शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

कांदा निर्यात प्रोत्साहन योजना बंद झाल्याने नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 4:17 PM

शेतकऱ्यांमध्ये असंतोष : फेरविचार करण्याची मागणी

ठळक मुद्देपंतप्रधान पदी नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतल्यानंतर १२ दिवसातच कांदा उत्पादक शेतक-यांना झटका

लासलगाव : कांदा घसरणीला ब्रेक लावण्यासाठी केंद्र सरकारने २८ डिसेंबर २०१८ मध्ये कांद्यावरील निर्यात प्रोत्साहन योजना ५ वरु न १० टक्के करण्याचा निर्णय घेतला होता. आता सदर प्रोत्साहन योजनाच बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर निघत आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये कांद्याच्या सरासरी दरामध्ये दोनशे रु पयांची वाढ झालेली असतानाच सरकारने ही योजनाच बंद करुन टाकल्याने शेतक-यांचे नुकसान होणार आहे.लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतक-यांची नाराजी दूर करण्यासाठी कांदा निर्यातीला प्रोत्साहन दिले होते. याचा परिणाम म्हणून देशातून समाधानकारक कांद्याची निर्यात सुरु होती. माजी केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभु यांनी २८ डिसेंबरला अर्थ मंत्रालयाकडून १७९.१६ कोटी रु पयांची मागणी केली होती. अर्थ मंत्रालयाने एमईआयएसच्या अंतर्गत निर्यात प्रोत्साहन ५ टक्क्यांवरून १० टक्क्यांवर करावा अशी मागणी केली होती आणि त्यास मंजुरी देखील मिळाली होती. मात्र निवडणुकीनंतर ३० मे रोजी पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतल्यानंतर १२ दिवसातच कांदा उत्पादक शेतक-यांना झटका देत विदेश व्यापार विभागाचे संचालक आलोक चतुर्वेदी यांनी सदरची योजना थांबवण्यात आल्याची माहिती दिली. हि वार्ता लासलगाव बाजार समितीत येताच शेतक-यांसह व्यापारी आणि बाजार समितीने या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त करत केंद्र सरकारने शेतकरी हितासाठी फेरविचार करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, बुधवारी (दि .१२) लासलगांव बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याची सुमारे १७ हजार क्विंटल आवक आली असून मंगळवारच्या सरासरी बाजार भावाच्या तुलनेत १९० रु पयांची घसरण झाली गुरुवारी (दि.१३) किमान उन्हाळ कांदा भाव ७०० ते १४०५ रुपये व सरासरी १३२० रूपये होते.

टॅग्स :Nashikनाशिकonionकांदा