शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

औरंगाबादरोडला  लग्नसराईमुळे कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 12:34 AM

औरंगाबादरोडवर अनेक लॉन्स तसेच मंगल कार्यालयांची संख्या मोठी असल्याने त्यातच सध्या लग्नसराई सुरू झाल्याने दैनंदिन सायंकाळच्या सुमाराला औरंगाबादरोड, औरंगाबाद नाका व राष्टÑीय महामार्गाच्या समांतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चारचाकी आणि अवजड वाहनांची वाहतूक कोंडी होत आहे.

पंचवटी : औरंगाबादरोडवर अनेक लॉन्स तसेच मंगल कार्यालयांची संख्या मोठी असल्याने त्यातच सध्या लग्नसराई सुरू झाल्याने दैनंदिन सायंकाळच्या सुमाराला औरंगाबादरोड, औरंगाबाद नाका व राष्टÑीय महामार्गाच्या समांतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चारचाकी आणि अवजड वाहनांची वाहतूक कोंडी होत आहे. या नेहमीच्या वाहन कोंडीमुळे सायंकाळी औरंगाबाद रस्त्याने वाहने नेताना वाहनधारकांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते, शिवाय त्याचा परिणाम मुंबई-आग्रा महामार्गावरही होत असल्याने तेथेही तासन्तास वाहने अडकून पडत आहेत.गेल्या काही महिन्यांपासून आग्रारोडच्या उड्डाणपुलाचे विस्तारीकरणाचे काम सुरू असल्यामुळे महामार्गावरील वाहतूक समांतर रस्त्याने वळविण्यात आली आहे. त्यामुळे हॉटेल जत्रा, रासबिहारी चौफुली, अमृतधामपर्यंत चोवीस तास वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. वाहनांच्या रांगा दुतर्फा लागत असल्याने नागरिकांना इच्छितस्थळी जाण्यास विलंबसहन करावा लागतो. त्यामुळे नागरिकांच्या संतापात भर पडत आहे.लग्नसराईमुळे बहुतांशी गोरज मुहूर्तावर विवाह सोहळे असल्याने व जवळजवळ लॉन्स व कार्यालय असल्यामुळे सध्या दैनंदिन सायंकाळच्या वेळी वाहतूक कोंडी होत आहे. परिणामी वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांना रस्त्यावर उतरून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी औरंगाबादरोड, औरंगाबाद नाका चौक, मुंबई-आग्रा महामार्ग भागात तासन्तास उभे राहून वाहतूक कोंडी सोडवावी लागत असल्याचे चित्र दिसून येते.नेहमीच कोंडीमुख्य रस्त्यावर रोजच वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याने त्याचा परिणाम जोड रस्त्यांवर होत आहे. घाईघाईत जाण्याच्या प्रयत्नात दुचाकी, चारचाकी वाहन जोड रस्त्याने बाहेर निघण्याचा प्रयत्न करतात, मात्र रस्त्यावर उभ्या राहणाºया चारचाकी व अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडत आहे. मंगळवारी सायंकाळी अशाच प्रकारे सुमारे दीड तास वाहने रस्त्यावर दुतर्फा अडकून पडल्याने अखेर पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून वाहतूक कोंडी फोडण्यासाठी परिश्रम घेतले.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीNashikनाशिक