शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

‘उलट स्थलांतरा’च्या प्रश्नावर ग्रामपंचायतींच्या माध्यमातून उत्तर; तातडीने उपाययोजनांची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 06:36 IST

नगर नियोजनतज्ज्ञ सुलक्षणा महाजन यांची शासनाकडून अपेक्षा

नाशिक : कोरोनाच्या संकटामुळे जगण्याची भ्रांत निर्माण झालेल्या आणि हातावरचे पोट असलेल्या हजारो कष्टकरी, कामगारांनी अखेर आपल्याला गावी जाण्याचा, परतीचा मार्ग पत्करला आहे.

अपार कष्टांनी काही जण कसेबसे आपापल्या गावी पोहोचले तर अजूनही अनेक जण मध्येच कुठेतरी अडकून पडले आहेत. शहरांतून खेड्याकडे होत असणाऱ्या या ‘उलट स्थलांतरा’मुळे अनेक बिकट प्रश्नही निर्माण झाले आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी शासकीय आणि प्रशासकीय पातळीवर तातडीनं काही उपाययोजनांची गरज प्रख्यात नगरनियोजनतज्ज्ञ सुलक्षणा महाजन यांनी व्यक्त केली आहे.

ठिकठिकाणच्या ग्रामपंचायतींना सक्षम केले, त्यासाठीचा निधी त्यांना पुरवतानाच काही अधिकारही त्यांना दिले तर शहरांतून खेड्याकडे अचानक वाढलेल्या या स्थलांतराच्या प्रश्नावर तोडगा तर काढता येईलच; पण या संकटाचाही यशस्वीपणे मुकाबला करता येईल, असे सुलक्षणा महाजन यांचे मत आहे. याबाबत काही उपाययोजनाही त्यांनी सुचवल्या आहेत. स्थलांतरित कामगारांच्या प्रश्नासंदर्भात मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत कोकण- १५कोटी, नागपूर- पाच कोटी, पुणे- दहा कोटी, अमरावती- पाच कोटी, औरंगाबाद- पाच कोटी आणि नाशिक जिल्ह्यासाठी पाच कोटी असा निधी मंजूर करण्यात आला आहे.

काय उपाय योजता येतील?

च्जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदांतर्गत ग्रामपंचायतींचे जाळे सक्षम करण्यात यावे. ग्रामपंचायतींच्या खात्यात निधी वर्ग करावा.च्स्थलांतरित कामगारांना क्वॉरंटाईन करण्यासाठी, त्यांच्या कुटुंबियांसाठी हा निधी वापरावा. अशा व्यक्तींसाठी अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा ग्रामपंचायतींना करावा.

च्नव्याने आलेल्या स्थलांतरित कामगारांची संपूर्ण नोंद ग्रामपंचायतींनी ठेवावी. त्यात त्यांचे नाव, संपर्क क्रमांक, वय, ते कुठून आलेत, राहायला घर आणि मूलभूत स्वच्छतेसाठीची सोय.. या सर्व माहितीची नोंद करावी. त्यांच्यासाठीचे अन्नधान्य, औषधे, संभाव्य बाधित ही सर्व आकडेवारी प्रत्येक ग्रामपंचायतीने ठेवावी.

च्ग्रामपंचायतींनी सर्व स्थलांतरितांचे प्रबोधन करतानाच आपापल्या ठिकाणच्या शाळा, समाजमंदिरे, मंदिरे, मशिदी, मोकळ्या जागा त्यांना क्वॉरंटाईन करण्यासाठी वापराव्यात. त्यासाठी तात्पुरता निवारा, अन्नपाणी आणि स्वच्छतेच्या मूलभूत सुविधा पुरवाव्यात. एकही स्थलांतरित निराधार किंवा त्याला हाकलून लावले जाणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.

च्ग्रामपंचायतींना लागणाºया तातडीच्या मदतीबाबत स्वयंसेवी संस्था, परिसरातील श्रीमंत व्यक्ती, डॉक्टर, नर्सेस यांना अवगत करण्यात यावे. गरज पडल्यास ग्रामपंचायतीच्या मदतीसाठी लष्करी-निमलष्करी दले आणि शैक्षणिक संस्थांचे साहाय्य घेण्यात यावे.च्स्थलांतरित कामगारांच्या कुटुंबातील वयस्क सदस्यांना क्वॉरंटाईन करण्याबाबत ग्रामपंचायतींनी सहकार्य करावे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNashikनाशिक