शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अखेर नाशिकच्या हरिहर गडावर हौशी पर्यटकांना बंदी; वनविभागाने काढले फर्मान

By अझहर शेख | Updated: July 14, 2022 17:38 IST

चढाईसाठी अत्यंत अवघड श्रेणीतील गड म्हणून हरिहरची ओळख आहे.

नाशिक: त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हर्षवाडी गावाजवळील हरिहर गडावर येत्या रविवारपर्यंत (दि.१७) जाण्यास पश्चिम वनविभागाने बंदी घातली आहे. याबाबतचा आदेश उपवनसंरक्षकांकडून काढण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात होणाऱ्या प्रचंड जोरदार पावसामुळे गडाची वाट निसरडी होऊन धोकादायक बनली आहे. यामुळे पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी हरिहरगडाची निवड करू नये, असे वनविभागाने स्पष्ट केले आहे.

चढाईसाठी अत्यंत अवघड श्रेणीतील गड म्हणून हरिहरची ओळख आहे. पावसाळ्यात या गडावर चढाई करणे अत्यंत धोकादायक ठरते. कातळकोरीव पायऱ्यांवरून पावसाचे धो-धो पाणी वाहत आहे. यामुळे शेवाळ तयार होऊ लागले आहे. यामुळे या पायऱ्या निसरड्या बनल्या आहेत. पायऱ्या खूपच लहान आहेत. त्यामुळे पावसाळ्यात या गडाची वाट बिकट होऊन जाते. परिणामी मोठी दुर्घटनाही गडावर घडू शकते, असे वनविभागाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. यामुळे शक्यतो प्रशिक्षित गिर्यारोहकसुद्धा हरिहरवर जाणे पावसाळ्यात टाळतात. यामुळे सर्वसामान्य तरुणांनी या गडावर जाऊन स्वत:चा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नाशिक शहरापासून ५५ तर त्र्यंबकेश्वरपासून अवघ्या २० ते २२ किलोमीटर अंतरावर हरिहर गड आहे. या गडाचे सौंदर्य पावसाळ्यात अधिकच खुलते. मात्र, गडाची चढाई करण्याचा मोह टाळलेलाच बरा, असे गिरीदुर्गप्रेमी व गिर्यारोहक युगंधर पवार यांनी सांगितले. गडावर न जाता आजूबाजूचा निसर्गाने नटलेला परिसर न्याहाळतानाही नैसर्गिक सुखाची अनुभूती सहजरित्या होते. यामुळे या भागात पर्यटकांनी पावसाळ्यात भेट द्यावी; मात्र हरिहर गडावर जाणे टाळावे, असे गिरीदुर्गप्रेमींसह निसर्गप्रेमींचे म्हणणे आहे.

पर्यटकांच्या रेलचेलीमुळे हर्षवाडी गावातील आदिवासींना हंगामी रोजगारदेखील प्राप्त होतो. या भागात वर्षा सहलीला जाताना पर्यटकांनी परिसरात कुठल्याही प्रकारच्या साउंडसिस्टीमचा वापर करू नये, तसेच स्वच्छतेची काळजी घ्यावी. आपला कचरा आपणच स्वत: पुन्हा सोबत घेऊन जावा. निसर्गात कोठेही अस्वच्छता पसरणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी, असे आवाहन त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्र अधिकारी राजेश पवार यांनी केले आहे.

पावसाचा रेड व ऑरेंज अलर्ट!

नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्याच्या प्रदेशासाठी हवामान खात्याकडून रेड अलर्ट गुरुवारपर्यंत व पुढे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यात मागील तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. येत्या रविवारपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामुळे हरिहर गडावर रविवारपर्यंत जाण्यास बंदी घालण्यात आल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकtourismपर्यटन