शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
7
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
8
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
9
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
10
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
11
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
12
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
13
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
14
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
15
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
16
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
17
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
18
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
19
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
20
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप

'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 9:47 AM

मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या उमेदवाराने पक्षाच्या नेत्यांसमोरच अजब आश्वासन जनतेला दिलं आहे

Congress Kantilal Bhuria : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधाकांकडून मोठ्या प्रमाणात आश्वासनं देण्यात येत आहेत. याच आश्वासनांवरुन एकमेकांवर टीका देखील केली जातेय. अशातच आता काँग्रेसच्या एका नेत्याने दिलेल्या आश्वासनाची देशभरात चर्चा सुरुय. माजी केंद्रीय मंत्री आणि मध्य प्रदेशच्यारतलाम लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार कांतीलाल भूरिया यांनी गुरुवारी एका प्रचारसभेत केलेल्या घोषणेमुळे नवा वाद निर्माण झालाय. माझी केंद्रीय मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाने वातावरण तापलं आहे. भाजपसह मित्रपक्षांनीही भूरिया आणि काँग्रेसवर टीका केली आहे.

गुरुवारी एका सभेला संबोधित करताना कांतीलाल भूरिया यांनी जनतेला अजब आश्वासन दिले. काँग्रेसने आपल्या जाहिरनाम्यात ‘महालक्ष्मी योजने’ची घोषणा केली. या घोषणेत महिलांना दर महिन्याला आर्थिक सहाय्य केलं जाणार आहे. तसेच स्वयंपाकाचा गॅस, बस प्रवासासाठी सबसिडी दिली जाणार आहे. तसेच प्रत्येक गरीब महिलेच्या खात्यात एक लाख रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. या योजनेचा उल्लेख करत कांतीलाल भूरिया यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ज्यांना दोन बायका आहेत त्यांना दोन लाख रुपये मिळतील, अशी घोषणा भुरिया यांनी केली.

"१३ मे रोजी काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते आणि प्रत्येक माता भगिनींना पुढे या. आमचा जाहीरनामा असा आहे की प्रत्येक महिलेच्या खात्यात एक लाख रुपये जमा होतील. घरातील सर्व महिलांना प्रत्येकी एक लाख मिळणार आहेत. तुम्हाला याची माहिती आहे की नाही. ज्यांना दोन बायका आहेत त्यांना दोन लाख रुपये मिळणार आहेत," असे म्हणत भूरिया हसू लागले. यावेळी व्यासपीठावर दिग्विजय सिंह आणि जितू पटवारीही उपस्थित होते. 

तसेच पटवारी यांनीही भुरियांचे समर्थन करताना म्हटलं की, "भूरियाजींनी आत्ताच एक मोठी घोषणा केली आहे. दोन पत्नी असलेल्या व्यक्तीला या योजनेचा दुप्पट लाभ होणार आहे. महालक्ष्मी योजनेनुसार काँग्रेसने दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील प्रमुख महिलांना दर महिन्याला ८,५०० रुपये अर्थसहाय्य केलं जाईल."

दरम्यान, भाजपाने कांतीलाल भूरिया यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली आहे. खासदार आणि भाजपचे प्रवक्ते नरेंद्र सलुजा यांनी निवडणूक आयोगाकडे भूरिया यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कांतीलाल भूरिया यांच्या विरोधात खासदार वनमंत्री नागर सिंह चौहान यांच्या पत्नी अनिता चौहान निवडणुकीच्या रिंगणात आहेत. रतलाममध्ये चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी मतदान होणार आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेशratlam-pcरतलाम