शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
3
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
4
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
5
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
6
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
7
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
8
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
9
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
10
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
11
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
12
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
13
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
14
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
15
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
16
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
17
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
18
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
19
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
20
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी

MahaVikas Aghadi: “अशोक चव्हाण चुकीचं बोलले नाही, काँग्रेसमुळे ही सत्ता आहे”; बाळासाहेब थोरातांनी केले समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 13:34 IST

महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला तितकेच महत्त्व असून, चांगले काम सुरू असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

नाशिक:महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) काँग्रेसचा मोठा वाटा आहे. आम्ही आहोत म्हणून सत्ता आहे. हे सरकार मजबूत राहिले पाहिजे, हीच आमची प्रमाणिक भूमिका आहे, असे वक्तव्य काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी एका प्रचारसभेला संबोधित करताना केले होते. अशोक चव्हाण यांच्या भूमिकेला काँग्रेस नेते आणि राज्याचे मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी पाठिंबा दर्शवला असून, अशोक चव्हाण जे बोलले ते चुकीचे नाही. काँग्रेस आहे म्हणूनच सरकार आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. 

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये निधी वाटपात असमानता नाही. विभागानुसार निधी वाटप केला जातो. काँग्रेसला निधी मिळतो. राज्य सरकारमध्ये सर्वांत कमी आमदार असल्यामुळे आम्ही तिसऱ्या स्थानी आहोत. सर्वांमुळे महाविकास आघाडी सरकारचे काम चांगले सुरू आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले. ते नाशिकमध्ये बोलत होते. 

अशोक चव्हाण चुकीचे बोलले नाही

अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या वाट्याबाबत केलेल्या विधानाबाबत बाळासाहेब थोरात यांना विचारणा करण्यात आली. त्यावर बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, अशोक चव्हाण चुकीचे बोलले नाही. काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे. तीन पक्षांच्या आघाडीचे सरकार आहे आणि त्यामध्ये काँग्रेसचे महत्त्व आहे. पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. देशातही काँग्रेस स्थान आणि वाटा खूप मोठा आहे. काँग्रेसशिवाय युपीए नाही. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी युपीएचे नेतृत्व करत आहेत, असे बाळासाहेब थोरात म्हणाले. 

अटलजींचे मन मोठे होते, दुर्दैवाने तसे दिसत नाही

बांगलादेश मुक्तीच्या कार्यक्रमात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे नाव टाळण्यात आले. पण प्रत्येकाच्या मनात इंदिरा गांधींचे नाव होते. माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचे मन मोठे होते. मात्र, आता दुर्दैवाने तसे दिसत नाही, अशी टीका करत प्रत्येकाला स्वतःचा पक्ष वाढवायचा आहे. त्यामुळे काही ठिकाणी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या जात आहेत, असे थोरात म्हणाले. तसेच भाजपला दूर ठेवण्यासाठीच आम्ही नवी मुंबई एकत्र आलो आहोत, असेही थोरातांनी सांगितले. 

दरम्यान, लोकांचा जीव वाचवला पाहिजे, यासाठी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात मेहनत घेण्यात आली. या सर्व कामांवर लक्ष एकत्रित करुन राज्याच्या विकासाचा गाडा पुढे चालत राहिला पाहिजे, या अनुषंगाने महाविकास आघाडीने निश्चित प्रयत्न केला आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचा मोठा वाटा आहे. आम्ही आहोत म्हणून सत्ता आहे हे मुद्दाम सांगितले पाहिजे. काँग्रेसच्या ताकदीनेच या महाविकास आघाडीचा विचारपूर्वक निर्णय आपण घेतला, असे अशोक चव्हाण म्हणाले होते.  

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातAshok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेस