शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील धरणांमधून विसर्ग सुरूच : जायकवाडीला ४० टीएमसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 20:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यात झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे धरणांमध्ये ७४ टक्के पाणीसाठा झाला असून, काही धरणांच्या क्षेत्रात अद्यापही पावसाचा जोर कायम असल्यामुळे पाच धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. येत्या दोन दिवसात पावसाचा अंदाज घेऊन विसर्ग थांबविण्याबाबत पाटबंधारे खाते फेरविचार करण्याच्या तयारीत असले तरी, आत्तापर्यंत नाशिक जिल्ह्यातून जायकवाडी ...

ठळक मुद्दे नाशिक जिल्ह्यातून जायकवाडी धरणासाठी ४० टीएमसी इतके पाणी पोहोचले गंगापूर धरणातही जवळपास ८३ टक्के इतका साठापाच दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे तूर्त गंगापूर धरणातून विसर्ग थांबविण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यात झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे धरणांमध्ये ७४ टक्के पाणीसाठा झाला असून, काही धरणांच्या क्षेत्रात अद्यापही पावसाचा जोर कायम असल्यामुळे पाच धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. येत्या दोन दिवसात पावसाचा अंदाज घेऊन विसर्ग थांबविण्याबाबत पाटबंधारे खाते फेरविचार करण्याच्या तयारीत असले तरी, आत्तापर्यंत नाशिक जिल्ह्यातून जायकवाडी धरणासाठी ४० टीएमसी इतके पाणी पोहोचले आहे.जिल्ह्यातील आळंदी, वाघाड, भावली, वालदेवी, भोजापूर, हरणबारी, केळझर ही मध्यम धरणे शंभर टक्के भरली असून, काही धरणांमध्ये ७० ते ८५ टक्केइतके पाणी साठले आहे. आगामी काळात आणखी पाऊस पडण्याची शक्यता गृहीत धरून धरणांमध्ये त्याच्या साठवण क्षमतेइतके पाणी साठविण्याचे नियोजन असले तरी, काही विशिष्ट प्रमाणात धरणांमध्ये पाण्यासाठी जागा शिल्लक ठेवावी लागत असल्याने जिल्ह्यातील दारणा, पालखे, कडवा, भोजापूर, आळंदी या पाच धरणांमधून गेल्या दहा दिवसांपासून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणातही जवळपास ८३ टक्के इतका साठा झाल्यामुळे त्यातूनही मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला, परंतु गेल्या पाच दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे तूर्त गंगापूर धरणातून विसर्ग थांबविण्यात आला आहे. दारणा धरणात ९१ टक्के इतके पाणीसाठा असून, धरणाच्या वरच्या बाजूला इगतपुरी तालुक्यात अधूनमधून पावसाची हजेरी कायम असल्यामुळे दारणा धरणातून पाणी सोडण्याशिवाय पर्यायच शिल्लक नसल्याने सुमारे १८०० क्यूसेक पाण्याचा दररोज विसर्ग केला जात आहे. १५२० क्यूसेक पाणी पालखेड धरणातून सोडले जात आहे. आळंदी, कडवा, भोजापूर यांची साठवण क्षमता कमी असली तरी, ते धरणे काठोकाठ भरल्यामुळे त्यातून पाणी सोडण्यावाचून पर्यायच नाही.