शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

अखेर नाशिकच्या हरिहर गडावर हौशी पर्यटकांना बंदी; वनविभागाने काढले फर्मान

By अझहर शेख | Updated: July 14, 2022 17:38 IST

चढाईसाठी अत्यंत अवघड श्रेणीतील गड म्हणून हरिहरची ओळख आहे.

नाशिक: त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हर्षवाडी गावाजवळील हरिहर गडावर येत्या रविवारपर्यंत (दि.१७) जाण्यास पश्चिम वनविभागाने बंदी घातली आहे. याबाबतचा आदेश उपवनसंरक्षकांकडून काढण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात होणाऱ्या प्रचंड जोरदार पावसामुळे गडाची वाट निसरडी होऊन धोकादायक बनली आहे. यामुळे पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी हरिहरगडाची निवड करू नये, असे वनविभागाने स्पष्ट केले आहे.

चढाईसाठी अत्यंत अवघड श्रेणीतील गड म्हणून हरिहरची ओळख आहे. पावसाळ्यात या गडावर चढाई करणे अत्यंत धोकादायक ठरते. कातळकोरीव पायऱ्यांवरून पावसाचे धो-धो पाणी वाहत आहे. यामुळे शेवाळ तयार होऊ लागले आहे. यामुळे या पायऱ्या निसरड्या बनल्या आहेत. पायऱ्या खूपच लहान आहेत. त्यामुळे पावसाळ्यात या गडाची वाट बिकट होऊन जाते. परिणामी मोठी दुर्घटनाही गडावर घडू शकते, असे वनविभागाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. यामुळे शक्यतो प्रशिक्षित गिर्यारोहकसुद्धा हरिहरवर जाणे पावसाळ्यात टाळतात. यामुळे सर्वसामान्य तरुणांनी या गडावर जाऊन स्वत:चा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नाशिक शहरापासून ५५ तर त्र्यंबकेश्वरपासून अवघ्या २० ते २२ किलोमीटर अंतरावर हरिहर गड आहे. या गडाचे सौंदर्य पावसाळ्यात अधिकच खुलते. मात्र, गडाची चढाई करण्याचा मोह टाळलेलाच बरा, असे गिरीदुर्गप्रेमी व गिर्यारोहक युगंधर पवार यांनी सांगितले. गडावर न जाता आजूबाजूचा निसर्गाने नटलेला परिसर न्याहाळतानाही नैसर्गिक सुखाची अनुभूती सहजरित्या होते. यामुळे या भागात पर्यटकांनी पावसाळ्यात भेट द्यावी; मात्र हरिहर गडावर जाणे टाळावे, असे गिरीदुर्गप्रेमींसह निसर्गप्रेमींचे म्हणणे आहे.

पर्यटकांच्या रेलचेलीमुळे हर्षवाडी गावातील आदिवासींना हंगामी रोजगारदेखील प्राप्त होतो. या भागात वर्षा सहलीला जाताना पर्यटकांनी परिसरात कुठल्याही प्रकारच्या साउंडसिस्टीमचा वापर करू नये, तसेच स्वच्छतेची काळजी घ्यावी. आपला कचरा आपणच स्वत: पुन्हा सोबत घेऊन जावा. निसर्गात कोठेही अस्वच्छता पसरणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी, असे आवाहन त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्र अधिकारी राजेश पवार यांनी केले आहे.

पावसाचा रेड व ऑरेंज अलर्ट!

नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्याच्या प्रदेशासाठी हवामान खात्याकडून रेड अलर्ट गुरुवारपर्यंत व पुढे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यात मागील तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. येत्या रविवारपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामुळे हरिहर गडावर रविवारपर्यंत जाण्यास बंदी घालण्यात आल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकtourismपर्यटन