शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
4
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
5
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
6
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
7
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
8
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
9
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
10
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
11
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
14
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
15
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
16
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
17
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
18
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
19
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
20
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!

जिल्ह्यातील धरणांमधून विसर्ग सुरूच : जायकवाडीला ४० टीएमसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 20:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यात झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे धरणांमध्ये ७४ टक्के पाणीसाठा झाला असून, काही धरणांच्या क्षेत्रात अद्यापही पावसाचा जोर कायम असल्यामुळे पाच धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. येत्या दोन दिवसात पावसाचा अंदाज घेऊन विसर्ग थांबविण्याबाबत पाटबंधारे खाते फेरविचार करण्याच्या तयारीत असले तरी, आत्तापर्यंत नाशिक जिल्ह्यातून जायकवाडी ...

ठळक मुद्दे नाशिक जिल्ह्यातून जायकवाडी धरणासाठी ४० टीएमसी इतके पाणी पोहोचले गंगापूर धरणातही जवळपास ८३ टक्के इतका साठापाच दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे तूर्त गंगापूर धरणातून विसर्ग थांबविण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यात झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे धरणांमध्ये ७४ टक्के पाणीसाठा झाला असून, काही धरणांच्या क्षेत्रात अद्यापही पावसाचा जोर कायम असल्यामुळे पाच धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. येत्या दोन दिवसात पावसाचा अंदाज घेऊन विसर्ग थांबविण्याबाबत पाटबंधारे खाते फेरविचार करण्याच्या तयारीत असले तरी, आत्तापर्यंत नाशिक जिल्ह्यातून जायकवाडी धरणासाठी ४० टीएमसी इतके पाणी पोहोचले आहे.जिल्ह्यातील आळंदी, वाघाड, भावली, वालदेवी, भोजापूर, हरणबारी, केळझर ही मध्यम धरणे शंभर टक्के भरली असून, काही धरणांमध्ये ७० ते ८५ टक्केइतके पाणी साठले आहे. आगामी काळात आणखी पाऊस पडण्याची शक्यता गृहीत धरून धरणांमध्ये त्याच्या साठवण क्षमतेइतके पाणी साठविण्याचे नियोजन असले तरी, काही विशिष्ट प्रमाणात धरणांमध्ये पाण्यासाठी जागा शिल्लक ठेवावी लागत असल्याने जिल्ह्यातील दारणा, पालखे, कडवा, भोजापूर, आळंदी या पाच धरणांमधून गेल्या दहा दिवसांपासून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणातही जवळपास ८३ टक्के इतका साठा झाल्यामुळे त्यातूनही मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला, परंतु गेल्या पाच दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे तूर्त गंगापूर धरणातून विसर्ग थांबविण्यात आला आहे. दारणा धरणात ९१ टक्के इतके पाणीसाठा असून, धरणाच्या वरच्या बाजूला इगतपुरी तालुक्यात अधूनमधून पावसाची हजेरी कायम असल्यामुळे दारणा धरणातून पाणी सोडण्याशिवाय पर्यायच शिल्लक नसल्याने सुमारे १८०० क्यूसेक पाण्याचा दररोज विसर्ग केला जात आहे. १५२० क्यूसेक पाणी पालखेड धरणातून सोडले जात आहे. आळंदी, कडवा, भोजापूर यांची साठवण क्षमता कमी असली तरी, ते धरणे काठोकाठ भरल्यामुळे त्यातून पाणी सोडण्यावाचून पर्यायच नाही.