शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

भावली धरण ओव्हरफ्लो; शेतकऱ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 01:40 IST

घोटी : इगतपुरी तालुका हा पावसाचे माहेरघर म्हणून समजला जात असतानाही यावर्षी या तालुक्याकडे वरूणराजाने काहीशी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. दरम्यान, मंगळवारी झालेल्या एका दिवसाच्या पावसाने इगतपुरी तालुक्याला काहीसा दिलासा मिळाला आहे. मुंबईच्या वातावरणामुळे तालुक्यात रात्रभर धुवाधार पाऊस झाला. या पावसामुळे काही प्रमाणात पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. इगतपुरीची जीवनवाहिनी समजली जाणारे भावली धरण अखेर ओसंडून वाहून ओव्हरफ्लो झाले आहे.

ठळक मुद्देशुभवर्तमान : आगामी काळात पावसाचा जोर कायम राहण्याची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कघोटी : इगतपुरी तालुका हा पावसाचे माहेरघर म्हणून समजला जात असतानाही यावर्षी या तालुक्याकडे वरूणराजाने काहीशी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. दरम्यान, मंगळवारी झालेल्या एका दिवसाच्या पावसाने इगतपुरी तालुक्याला काहीसा दिलासा मिळाला आहे.मुंबईच्या वातावरणामुळे तालुक्यात रात्रभर धुवाधार पाऊस झाला. या पावसामुळे काही प्रमाणात पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. इगतपुरीची जीवनवाहिनी समजली जाणारे भावली धरण अखेर ओसंडून वाहून ओव्हरफ्लो झाले आहे.भावली धरण भरले म्हणजे इगतपुरी तालुक्याची बहुतांश चिंता दूर होते. भावली हे धरण दरवर्षी सर्वप्रथम म्हणजेच जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण क्षमतेने भरते. यावर्षी मात्र जून व जुलै हे दोन्ही महिने कोरडेठाक गेल्याने पाऊस नाही, त्यामुळे धरणातील जलसाठा जेमतेम शिल्लक होता. भावली धरण भरण्याकडे सर्वच नागरिकांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र घाटमाथ्यावरील पावसामुळे भावली धरणातील जलसाठ्यात वाढ होत दोन दिवसांपासून भावली धरण ओव्हरफ्लो होण्याची प्रतीक्षा होती. अखेर आज पहाटेच्या सुमारास भावली धरण भरल्याची शुभवार्ता तालुक्याच्या कानी आली आणि तालुक्याची काहीशी चिंता दूर झाली.भावली धरण भरल्यानंतरच तालुक्यातील इतर धरणे भरण्यास सुरुवात होते अशी स्थिती आहे. त्यामुळे आता आगामी काळात समाधानकारक पाऊस झाला, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिला तर भाम, दारणा, कडवा, मुकणे, वैतरणा, वाकी आदी धरणेही भरली जातील. मात्र यावर्षी सुरुवातीचे दोन्ही महिने कोरडेच गेल्याचे सर्वच घटकात चिंतेचे वातावरण आहे. यावर्षी जर उर्वरित धरणे भरली नाहीत तर तालुक्याला भयानक संकटाला सामोरे जावे लागेल यात शंकाच नाही. चोवीस तासात १०९ मिमी पावसाची नोंद मुंबई ठाण्यात मंगळवारी दिवसभर जोरदार पाऊस असल्याने रात्रीपासून इगतपुरी तालुक्यातही धुवाधार पाऊस झाला; मात्र रात्रभर पाऊस झाला असला तरी आज सकाळपासून पुन्हा पावसाने दडी मारल्याने पावसाचा हा आनंद औटघटकेचा ठरतो की काय अशी चिंता तालुक्यातील नागरिकांना वाटू लागली आहे. बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत अर्थात चोवीस तासात १०९ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. जवळपास १५०० दलघफू क्षमतेचे भावली धरण जुलैअखेरीस ओसांडून वाहते. मात्र यावर्षी तालुक्यात समाधानकारक पाऊस नसल्याने हे धरण जवळपास १५ दिवस उशिराने भरले.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईDamधरण