शहरं
Join us  
Trending Stories
1
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
2
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
3
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
4
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
5
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
6
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
7
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
8
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
9
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
10
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
11
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
12
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
13
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
14
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
15
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
16
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
17
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
18
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
19
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
20
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट

ही तर भाजपाची नौटंकी :  विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 00:48 IST

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावाबाबत ऐनवेळी घुमजाव रद्द करण्याची वेळ भाजपावर आल्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. शिवसेनेने ही भाजपाची नौटंकी असल्याची टीका केली तर राष्टवादीने कारभार जमत नसल्याने भाजपाने आता पदाधिकारी बदलावे, अशी मागणी केली आहे.

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावाबाबत ऐनवेळी घुमजाव रद्द करण्याची वेळ भाजपावर आल्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. शिवसेनेने ही भाजपाची नौटंकी असल्याची टीका केली तर राष्टवादीने कारभार जमत नसल्याने भाजपाने आता पदाधिकारी बदलावे, अशी मागणी केली आहे.  महापालिकेचे आयुक्ततुकाराम मुंढे यांनी ३१ मार्च रोजी वार्षिक भाडे मूल्य वाढविले तसेच मोकळ्या भूखंडांवरदेखील दर वाढविले. त्यामुळे शहरात आंदोलने उभी राहिल्यानंतर विशेष महासभा घेऊन संपूर्ण करवाढ रद्द करण्याचा ठराव करण्यात आला होता; परंतु हा ठरावच आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बेकायदेशीर ठरविला. त्यामुळे भाजपाने नाशिककरांवर करवाढीचा बोजा नको अशी भूमिका घेत आयुक्त मुंढे यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता; मात्र भाजपात श्रेष्ठींचे आदेश दिले की भूमिका बदलते असा अनुभव असल्याने विरोधकांनी भाजपाला आपल्या भूमिकेवर ठाम राहण्याचे आवाहन करून सर्वच पक्षांनी आपल्या पक्षाची भूमिका महासभेत ठरवू असे स्पष्ट केले होते. आयुक्त तुकाराम मुंढे यांनादेखील संपूर्ण करवाढ मागे घेतल्यास अविश्वास ठरावाला सामोरे जावे लागणार नाही अशी भूमिका सर्वपक्षीयांनी घेतली होती. त्यामुळे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सरासरी पन्नास टक्के करवाढ कमीदेखील केली; परंतु त्यानंतरही संपूर्ण करवाढ करावी अशी भाजपाची आणि सत्तारूढ गटाची मागणी होती. त्यामुळे अविश्वास ठराव मंजूर होणे अटळ असल्याचे मानले जात असताना ऐनवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांनी महापौरांना ठराव मागे घेण्याच्या सूचना केल्यामुळे त्यामुळे गोंधळ उडाला.  शिवसेनेने यासंदर्भात भाजपावर टीका केली असून, भाजपाची ही नौटंकी असल्याचे नमूद केले आहे. विरोधी पक्ष नेता अजय बोरस्ते यांनी यासंदर्भात सांगितले की, सर्वसामान्य नागरिकांच्या करवाढीचा विषय हातात घेतला तर मग तो सुटला नसतानाच माघार का घेतली? भाजपाने अविश्वास ठराव आणल्यानंतर आता वरिष्ठ नेते तो मागे घ्यायला लावत असून, मग अगोदरच विचारणा करून अविश्वास ठराव का मांडला नाही? असा प्रश्न त्यांनी केला. आयुक्तांनी केलेली संपूर्ण करवाढ रद्द करावी ही शिवसेनेची मागणी असून, आयुक्तांनी ती पन्नास टक्के कमी केली. ही करकपात शिवसेनेला मान्य नसून शिवसेना शांत बसणार नाही, यासंदर्भात शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असून, तशी मागणी केल्याचे अजय बोरस्ते यांनी सांगितले.राष्टÑवादीचे गटनेते गजानन शेलार यांनी भाजपाच्या वतीने विरोधी पक्षांचा विश्वासघात करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजपा हा याप्रकारामुळे कलंकित झाला आहे. करवाढीच्या विरोधात राष्टÑवादी कॉँग्रेसदेखील आहे; परंतु आयुक्त मुंढे यांच्या विरोधात भाजपाने अविश्वास आणला तेव्हाच त्यांची विश्वासार्हता नव्हती. भाजपाने केवळ विरोधकांचा नव्हे तर नागरिकांचादेखील विश्वासघात केला असून, त्यामुळे आता भाजपाच्या नगरसेवकांनी खरे तर राजीनामे देऊन निवडणूक घेण्याची गरज आहे. किमान विद्यमान पदाधिकाºयांमध्ये बदल करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.महाराष्ट नवनिर्माण सेनेचे गटनेता सलीम शेख यांनी शहरवासीयांवर करवाढ लादू नये यासाठी पक्षाची भूमिका कायम आहे. महापालिकेच्या महासभेत संपूर्ण करवाढ रद्द करण्याचा ठराव होऊन त्याप्रमाणेच अंमलबजावणी व्हावी, ही मागणी कायम आहे.भाजपाचे मुंढे यांच्याशी साटेलोटेमहापालिका आयुक्तांचे भाजपाशी साटेलोटे असून, प्रत्यक्षात नागरिकांची दिशाभूल होत असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेता अजय बोरस्ते यांनी केला आहे. करवाढीच्या विरोधात भाजपाने अविश्वास ठराव दाखल केला आणि नंतर आयुक्तांनी पन्नास टक्के कपात केली. ती महासभेच्या ठरावानुसार शंभर टक्के नसतानाही भाजपाने अविश्वास ठराव मागे घेतला. म्हणजे करवाढीसारखी कामे आयुक्तांच्या हाती करून घेण्याचा भाजपाचा डाव असण्याची शक्यता आहे. सिडकोतील अतिक्रमणांबाबत आयुक्तांनी नोटिसा बजावल्या, त्यानंतर आमदार सीमा हिरे यांनी विरोध केला आणि कारवाई थांबली, याचा विचार करता मुंढे आणि भाजपा एकत्रित काम करीत असल्याचा आरोप बोरस्ते यांनी केला.भाजपाचे घुमजाव नेहमीचेच : कॉँग्रेसभाजपाने प्रत्येक प्रकरणात अशाप्रकारे घुमजाव करून विश्वासघात करण्याची परंपरा कायम ठेवली आहे, अशी टीका कॉँग्रेस गटनेता शाहू खैरे यांनी केली आहे. आयुक्त मुंढे यांनी अस्तित्वातील मिळकतींना दरवाढ केली तेव्हा कॉँग्रेसने बहिष्कार टाकला होता; मात्र त्यावेळीदेखील भाजपाने घुमजाव करीत १८ टक्के करवाढ केली होती. आता आयुक्तांनी नव्या मिळकतींसाठी केलेली दरवाढ कमी केली असली तरी शंभर टक्के कमी ेलेली नाही, अशावेळी भाजपा हे आयुक्तांच्या माध्यमातून खेळी करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाBJPभाजपा