शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

 आरक्षणाच्या मुद्द्यावरून सामाजिक तेढ निर्माण करण्याचे भाजपचे षडयंत्र; प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

By प्रसाद गो.जोशी | Updated: October 27, 2023 17:58 IST

राज्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी अशा तीन पक्षांची सत्ता असल्याने सध्या राज्यभरात गोंधळ निर्माण झाला आहे.

मालेगाव (नाशिक) : राज्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी अशा तीन पक्षांची सत्ता असल्याने सध्या राज्यभरात गोंधळ निर्माण झाला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे - पाटील आंदोलन करीत आहेत. जरांगे- पाटील यांचे आंदोलन उभे राहिल्यानंतर धनगर, आदिवासी कोळी, ओबीसी समाजाला एकमेकांच्या विराेधात समोरासमोर उभे केले आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून सामाजिक तेढ निर्माण करण्याचे षडयंत्र भाजप सरकारकडून आखले जात आहे. आरएसएस संघटनेचा जातीयता, भांडणे वाढविणे, जाती - जातींमध्ये कलह निर्माण करणे, हा मुख्य अजेंडा असल्याचा आराेप वंचित बहुजन आघाडीचे डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

मालेगाव तालुका दौऱ्यावर असताना डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. डॉ. आंबेडकर म्हणाले की, हिंदू धर्मात वैदिक आणि संत परंपरा असे दोन भाग पडतात. त्यातील संतांच्या परंपरेवर चालणारा समाज माणुसकी व एकात्मता, एकमेकांचा मानसन्मान करण्यास शिकविते व वारीच्या माध्यमातून सहजीवनाचे दर्शन घडवून शांतीचा संदेश देणारा समाज आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर रस्त्यावर उतरणाराही समाज आहे. मनुस्मृतीवर आधारित असलेला वैदिक हिंदू समाज तेढ निर्माण करण्याचे काम करीत असल्याचा आरोप डॉ. आंबेडकर यांनी केला. दिवाळीनंतर दंगली घडविण्याची शक्यताराज्यात असलेले शिंदे सरकार बरखास्त करून पुन्हा सत्तेवर यायचे आहे. त्यासाठी हिंदू - मुस्लीम व अन्य समाजात आरक्षणाच्या मुद्द्यावरून आतापासून तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न भाजपाकडून केला जात आहे. त्यामुळे दिवाळीनंतर गोध्रासारख्या दंगली देशात घडू शकतात. यासाठी जनतेने आतापासून सरकारच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन डॉ. आंबेडकर यांनी केले.

टॅग्स :NashikनाशिकPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर