शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

राष्ट्रवादीच्या हल्लाबोलवर भाजपचा पलटवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 17:12 IST

नाशिक जिल्ह्यातील हल्लाबोल आंदोलनाच्या समारोपप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फ डणवीस व भाजपावर टीकेची झोड उठवल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे आमदार देवयानी फरांदे व बाळासाहेब सानप यांनी शरद पवार यांच्यावर रविवारी (दि.11) पलटवार केला. अनेक वर्षे सत्ता उपभोगणाऱ्या शरद पवारांना शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याची टीका फरांदे यांनी केली आहे. 

ठळक मुद्देशरद पवारांना शेततकऱ्यांविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार नाहीदेवयानी फरांदे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनावर टिका विरोधकांचा समृद्धी महामार्गात खोडा घालण्याचा प्रयत्न, भाजपाचा आरोप

नाशिक : जिल्ह्यातील हल्लाबोल आंदोलनाच्या समारोपप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फ डणवीस व भाजपावर टीकेची झोड उठवल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे आमदार देवयानी फरांदे व बाळासाहेब सानप यांनी शरद पवार यांच्यावर रविवारी (दि.11) पलटवार केला. अनेक वर्षे सत्ता उपभोगणाऱ्या शरद पवारांना शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याची टीका फरांदे यांनी केली आहे. नाशिकला राज्याच्या अर्थसंकल्पात सापत्न वागणूक मिळाल्याच्या चर्चेने जोर धरला असतानाच हल्लाबोल आंदोलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्री व भाजपावर झालेल्या बोच:या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे रविवारी (दि. 11) पक्षाच्या वसंतस्मृती कार्यालयात अर्थसंकल्पातील तरतुदींविषयी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माहिती देत पक्षाची भूमिका मांडली. देवयानी फरांदे म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीच्या सरकारने त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रासाठी काहीच केले नाही. सिंचन, वीज घोटाळा करून राज्याला भ्रष्टाचाराच्या दरीत लोटले. अशा स्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा सरकार सर्वसामान्यांसाठी काम करीत असून, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पात सर्वसामान्य शेतकरी व कृषी क्षेत्रसाठी भरीव तरतूद केली आहे. तसेच समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूरदरम्यानची विविध शहरे मुंबईशी जोडली जाणार असून, स्मार्ट शहरांसोबतच ड्रायपोर्ट, शीतगृहेही उभारण्यात येणार असल्याने राज्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. परंतु, विकासाच्या विरोधी भूमिका असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य डावे पक्ष मिळून समृद्धी महामार्गात खोडा घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत गेली अनेक वर्षे सत्ता उपभोगणांऱ्या शरद पवारांना शेतकऱ्यांविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याचेही फ रांदे म्हणाल्या. दरम्यान, राज्याच्या अर्थसंकल्पात नाशिकसाठी काय तरतूद आहे याविषयी विचारलेल्या प्रश्नांना आमदार देवयानी फरांदे आणि बाळासाहेब सानप यांनी बगल देत नाशिकसाठी सिंहस्थ कुंभमेळ्यासह विविध योजनांमधून सुरू असलेल्या कामांचा उल्लेख करून पत्रकार परिषद गुंडाळली. यावेळी भाजपाचे प्रदेश प्रवक्ता सुहास फरांदे, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

कौशल्य विद्यापीठाची मागणी करणारराज्याच्या अर्थसंकल्पात नाशिकच्या हाती काहीही लागलेले नाही. त्यामुळे नाशिककरांची नाराजी दूर करण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे आमदार पालकमंत्र्यांच्या नेतृत्वात सहा कौशल्य विद्यापीठांपैकी एक विद्यापीठ नाशिकला मिळावे यासाठी मागणी करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNashikनाशिकNCPराष्ट्रवादी काँग्रेसSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्गBJPभाजपा