शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

सानप यांच्या घरवापसीच्या प्रयत्नाने भाजपतच अस्वस्थता!

By किरण अग्रवाल | Published: November 22, 2020 2:11 AM

पक्ष असो की व्यक्ती, राजकारणात परस्परांची गरज बघून तडजोडी केल्या जातात. पक्षांतरे असोत, की घरवापसी; त्यामागेही अशीच गणिते असतात. उभयतांची ती गरज असते. त्यामुळे माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या भाजपत होऊ घातलेल्या पुनर्प्रवेशाच्या प्रयत्नांकडे त्याच दृष्टीने बघता यावे; पण या आगमनामुळे इतरांमध्ये अस्वस्थता निर्माण होणे स्वाभाविक आहे, कारण त्यामुळे काही समीकरणे व वर्चस्ववादाचे गणित बदलण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या आगामी निवडणुकीची पार्श्वभूमी त्यामागे आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांची याबाबत मत आजमावणी करण्याची वेळ त्यामुळेच आल्याचे म्हणता यावे.

ठळक मुद्देनाशिक महापालिका निवडणुकीच्या तयारीची नांदी...

सारांश

विशिष्ट भूमिकेतून अगर विचारधारेतून राजकीय पक्षांतरे घडून येण्याचे दिवस कधीचेच सरलेत, आता पक्षांतरे होतात ती संधीसाठी; त्यामुळे संधी मिळाली नाही किंवा ती मिळूनही तिचे सोने करता आले नाही की घरवापसीची प्रक्रिया सुरू होणे स्वाभाविक ठरते. नाशकातील माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या सद्य:स्थितीतील हालचालींकडे त्याचदृष्टीने बघता यावे. अवघ्या वर्ष-सव्वा वर्षावर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकीची पार्श्वभूमी या हालचालींमागे असल्यास नवल ठरू नये.

कोरोनाच्या संकटामुळे गेली काही महिने राजकीय आघाडीवर स्वस्थताच आलेली होती. अलीकडच्या दीड-दोन महिन्यांत ती काहीशी दूर होऊ पाहात असताना दिवाळी आली, त्यामुळे राजकीय फटाके या दिवाळीनंतर फुटण्याचे अंदाज याच स्तंभात वर्तविण्यात आलेले होते. नेमके तेच सुरू झाले आहे. खरे तर दिवाळी अजून संपलेली नाही व या दिवाळीतील फटाकेही सादळलेले नाहीत; पण त्यापूर्वीच राजकीय फटाके फुटू लागले आहेत. राजकारण किती घाईचे झाले आहे किंवा फार काळ कोणी, कुठे प्रतीक्षेवर राहू इच्छित नाही हेच यावरून लक्षात यावे.

नाशकातील भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर ते राष्ट्रवादीचे उमेदवार बनले होते; पण उमेदवारीची संधी मिळूनही त्यांना पराभव बघावा लागला त्यामुळे ते राष्ट्रवादीचा उंबरा सोडून शिवसेनेत दाखल झाले. त्यांच्या येण्याची उपयोगिता सिद्ध न होऊ शकल्याने शिवसेनेतही ते अडगळीतच होते; परिणामी आता त्यांना पुनश्च भाजपत परतण्याचे म्हणजे घरवापसीचे वेध लागले आहेत म्हणे. अर्थात ऐन निवडणुकीच्या काळात अशी उपयोगिता न पाहता भरती करून घेण्याची प्रथा सर्वच पक्षात असली तरी सवडीच्या काळात मात्र कुणाकडेही ते सहज होत नसते. म्हणूनच सानप यांच्या पक्षप्रवेशाबाबत मत आजमावणीकरिता सरचिटणीस नाशकात आले. 

भाजपत असताना व आमदारकीच्या काळात प्रारंभीच्या दिवसात गिरीश महाजन यांची मर्जी संपादन करून असल्यामुळे सानप यांचा स्थानिक पातळीवर पक्षात व महापालिकेतही दबदबा होता. मला नाही तर अन्य कुणासही नाही, असा त्यांचा हेका राहिल्याने भाजपच्या सत्ताकाळात नाशिकच्या वाट्याला मंत्रिपद लाभू शकले नव्हते. सानप पक्षाचे शहराध्यक्ष असताना महापालिकेत प्रथमच स्वबळावर या पक्षाची सत्ता आली, त्यामुळे ओघाने तेथेही त्यांचीच चलती होती; पण महाजनांचे बोट सुटले आणि तेथूनच परिस्थिती बदलली.

मुळात आपल्याच पक्षाच्या एका माजी आमदार व शहराध्यक्ष राहिलेल्यास पुन्हा पक्षात घेण्यासाठी अशी मत आजमावणी करावी लागत असेल तर त्यातून त्या व्यक्तीची उपयोगिता व उपद्रवमूल्यही उघड व्हावे. तसेही स्थानिक पातळीवर या पक्षाचे निर्नायकत्व वेळोवेळी उघड होऊन गेलेले असल्याने महापालिका लढायला व त्याची तयारी करायला सक्षम नेतृत्वाची उणीव भासत असेल तर काय सांगावे? त्यांना तिकडे कुणी पुसत नाही व इकडे यांचे गाडे कुणी हाकत नाही, त्यामुळे हा परस्पर गरजेचा मामला असावा. सानप यांच्या घरवापसीच्या चर्चेनेच केवळ फटाके फुटत आहेत व भाजपतच अस्वस्थता दिसत आहे ती त्यामुळेच.

सुरुवात तर झाली, आता कुणाचा नंबर?नाशिक महापालिकेची निवडणूक वर्षभरावर येऊन ठेपली आहे, त्यादृष्टीने दिवाळी होत नाही तोच बाळासाहेब सानप यांच्या घरवापसीची चर्चा सुरू झाली आहे. ते शिवसेनेत जाऊन अस्वस्थ होते, तसे भाजपत काहीजण येऊन अस्वस्थ आहेत. सत्ता आपलीच येणार, या भ्रमात राहून दिली गेलेली आश्वासने नंतरच्या काळात पूर्ण न झाल्याने ही अस्वस्थता संबंधितांच्या वाट्यास आली आहे, त्यामुळे येत्या काही दिवसांत पुन्हा नवीन फटाके फुटण्याची शक्यता नाकारता येऊ नये. शिवाय, भाजपप्रमाणेच अन्य पक्षांतही काही हालचाली होऊ घातल्या आहेत. 

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाBalasaheb Sanapबाळासाहेब सानपNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाElectionनिवडणूक