शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

जिल्ह्यात तब्बल 423 बालके तीव्र कुपोषित! तातडीच्या उपाययोजना राबवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 08:44 IST

कृषी यांत्रिकीकरणासाठी वेगवेगळे शेतकी औजारे घेण्यासाठी १५ कोटींचा निधी वितरित झाला असून ३ हजार लाभार्थींना शेतीसाठी याचा लाभ घेतला आहे.

नाशिक : जिल्ह्यात सद्य:स्थितीत ४२३ बालके ही तीव्र कुपोषित असून २ हजार १७४ बालके मध्यम कुपोषित गटात आहेत. कुपोषित बालकांची एकूण संख्या ही अडीच हजारांपेक्षा जास्त असून, ही स्थिती चिंताजनक असल्याचे सांगत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी यंत्रणेस कुपोषण निर्मूलनासाठी तातडीने उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले असल्याचे नमूद केले. 

यावेळी डॉ. पवार यांनी विशेषत्वे पेठ, सुरगाणा आणि इगतपुरी या आदिवासी तालुक्यांमध्ये बालकांच्या कुपोषणाचे प्रमाण जास्त असल्याचे सांगितले. आरोग्य यंत्रणेने जिल्ह्यास कुपोषणमुक्त करण्यासाठी झपाटून कामास लागावे, असे आवाहन केले. कृषी योजनांचाही आढावा त्यांनी मांडला. त्या म्हणाल्या, कृषी विकास योजनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबविण्यात येतात. मागील आर्थिक वर्षात ११ कोटींचे अनुदान प्राप्त झाले. १ हजार २७७ लाभार्थींपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचला आहे. याही वर्षात ७ कोटींचा निधी प्राप्त झाला असून १८ लाभार्थींना आतापर्यंत लाभ प्रदान करण्यात आला आहे.

कृषी यांत्रिकीकरणासाठी वेगवेगळे शेतकी औजारे घेण्यासाठी १५ कोटींचा निधी वितरित झाला असून ३ हजार लाभार्थींना शेतीसाठी याचा लाभ घेतला आहे. सेंद्रिय शेतीला प्राधान्य देण्यासाठी परंपरागत कृषी योजना ‘आत्मा’तर्फे राबविण्यात येते. यातून आतापर्यंत २३ लाखांचे काम झाले असून मागील आर्थिक वर्षात ३६८ लाभार्थी, तर १०७ लाभार्थींनी या वर्षात लाभ घेतला आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेच्या माध्यमातून गतवर्षी ठिबक सिंचन संच घेण्यासाठी १८ कोटी ८३ ला, तर यंदा ७ कोटींचा निधी असा एकूण २५ कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे.  त्यातून ६ हजार लाभार्थींपर्यंत हा लाभ पोहोचला आहे. ही योजना ऑनलाइन असल्याने मागणीनुसार अनुदान वितरित करण्यात येत असते. यावेळी मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती योजनेतून लाभार्थींना प्रातिनिधिक स्वरूपात ४ पिंक व्हॅनचे चावी देऊन वितरण केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार व खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून घ्यावे राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कार्यक्रमाअंतर्गत ४ कोटींचे अनुदान उपलब्ध झाले यातून वेगवेगळे प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते. मृदा स्वास्थ्य कार्ड योजनेच्या माध्यमातून शेतीचा पोत सुधारण्यासाठी मातीचे परीक्षण केले जाते. ३६ हजार ५६९ कार्डचे वाटप मागील वर्षात झाले असून यावर्षीचा लक्ष्यांक ३८ हजार १५० असून त्यापैकी ३५ हजार ८०० कार्डचे वाटप पूर्ण झाले आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील मातीचे परीक्षण करून जमिनीची उत्पादकता वाढण्याच्या दृष्टीने या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी यावेळी केले.