शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

 आरक्षणाच्या मुद्द्यावरून सामाजिक तेढ निर्माण करण्याचे भाजपचे षडयंत्र; प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

By प्रसाद गो.जोशी | Updated: October 27, 2023 17:58 IST

राज्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी अशा तीन पक्षांची सत्ता असल्याने सध्या राज्यभरात गोंधळ निर्माण झाला आहे.

मालेगाव (नाशिक) : राज्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी अशा तीन पक्षांची सत्ता असल्याने सध्या राज्यभरात गोंधळ निर्माण झाला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे - पाटील आंदोलन करीत आहेत. जरांगे- पाटील यांचे आंदोलन उभे राहिल्यानंतर धनगर, आदिवासी कोळी, ओबीसी समाजाला एकमेकांच्या विराेधात समोरासमोर उभे केले आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून सामाजिक तेढ निर्माण करण्याचे षडयंत्र भाजप सरकारकडून आखले जात आहे. आरएसएस संघटनेचा जातीयता, भांडणे वाढविणे, जाती - जातींमध्ये कलह निर्माण करणे, हा मुख्य अजेंडा असल्याचा आराेप वंचित बहुजन आघाडीचे डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

मालेगाव तालुका दौऱ्यावर असताना डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. डॉ. आंबेडकर म्हणाले की, हिंदू धर्मात वैदिक आणि संत परंपरा असे दोन भाग पडतात. त्यातील संतांच्या परंपरेवर चालणारा समाज माणुसकी व एकात्मता, एकमेकांचा मानसन्मान करण्यास शिकविते व वारीच्या माध्यमातून सहजीवनाचे दर्शन घडवून शांतीचा संदेश देणारा समाज आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर रस्त्यावर उतरणाराही समाज आहे. मनुस्मृतीवर आधारित असलेला वैदिक हिंदू समाज तेढ निर्माण करण्याचे काम करीत असल्याचा आरोप डॉ. आंबेडकर यांनी केला. दिवाळीनंतर दंगली घडविण्याची शक्यताराज्यात असलेले शिंदे सरकार बरखास्त करून पुन्हा सत्तेवर यायचे आहे. त्यासाठी हिंदू - मुस्लीम व अन्य समाजात आरक्षणाच्या मुद्द्यावरून आतापासून तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न भाजपाकडून केला जात आहे. त्यामुळे दिवाळीनंतर गोध्रासारख्या दंगली देशात घडू शकतात. यासाठी जनतेने आतापासून सरकारच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन डॉ. आंबेडकर यांनी केले.

टॅग्स :NashikनाशिकPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर