शहरं
Join us  
Trending Stories
1
Mallikarjun Kharge : "दुसऱ्यांच्या घरातून खुर्च्या उधार घेऊन..."; मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
2
संसदेचे विशेष अधिवेशन कधी होणार? लोकसभा अध्यक्षपदाची निवड कधी होणार? जाणून घ्या...
3
पवारांच्या राष्ट्रवादीत खदखद; जयंत पाटलांनी जाहीर भाषणात व्यक्त केली खंत, रोहित पवारांकडे रोख?
4
"बारामतीचा दादा बदला"; कार्यकर्त्याच्या मागणीवर शरद पवार म्हणाले, "आता चर्चा करु नका"
5
२०१९ च्या रोडमॅपवर चालणार एनडीए सरकार; खातेवाटपावरून दिले स्पष्ट संकेत
6
खासदार नसताना कुठलाही नेता मंत्रिपदावर किती दिवस राहू शकतो?; जाणून घ्या नियम
7
राज ठाकरेंना खरंच मोदींच्या शपथविधीचे निमंत्रण नाही? मनसे नेत्याने केलं सूचक विधान
8
Jio Finn, Zomato निफ्टी ५० मध्ये येणार का? NIFTY 50 मध्ये येण्याचा फॉर्म्युला काय? जाणून घ्या
9
चंद्राबाबू नायडू उद्या घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, मंत्रिमंडळात २५ मंत्री होणार सामील
10
"लोकांना वाटेल की मी माझ्या जावयाला...", शाहिद आफ्रिदी संतापला, PCB ला दिला इशारा
11
जेपी नड्डांचा कार्यकाळ संपला; लवकरच BJP च्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होणार; 'ही' नावे चर्चेत...
12
PM मोदी यांनी चार प्रमुख मंत्रालयांच्या मंत्र्यांमध्ये का केला नाही बदल, हे आहे कारण
13
शेतकऱ्यांसाठी खास मोहीम, मोदी सरकार २० जूनपर्यंत देतंय 'ही' संधी
14
Pritam Munde : Video - "आजच्या एवढ्या स्वार्थी जगात..."; रक्षा खडसेंसाठी प्रितम मुंडेंची खास पोस्ट
15
"सरकारचा गोड बोलून काटा काढण्याचा डाव"; उपोषणाच्या चौथ्या दिवशी जरांगेंची प्रकृती खालवली
16
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याला मर्डर केसमध्ये अटक, पोलिसांकडून चौकशी सुरू
17
बिनशर्त पाठिंबा देऊन राज ठाकरेंना निमंत्रण का नाही? मुनगंटीवार म्हणाले, "घाईमध्ये राहून गेलं"
18
PAK vs CAN : पाकिस्तानला पाऊस बुडवणार? शेजाऱ्यांची अस्तित्वाची लढाई, कॅनडाचे तगडे आव्हान
19
रणबीर, शाहरुखनंतर आता प्रभासचीही आई होणार दीपिका पदुकोण; खऱ्या आयुष्यातही आहे प्रेग्नंट
20
'जीतू भैय्या' बनून आले सचिवजी, Kota Factory 3 रिलीज डेट समोर; अंगावर शहारे आणणारा Trailer

बदलीचा ठराव करताच ग्रामसेवकाने ठोकली धूम, ग्रामस्थांचं ठिय्या आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 5:29 PM

नाशिक तालुक्यातील विल्होळी येथील प्रकार

बाबासाहेब गोसावी,  

विल्होळी (ता ). नाशिक-  प्रजासत्ताक दिन म्हणजे थेट जनतेचा कारभार मात्र याच दिवशी नाशिक तालुक्यातील विल्होळी येथील ग्रामस्थांना मात्र वेगळाच अनुभव आला. ग्रामसभेत दुरुत्तरे देणाऱ्या ग्रामसेवकामुळे ग्रामस्थ संतप्त झाले त्यांनी ग्राम सेवकाच्या बदलीचा ठराव केला. त्यानंतर हा आधिकार तुमचा नाही तर शासनाचा आहे असं सांगत ग्रामसेवक सभेतून निघून ग्राम पंचायत कार्यालयात जाऊन बसल्याने ग्रामस्थांनी त्याच्या बदली साठी ठिय्या आंदोलन केले. दरम्यान घटनास्थळी पोलीसही दाखल झाले. अखेरीस विस्तार अधिकाऱ्यांना या वादग्रस्त ग्रामसेवकाची तातडीने उचलबांगडी करावी असे निवेदन देण्यात आले.

विल्होळी येथील हनुमान मंदिरात प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते प्रथमतः ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी प्रथम नागरिक सरपंच जानकाबाई चव्हाण यांची निवड करण्यात आली. यावेळी विविध विकास कामे करण्याचे ठराव करून समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. त्यामध्ये विल्होळी चुंचाळे रस्ता, कुसुमाग्रज नगर सभा मंडप, वाडी वस्त्यांवरील पाणीपुरवठा, बजरंगवाडी टेकडी लेवल, संघर्ष नगर पाणीपुरवठा अशा समस्या मांडल्या असता त्यावर ग्रामविकास अधिकारी अरुण आहेर यांच्याकडून समाधानकारक उत्तर देण्यात येत नव्हते. ग्राम पंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना हा अधिकार  माझा नसून सरपंच व ग्रामसभेचे अध्यक्ष यांचा आहे. अशी अरेरावीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये रोष निर्माण झाला. त्यामुळे ग्रामस्थांनी एकमताने ग्रामविकास अधिकारी यांची त्वरित बदली करण्यात यावी असा ठराव मंजूर करण्यात आला. नंतर सभा तहकूब न करता ग्रामविकास अधिकाऱ्याने ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पलायन केले ग्रामस्थांनी विचारणा केली. ग्रामसभेमध्ये ग्रामविकास अधिकाऱ्यांचा बदली करण्याचा कोणताही अधिकार नाही, तो अधिकार वरिष्ठ पातळीवरील आहे. असे सांगितले . त्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत  ठिय्या आंदोलन सुरू केले. तसेच ग्रामसेवकाची बदली करण्यासाठी निवेदन तयार करून ते विस्तार अधिकारी जगन्नाथ सोनवणे व श्रीधर सानप यांना देण्यात आले.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतNashikनाशिक