शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीचे दोन दिवसात पंचनामे करा :बाळासाहेब थोरात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 17:18 IST

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निसर्ग चक्रीवादळामुळे  झालेल्या नुकसानींचे दोन दिवसात पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. त्याचप्रमाणे नुकसानीचे पंचनामे होताच लवकरच नूकसानग्रस्तांना मदत जाहीर करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्देनिसर्ग चक्रीवादळाचा यशस्वी सामना वादळाच्या संकटात प्रशासनाचे यशस्वी प्रयत्न थोरात यांनी केल्या दोन दिवसात पंचनामे करण्याच्या सूचना

नाशिक : महाराष्ट्रावर कोरोनासोबतच निसर्ग चक्रीवादळामुळे मोठे संकट ओढावले असून या संकटाचा शासन व प्रशासनाने यशस्वी सामना केल्याचे नमूद करतानाच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निसर्ग चक्रीवादळामुळे  झालेल्या नुकसानींचे दोन दिवसात पंचनामे करण्याच्या सूचना प्रशानाला केल्या आहेत. त्याचप्रमाणे नुकसानीचे पंचनामे होताच लवकरच नूकसानग्रस्तांना मदत जाहीर करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.निसर्ग चक्रीवादळ वादळ कोकणातून नाशिक, अहमदनगर व उत्तर महाराष्ट्रातून जाणार याची जाणीव तीन ते चार दिवस अगोदर होती, त्यामुळे शासन-प्रशासन सावध होते.त्यामुळे चक्रीवादळातील नूकसानग्रस्तांना तत्काळ अत्यावश्यक मदत पोहोचविणे शक्य झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या चक्रीवादळात जिल्ह्यातील व उत्तर महाराष्ट्रातील झालेल्या नुकसानींचे पंचनामे सुरू असून ते दोन दिवसात ओटोपून नुकसानग्रस्तांना मदत देण्याच्या दृष्टीने काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या असून लवकरच शासनस्तरावर मदतीची घोषणा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे व केलेल्या पूर्वतयारीमुळे आपण निसर्ग चक्रीवादळाचा सामना करू शकलो, असेही मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी सांगितले.  यावेळी विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेच्या मुख्य  कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी कोरोना व निसर्ग चक्रीवादळासंदर्भातील वस्तुस्थितीविषयी बाळासाहेब थोरात यांना माहिती दिली. 

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळNashikनाशिकBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातcollectorजिल्हाधिकारीSuraj Mandhareसुरज मांढरे