शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

भरवीरचे जवान अर्जुन वाळुंज यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 12:15 AM

चांदवड तालुक्यातील भरवीर येथील सैन्य दलातील जवान अर्जुन प्रभाकर वाळुंज (२८) यांचे अरुणाचल प्रदेशातील टेंगा येथे निधन झाले. त्यांचा पार्थिव देह भरवीर येथे आणण्यात येणार असून, तेथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अर्जुन यांच्या निधनाचे वृत्त समजताच भरवीर गावावर शोककळा पसरली.

नाशिक : चांदवड तालुक्यातील भरवीर येथील सैन्य दलातील जवान अर्जुन प्रभाकर वाळुंज (२८) यांचे अरुणाचल प्रदेशातील टेंगा येथे निधन झाले. त्यांचा पार्थिव देह भरवीर येथे आणण्यात येणार असून, तेथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अर्जुन यांच्या निधनाचे वृत्त समजताच भरवीर गावावर शोककळा पसरली.त्यांच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ, विवाहित बहीण, पत्नी असा परिवार आहे. अर्जुन यांचे प्राथमिक शिक्षण भरवीर येथे, तर बारावीपर्यंतचे शिक्षण चांदवड येथे झाले आहे. २०१० मध्ये ते लष्करामध्ये दाखल झाले. सहा महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह आसरखेडे येथील उत्तम पाटील गांडुळे यांची कन्या पूनम हिच्याशी झाला. त्यांची नियुक्ती सिलिगुडी विभागातील टेंगा येथे होती. तेथेच त्यांचे निधन झाल्याचे लष्कराच्या सूत्रांनी कळविले आहे.अर्जुन यांच्या निधनाचे वृत्त कळल्यावर आप्तेष्ट, नातलग घरी येताच अर्जुनच्या आई, वडील व भावाने एकच हंबरडा फोडला. अर्जुन हा अल्पभूधारक शेतकरी प्रभाकर पुंजाजी वाळुंज यांचा मुलगा असून, शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. मुलगा नोकरीस लागल्याने कुटुंबाला मोठा आधार मिळाला होता. अर्जुनच्या अचानक निधनाने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

टॅग्स :NashikनाशिकDeathमृत्यू