शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

अखेर नाशिकच्या हरिहर गडावर हौशी पर्यटकांना बंदी; वनविभागाने काढले फर्मान

By अझहर शेख | Updated: July 14, 2022 17:38 IST

चढाईसाठी अत्यंत अवघड श्रेणीतील गड म्हणून हरिहरची ओळख आहे.

नाशिक: त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हर्षवाडी गावाजवळील हरिहर गडावर येत्या रविवारपर्यंत (दि.१७) जाण्यास पश्चिम वनविभागाने बंदी घातली आहे. याबाबतचा आदेश उपवनसंरक्षकांकडून काढण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात होणाऱ्या प्रचंड जोरदार पावसामुळे गडाची वाट निसरडी होऊन धोकादायक बनली आहे. यामुळे पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी हरिहरगडाची निवड करू नये, असे वनविभागाने स्पष्ट केले आहे.

चढाईसाठी अत्यंत अवघड श्रेणीतील गड म्हणून हरिहरची ओळख आहे. पावसाळ्यात या गडावर चढाई करणे अत्यंत धोकादायक ठरते. कातळकोरीव पायऱ्यांवरून पावसाचे धो-धो पाणी वाहत आहे. यामुळे शेवाळ तयार होऊ लागले आहे. यामुळे या पायऱ्या निसरड्या बनल्या आहेत. पायऱ्या खूपच लहान आहेत. त्यामुळे पावसाळ्यात या गडाची वाट बिकट होऊन जाते. परिणामी मोठी दुर्घटनाही गडावर घडू शकते, असे वनविभागाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. यामुळे शक्यतो प्रशिक्षित गिर्यारोहकसुद्धा हरिहरवर जाणे पावसाळ्यात टाळतात. यामुळे सर्वसामान्य तरुणांनी या गडावर जाऊन स्वत:चा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नाशिक शहरापासून ५५ तर त्र्यंबकेश्वरपासून अवघ्या २० ते २२ किलोमीटर अंतरावर हरिहर गड आहे. या गडाचे सौंदर्य पावसाळ्यात अधिकच खुलते. मात्र, गडाची चढाई करण्याचा मोह टाळलेलाच बरा, असे गिरीदुर्गप्रेमी व गिर्यारोहक युगंधर पवार यांनी सांगितले. गडावर न जाता आजूबाजूचा निसर्गाने नटलेला परिसर न्याहाळतानाही नैसर्गिक सुखाची अनुभूती सहजरित्या होते. यामुळे या भागात पर्यटकांनी पावसाळ्यात भेट द्यावी; मात्र हरिहर गडावर जाणे टाळावे, असे गिरीदुर्गप्रेमींसह निसर्गप्रेमींचे म्हणणे आहे.

पर्यटकांच्या रेलचेलीमुळे हर्षवाडी गावातील आदिवासींना हंगामी रोजगारदेखील प्राप्त होतो. या भागात वर्षा सहलीला जाताना पर्यटकांनी परिसरात कुठल्याही प्रकारच्या साउंडसिस्टीमचा वापर करू नये, तसेच स्वच्छतेची काळजी घ्यावी. आपला कचरा आपणच स्वत: पुन्हा सोबत घेऊन जावा. निसर्गात कोठेही अस्वच्छता पसरणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी, असे आवाहन त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्र अधिकारी राजेश पवार यांनी केले आहे.

पावसाचा रेड व ऑरेंज अलर्ट!

नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्याच्या प्रदेशासाठी हवामान खात्याकडून रेड अलर्ट गुरुवारपर्यंत व पुढे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यात मागील तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. येत्या रविवारपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामुळे हरिहर गडावर रविवारपर्यंत जाण्यास बंदी घालण्यात आल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकtourismपर्यटन