शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
4
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
5
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
6
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

आंबेडकरी जलशांच्या खंडित परंपरेला पुन्हा नवऊर्जा प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:59 AM

‘उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे’ हे ज्येष्ठ शाहीर वामनदादा कर्डक यांच्या पहाडी आवाजातील गीत असो की अन्य कुणी शाहिरांनी सादर केलेले भीमगीत असो, विशाल प्रबोधन सभेमधील संपूर्ण जनसमुदायाच्या अंगावरील रोमरोम उभे राहत असत अशी जादू या शाहिरी गीतांमध्ये होती. असे आंबेडकरी शाहिरी जलसे म्हणजे समाजप्रबोधनाचे मोठे साधन किंवा माध्यम आहे.

नाशिक : ‘उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे’ हे ज्येष्ठ शाहीर वामनदादा कर्डक यांच्या पहाडी आवाजातील गीत असो की अन्य कुणी शाहिरांनी सादर केलेले भीमगीत असो, विशाल प्रबोधन सभेमधील संपूर्ण जनसमुदायाच्या अंगावरील रोमरोम उभे राहत असत अशी जादू या शाहिरी गीतांमध्ये होती. असे आंबेडकरी शाहिरी जलसे म्हणजे समाजप्रबोधनाचे मोठे साधन किंवा माध्यम आहे.मध्यंत- राच्या काळात या आंबेडकरी शाहिरी जलशांची परंपरा खंडित होत असताना पुन्हा एकदा या कार्याला कार्यशाळा आणि शिबिराच्या माध्यमातून नवऊर्जा प्राप्त होत आहे. तत्कालीन तमाशा सादरीकरणातील अश्लाघ्य भाग कमी करून त्याऐवजी समाजप्रबोधन आणि बुद्धविचार यांना चालना देणारे लोककला प्रकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनानुसार त्यावेळच्या कलाकारांनी रूढ केले, त्यालाच ‘आंबेडकरी जलसा’ असे म्हटले जाते. यासंदर्भात माहिती देताना लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष शरद शेजवळ यांनी सांगितले की, नाशिकमध्ये आंबेडकरी जलशाला फार मोठी परंपरा लाभलेली आहे. भीमराव कर्डक, श्रावण यशवंते, वामनदादा कर्डक, लक्ष्मण केदार असे अनेक थोर शाहीर डॉ. बाबासाहेबांचे विचार आंबेडकरी जलशांमधून मांडत होते. त्यावेळी खुद्द डॉ. बाबासाहेब म्हणाले की, माझी दहा भाषणे आणि माझ्या शाहिराचे एक गाणे बरोबरीचे आहे. साहजिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळात आणि त्यानंतरही आंबेडकरी जलशांना मोठी लोकप्रियता लाभली होती. आंबेडकरी जलशांना सामाजिक प्रबोधनाची परंपरा लाभलेली असल्याने त्यात भगवान गौतम बुद्ध, संत कबीर, महात्मा फुले, संत तुकाराम आदींचे विचार परखडपणे मांडले जात होते.अत्याधुनिक संवाद माध्यमामुळे अलीकडच्या काळात मात्र बाबासाहेबांवरील अनेक गाणी लोकप्रिय झाली आणि आंबेडकरी जलशाची चळवळ काही प्रमाणात मागे पडली होती. परंतु आता पुन्हा एकदा नवयुवकांना आंबेडकरी जलशाचे आकर्षण वाटू लागले आहे, असेही शेजवळ यांनी सांगितले. इतकेच नव्हे तर शाहीर वामनदादा कर्डक प्रतिष्ठानतर्फे ठिकठिकाणी आंबेडकरी जलशासंबंधी कार्यशाळा व शिबिर घेण्यात येत असून, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.नवीन कलावंतांना आकर्षणआंबेडकरी विचारांचा वणवा लोककलांद्वारे समजून घेण्यासाठी आंबेडकरी जलसा हे लोकप्रबोधनाचे अत्यंत लोकप्रिय साधन होते. या जलशांमध्ये पूर्वी ज्येष्ठ कलावंत नागसेन सावदेकर, ज्येष्ठ शाहीर विठ्ठल उमप आदी कलावंत आपली कला सादर करीत असत. हीच परंपरा काही प्रमाणात शाहीर नंदेश उमप, डॉ. गणेश चंदनशिवे, अनिरुद्ध वणकर आदी कलावंतांनी जपली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त दोन वर्षांपूर्वी मुंबई येथे गेटवे आॅफ इंडिया येथे भव्य स्वरूपात आंबेडकरी जलशाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा आंबेडकरी जलशाकडे नवीन कलावंत वळू लागले आहेत.

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती