शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

कोरोनाविरोधात आपण सारे प्रतिपक्ष !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 14:18 IST

कोरोनाशी मुकाबला ही केवळ शासनाची किंवा महानगरपालिकेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाने त्यात योगदान देणे आवश्यक आहे. कोरोनाशी यशस्वी लढा द्यायचा असेल तर सर्व गटतट, पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे झुंजावे लागेल. एकप्रकारे कोरोनाविरोधात आपण सारे जण प्रतिपक्ष असाच हा सामना करावा लागणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

ठळक मुद्देप्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ २० मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅनचा शुभारंभ

नाशिक : कोरोनाशी मुकाबला ही केवळ शासनाची किंवा महानगरपालिकेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाने त्यात योगदान देणे आवश्यक आहे. कोरोनाशी यशस्वी लढा द्यायचा असेल तर सर्व गटतट, पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे झुंजावे लागेल. एकप्रकारे कोरोनाविरोधात आपण सारे जण प्रतिपक्ष असाच हा सामना करावा लागणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.मिशन झीरो नाशिक या महत्वाकांक्षी आणि एकात्मिक कृती योजनेला भारतीय जैन संघटना व नाशिक महानगरपालिकेच्या सहकार्याने मंगळवारपासून (दि. २१) प्रारंभ करण्यात आला. त्याअंतर्गत कोरोनाविरु ध्दच्या लढाईत यशस्वी मुकाबला करण्यासाठी २० मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅनचा शुभारंभ भालेकर मैदानावर पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. त्याआधी महाकवी कालीदास कलामंदिरात झालेल्या शुभारंभाच्या सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर खासदार डॉ. भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, महापौर सतीश कुलकर्णी, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, भारतीय जैन संघटनेचे प्रमुख शांतीलाल मुथा, जगदीश पाटील, सतीश सोनवणे, प्राचार्य प्रशांत पाटील, नंदकिशोर सांखला, चेतन बोरा, गिरीश पालवे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना पालकमंत्री भुजबळ यांनी जोपर्यंत कोरोनावर प्रभावी लस किंवा हमखास गुणकारी ठरु शकणारे औषध सापडत नाही, तोपर्यंत कोरोनाशी लढा सुरु ठेवावा लागणार असल्याचे सांगितले. कोरोनाला घाबरुन चालणार नसून सर्व अत्याधुनिक साधनसामग्रीचा उपयोग करुन अधिकाधिक चांगल्या प्रकारची सेवा द्यावी लागणार आहे. अनेकांना सेवा मिळाली मात्र काही मोजक्याच लोकांना सेवा मिळाली नाही, बेड मिळाला नाही तर यंत्रणेला नावे ठेवणे साहजिक आहे. त्यामुळे कुणालाच नावे ठेवण्याची संधी मिळू देऊ नका, असेदेखील भुजबळ यांनी सांगितले.त्याआधी महापौर सतीश कुलकर्णी यांनी मिशन झीरोसाठी योगदान देणारी भारतीय जैन संघटना तसेच अन्य सर्व सामाजिक संघटनांच्या योगदानाबद्दल त्यांचे कौतुक करुन आभार मानले.आपण सर्वांनी कोरोनाबाबतचे नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक असल्याचे सांगितले. तर भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा यांनी कोरोनाची भीती संपुष्टात आणणे आवश्यक असल्याचे सांगितले. ज्याच्या मनात कोरोनाची भीती असते, तोच कोरोनाला बळी पडतो. त्यामुळे सर्वांची मने जोडतानाच नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नंदकिशोर सांखला यांनी तर आभार दीपक चोपडा यांनी मानले.

---

भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलाल मुथा म्हणाले की, जैन संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात ४९ ठिकाणी फिरत्या रुग्णालयाच्या माध्यमातून तपासणी मोहीम राबविण्यात येत असून अद्याप पर्यंत १६ लाख रुग्णाची तपासणी करण्यात आली आहे. लॉकडाऊन संपल्यांनातर कोरोना रुग्णाची संख्या वाढत असल्याने ‘मिशन झिरो’ ही संकल्पना तयार करून काम करण्यात येत आहे. आता कोरोनसह आपल्याला जगायचं यासाठी तशी मानसिकता तयार करून उपाययोजना करायला हव्या यासाठी विविध सामाजिक संघटनांनी पुढे यायला हवे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या