शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

भावली धरण ओव्हरफ्लो; शेतकऱ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 01:40 IST

घोटी : इगतपुरी तालुका हा पावसाचे माहेरघर म्हणून समजला जात असतानाही यावर्षी या तालुक्याकडे वरूणराजाने काहीशी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. दरम्यान, मंगळवारी झालेल्या एका दिवसाच्या पावसाने इगतपुरी तालुक्याला काहीसा दिलासा मिळाला आहे. मुंबईच्या वातावरणामुळे तालुक्यात रात्रभर धुवाधार पाऊस झाला. या पावसामुळे काही प्रमाणात पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. इगतपुरीची जीवनवाहिनी समजली जाणारे भावली धरण अखेर ओसंडून वाहून ओव्हरफ्लो झाले आहे.

ठळक मुद्देशुभवर्तमान : आगामी काळात पावसाचा जोर कायम राहण्याची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कघोटी : इगतपुरी तालुका हा पावसाचे माहेरघर म्हणून समजला जात असतानाही यावर्षी या तालुक्याकडे वरूणराजाने काहीशी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. दरम्यान, मंगळवारी झालेल्या एका दिवसाच्या पावसाने इगतपुरी तालुक्याला काहीसा दिलासा मिळाला आहे.मुंबईच्या वातावरणामुळे तालुक्यात रात्रभर धुवाधार पाऊस झाला. या पावसामुळे काही प्रमाणात पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. इगतपुरीची जीवनवाहिनी समजली जाणारे भावली धरण अखेर ओसंडून वाहून ओव्हरफ्लो झाले आहे.भावली धरण भरले म्हणजे इगतपुरी तालुक्याची बहुतांश चिंता दूर होते. भावली हे धरण दरवर्षी सर्वप्रथम म्हणजेच जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण क्षमतेने भरते. यावर्षी मात्र जून व जुलै हे दोन्ही महिने कोरडेठाक गेल्याने पाऊस नाही, त्यामुळे धरणातील जलसाठा जेमतेम शिल्लक होता. भावली धरण भरण्याकडे सर्वच नागरिकांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र घाटमाथ्यावरील पावसामुळे भावली धरणातील जलसाठ्यात वाढ होत दोन दिवसांपासून भावली धरण ओव्हरफ्लो होण्याची प्रतीक्षा होती. अखेर आज पहाटेच्या सुमारास भावली धरण भरल्याची शुभवार्ता तालुक्याच्या कानी आली आणि तालुक्याची काहीशी चिंता दूर झाली.भावली धरण भरल्यानंतरच तालुक्यातील इतर धरणे भरण्यास सुरुवात होते अशी स्थिती आहे. त्यामुळे आता आगामी काळात समाधानकारक पाऊस झाला, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिला तर भाम, दारणा, कडवा, मुकणे, वैतरणा, वाकी आदी धरणेही भरली जातील. मात्र यावर्षी सुरुवातीचे दोन्ही महिने कोरडेच गेल्याचे सर्वच घटकात चिंतेचे वातावरण आहे. यावर्षी जर उर्वरित धरणे भरली नाहीत तर तालुक्याला भयानक संकटाला सामोरे जावे लागेल यात शंकाच नाही. चोवीस तासात १०९ मिमी पावसाची नोंद मुंबई ठाण्यात मंगळवारी दिवसभर जोरदार पाऊस असल्याने रात्रीपासून इगतपुरी तालुक्यातही धुवाधार पाऊस झाला; मात्र रात्रभर पाऊस झाला असला तरी आज सकाळपासून पुन्हा पावसाने दडी मारल्याने पावसाचा हा आनंद औटघटकेचा ठरतो की काय अशी चिंता तालुक्यातील नागरिकांना वाटू लागली आहे. बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत अर्थात चोवीस तासात १०९ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. जवळपास १५०० दलघफू क्षमतेचे भावली धरण जुलैअखेरीस ओसांडून वाहते. मात्र यावर्षी तालुक्यात समाधानकारक पाऊस नसल्याने हे धरण जवळपास १५ दिवस उशिराने भरले.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईDamधरण