शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र वाढले मात्र इतर तेलबियांचे क्षेत्र घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:12 IST

खरीप हंगामात जिल्ह्यात भुईमूग, तीळ, खुरसणी, सूर्यफुल, सोयाबीन आदी तेलवर्गीय पिकांची पेरणी केली जाते. वरच्या पावसावरही चांगले उत्पादन येत ...

खरीप हंगामात जिल्ह्यात भुईमूग, तीळ, खुरसणी, सूर्यफुल, सोयाबीन आदी तेलवर्गीय पिकांची पेरणी केली जाते. वरच्या पावसावरही चांगले उत्पादन येत असल्याने आणि भावही चांगला मिळत असल्याने अनेक शेतकरी सोयाबीनला अधिक पसंती देतात. यामुळी बागायतबरोबरच जिरायत क्षेत्रातही सोयाबीनचा पेरा केला जातो. या वर्षी सोयाबीनचे ६१,४४९ हेक्टर इतके क्षेत्र गृहीत धरण्यात आले होते. प्रत्यक्षात ८६,१८४ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. एके काळी जिल्ह्यातील आदिवासी भागात तीळ, खुरसणी, मोहरी आदी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड होत होती. मात्र, आदिवासी भागातील शेतकरीही नगदी पिकांकडे वळू लागल्याने या पिकांचे क्षेत्र घटले आहे. अनेक तालुक्यांत या पिकांचा आता पेराच होत नसल्यचे दिसून येते.

---चौकट ----

पिकनिहाय तेलबियांची पेरणी (हेक्टर)

पीक २०१९ २०२०

सोयाबीन ७३,५३६ ८६,१८४

भुईमूग २६,६१४ २७,३०७

तीळ १६९ १६४

खुरसणी २,९४५ २,७५३

सूर्यफुल ११६ २६

चौकट -

सूर्यफुल जिल्ह्यातून हद्दपार

सूर्यफुलाचा पेरा खूपच कमी झाला असून, या वर्षी एकट्या कळवण तालुक्यात सूर्यफुलाची पेरणी करण्यात आली होती, तर मागील वर्षी कळवण, बागलाण आणि येवला या तालुक्यांतील शेतकऱ्यांनी काही प्रमाणात सूर्यफुलाची लागवड केली होती. दिवसेंदिवस पेरा कमी होऊ लागल्याने जिल्ह्यातून सूर्यफुल हे पीक हद्दपार झाल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे.

---कोट -

जिल्ह्यात तीळ, खुरसणी, सूर्यफुल ही पीक काही मोठ्या प्रमाणात घेतली जात नाहीत. खरीपात सोयाबीन हे मुख्य पीक असल्याने त्याचा पेरा होत असतो. त्यामुळे तेलबियांच्या लागवडीवर खूप मोठ फरक पडलेला नाही.

- संजीवकुमार पडवळ, जिल्हाकृषी अधीक्षक

---कोट----

सोयाबीनला फारसा खर्च लागत नाही, शिवाय योग्य मशागत आणि वेळच्या वेळी पिकाची काळजी घेतली, तर उत्पादनही चांगले मिळते. सोयाबीनला शासनाचा हमीभावही चांगला असून, खुल्या बाजारातही चांगला दर मिळत असल्याने आम्ही दरवर्षी सोयाबीनची पेरणी करत असतो.

- दावल पगारे, शेतकरी