शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

‘अ‍ॅस्ट्रो ओपीडी’ निव्वळ मुर्खपणा : पुरुषोत्तम आवारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 20:18 IST

सरकारी रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात ‘अ‍ॅस्ट्रो ओपीडी’ सुरू करण्याचा मध्य प्रदेशच्या भाजपा सरकारने घेतलेला निर्णय मुर्खपणाचा आहे.

ठळक मुद्देदेशभरात सध्या विज्ञानाच्या वाढत्या गळचेपीमुळे वैज्ञानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. बुधवारी (दि.९) देशपातळीवर वैज्ञानिक रस्त्यांवर उतरून निषेध मोर्चा काढत आहेज्योतिषांच्या सल्ल्यानुसार डॉक्टर रुग्णांवर उपचार करणार आहेतवैज्ञानिक दृष्टिकोणावर घाला भाजपा सरकारकडून विज्ञानाची होणारी गळचेपी यावर जोरदार टीका

नाशिक : सरकारी रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात ‘अ‍ॅस्ट्रो ओपीडी’ सुरू करण्याचा मध्य प्रदेशच्या भाजपा सरकारने घेतलेला निर्णय मुर्खपणाचा आहे. या घातक निर्णयामुळे परिवर्तनाची चाके उलटी फिरणार असल्याची टीका अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्याचे प्रवक्ते पुरुषोत्तम आवारे यांनी केली.अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संघटन वाढीसाठी नाशिकमध्ये आलेले आवारे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना भाजपा सरकारकडून विज्ञानाची होणारी गळचेपी यावर जोरदार टीका केली. यावेळी आवारे म्हणाले, महाराष्टÑ एकमेव राज्य आहे की या राज्यात जादूटोणाविरोधी कायदा संमत करण्यात आला आहे. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी समितीकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. राज्यस्तरावर या कायद्याच्या प्रचार-प्रसारासाठी समितीने धोरणात्मक कार्यक्रम हाती घेतला आहे. मध्य प्रदेश सरकारकडून सरकारी रुग्णालयात ज्योतिषी सल्ला देण्याचा घेण्यात आलेला निर्णय एकप्रकारे वैज्ञानिक दृष्टिकोणावर घाला घालणारा आहे. या निर्णयामुळे विज्ञानाची गळचेपी अधिक वाढणार आहे. सरकारी रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण तपासणी विभागात ज्योतिषी रुग्णांच्या हस्तरेषा, जन्मकुंडली बघून रोगाचे निदान करणार आहेत. तसेच जीवनरेषा तपासणार आहेत. ज्योतिषांच्या सल्ल्यानुसार डॉक्टर रुग्णांवर उपचार करणार आहेत, असा हा निर्णय मध्य प्रदेशच्या भाजपा सरकारने घेऊन लोकांना दैववादी बनविण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल टाकले आहे; मात्र अखिल भारतीय अंनिसचा या निर्णयाला प्रखर विरोध आहे.कदेशभरात सध्या विज्ञानाच्या वाढत्या गळचेपीमुळे वैज्ञानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या संतापातूनच येत्या बुधवारी (दि.९) देशपातळीवर वैज्ञानिक रस्त्यांवर उतरून निषेध मोर्चा काढत आहे. या मोर्चांनाही समितीचा पाठिंबा असल्याचे आवारे यांनी यावेळी स्पष्ट केले.