शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

MahaVikas Aghadi: “अशोक चव्हाण चुकीचं बोलले नाही, काँग्रेसमुळे ही सत्ता आहे”; बाळासाहेब थोरातांनी केले समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 13:34 IST

महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला तितकेच महत्त्व असून, चांगले काम सुरू असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

नाशिक:महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) काँग्रेसचा मोठा वाटा आहे. आम्ही आहोत म्हणून सत्ता आहे. हे सरकार मजबूत राहिले पाहिजे, हीच आमची प्रमाणिक भूमिका आहे, असे वक्तव्य काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी एका प्रचारसभेला संबोधित करताना केले होते. अशोक चव्हाण यांच्या भूमिकेला काँग्रेस नेते आणि राज्याचे मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी पाठिंबा दर्शवला असून, अशोक चव्हाण जे बोलले ते चुकीचे नाही. काँग्रेस आहे म्हणूनच सरकार आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. 

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये निधी वाटपात असमानता नाही. विभागानुसार निधी वाटप केला जातो. काँग्रेसला निधी मिळतो. राज्य सरकारमध्ये सर्वांत कमी आमदार असल्यामुळे आम्ही तिसऱ्या स्थानी आहोत. सर्वांमुळे महाविकास आघाडी सरकारचे काम चांगले सुरू आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले. ते नाशिकमध्ये बोलत होते. 

अशोक चव्हाण चुकीचे बोलले नाही

अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या वाट्याबाबत केलेल्या विधानाबाबत बाळासाहेब थोरात यांना विचारणा करण्यात आली. त्यावर बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, अशोक चव्हाण चुकीचे बोलले नाही. काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे. तीन पक्षांच्या आघाडीचे सरकार आहे आणि त्यामध्ये काँग्रेसचे महत्त्व आहे. पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. देशातही काँग्रेस स्थान आणि वाटा खूप मोठा आहे. काँग्रेसशिवाय युपीए नाही. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी युपीएचे नेतृत्व करत आहेत, असे बाळासाहेब थोरात म्हणाले. 

अटलजींचे मन मोठे होते, दुर्दैवाने तसे दिसत नाही

बांगलादेश मुक्तीच्या कार्यक्रमात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे नाव टाळण्यात आले. पण प्रत्येकाच्या मनात इंदिरा गांधींचे नाव होते. माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचे मन मोठे होते. मात्र, आता दुर्दैवाने तसे दिसत नाही, अशी टीका करत प्रत्येकाला स्वतःचा पक्ष वाढवायचा आहे. त्यामुळे काही ठिकाणी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या जात आहेत, असे थोरात म्हणाले. तसेच भाजपला दूर ठेवण्यासाठीच आम्ही नवी मुंबई एकत्र आलो आहोत, असेही थोरातांनी सांगितले. 

दरम्यान, लोकांचा जीव वाचवला पाहिजे, यासाठी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात मेहनत घेण्यात आली. या सर्व कामांवर लक्ष एकत्रित करुन राज्याच्या विकासाचा गाडा पुढे चालत राहिला पाहिजे, या अनुषंगाने महाविकास आघाडीने निश्चित प्रयत्न केला आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचा मोठा वाटा आहे. आम्ही आहोत म्हणून सत्ता आहे हे मुद्दाम सांगितले पाहिजे. काँग्रेसच्या ताकदीनेच या महाविकास आघाडीचा विचारपूर्वक निर्णय आपण घेतला, असे अशोक चव्हाण म्हणाले होते.  

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातAshok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेस