कायम, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...

सोशल मीडियावरील प्रचाराबाबत प्रशासन ‘ब्लँक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 1:21 AM

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्यक्ष प्रचाराबरोबरच सोशल मीडियावरदेखील प्रचाराचे वॉर चांगलेच रंगले आहे. प्रचाराच्या रणधुमाळीत अतिउत्साहातून आचारसंहिता उल्लंघनाचे प्रकार घडले असून, अशाप्रकारच्या आचारसंहिता भंगाच्या जवळपास साडेसहाशे तक्रारी आत्तापर्यंत नोंदविण्यात आलेल्या आहेत. परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारी चिखलफेक आणि भावनिक उद्रेक करू पाहणाऱ्या अनेक पोस्टवर, विडंबन गीतांवर निवडणूक शाखेचे नियंत्रणच नसल्याचे शिवाय कुणी तक्रारदार समोर न आल्याने सोशल मीडियावरून होणाºया आचारसंहिता उल्लंघना-बाबत एकही गुन्हा नोंद होऊ शकलेला नाही.

ठळक मुद्देयंत्रणा अपयशी : आठ दिवसांत एकही तक्रार नाही

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्यक्ष प्रचाराबरोबरच सोशल मीडियावरदेखील प्रचाराचे वॉर चांगलेच रंगले आहे. प्रचाराच्या रणधुमाळीत अतिउत्साहातून आचारसंहिता उल्लंघनाचे प्रकार घडले असून, अशाप्रकारच्या आचारसंहिता भंगाच्या जवळपास साडेसहाशे तक्रारी आत्तापर्यंत नोंदविण्यात आलेल्या आहेत. परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारी चिखलफेक आणि भावनिक उद्रेक करू पाहणाऱ्या अनेक पोस्टवर, विडंबन गीतांवर निवडणूक शाखेचे नियंत्रणच नसल्याचे शिवाय कुणी तक्रारदार समोर न आल्याने सोशल मीडियावरून होणाºया आचारसंहिता उल्लंघना-बाबत एकही गुन्हा नोंद होऊ शकलेला नाही.सोशल मीडियावरून होणाºया प्रचारावर लक्ष केंद्रित करण्यात आल्याचा दावा निवडणूक शाखेकडून करण्यात आला असला तरी याप्रकरणी मात्र अद्याप आचारसंहिता भंगाची तक्रार नोंदविण्यात आलेली नाही किंबहुना तशी यंत्रणाच नसल्यामुळे सोशल मीडियाचे रान उमेदवारांना मोकळेच मिळाले आहे. निवडणुकीत पारंपरिक प्रचाराच्या साधनांबरोबरच सोशल मीडियाचादेखील वापर केला जातो. उमेदवाराच्या कार्यकर्त्यांकडून कथित ग्रुप तयार करण्यात आले आहे, तर उमेदवारांवर चित्रित केलेले व्हिडीओ तसेच गाणे सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. जास्तीत जास्त लोकांपर्यंत उमेदवाराचा प्रचार करण्याच्या इराद्याने अशाप्रकारचा प्रचार केला जात असला तरी यातून मात्र आचारसंहिता उल्लंघनाचेच प्रकार घडत आहेत.उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी आपल्याच वैयक्तिक अकाउंटवरून केलेले भाष्य, फोटो तसेच कमेंट शहरात पसरविले जात आहेत. आचारसंहितेचा भंग करणाºया अनेक पोस्ट तसेच गीतांतून एकमेकांवर होणारी चिखलफेक सर्रास सुरू आहे. यावर निवडणूक शाखेचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसते. सोशल मीडिया हा चोवीस तास वापरात असल्याने त्याला वेळेचेदेखील बंधन नाही. त्यामुळे रात्रीही प्रचार-गैरप्रचार सुरूच असतो. या सर्व घटनांवर नियंत्रण कसे ठेवायचे याबाबतची यंत्रणाच नसल्याने प्रशासनही सोशल मीडियावरील निर्बंधाबाबत ‘ब्लॅँक’ झाल्याचे दिसते.मतदारांचा विश्वास वृत्तपत्रांवरचप्रचाराचे जलद आणि प्रभावी माध्यम म्हणून सोशल मीडियाचा वापर निवडणुकीत होत असला तरी या माध्यमाचा होणारा गैरवापर, पसरणाºया अफवा, खोटे व्हिडीओ, पत्र तसेच चित्रित केलेल्या व्हिडीओतून अधिक संभ्रम निर्माण झाला आहे. मतदारही खोटा प्रचार म्हणून फारसे गांभीर्याने बघत नसल्याचे एकूणच चित्र आहे. त्यातही मतदारांचा सर्वाधिक विश्वास हा वृत्तपत्रांवरच असून, वस्तुनिष्ठता आणि खात्रीशीर वृत्तामुळे मतदार वृत्तापत्राकडे गांभीर्याने पाहत असल्याची चर्चा मतदार बोलून दाखवित आहेत.सोशल मीडियावर राजकीय पक्षाचा ग्रुप, उमेदवाराचा स्वत:चा ग्रुपही असतो. एसएमएस सुविधांचे पॅकेज घेऊन मतदारांवर बंबार्डिंग केले जाते. दुसरीकडे फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर करण्यात आलेल्या ग्रुप्सच्या माध्यमातूनदेखील प्रचाराची रणधुमाळी सुरू असते. मात्र याला अटकाव घालण्याबाबतची सक्षम यंत्रणाच कार्यान्वित नसल्याचे दिसते. सोशल मीडियावर नियंत्रण आणणारा सेल हा पोलीस विभागाच्या अखत्यारीत असल्याचे आता निवडणूक शाखेकडून सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात पोलिसांकडे सायबर सेल असून, त्यांच्याकडेदेखील सोशल मीडियावरून होणाºया आचारसंहितेच्या उल्लंघनाची एकही तक्रार नाही.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Social Mediaसोशल मीडिया