शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

अंतराच्या मुद्द्यावरून बाद अर्ज दोन दिवसांनी वैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 1:30 AM

आरटीई अंतर्गत प्रवेश मिळविण्यासाठी काही पालकांनी अर्ज करताना खोटा पत्ता व चुकीचे अंतर नमूद केली होती. या चुकीच्या माहितीच्या आधारावर पहिल्या यादीत निवड झालेल्या अर्जांवर निवड न झालेल्या पालकांनी आक्षेप घेतला होता.

नाशिक : आरटीई अंतर्गत प्रवेश मिळविण्यासाठी काही पालकांनी अर्ज करताना खोटा पत्ता व चुकीचे अंतर नमूद केली होती. या चुकीच्या माहितीच्या आधारावर पहिल्या यादीत निवड झालेल्या अर्जांवर निवड न झालेल्या पालकांनी आक्षेप घेतला होता. याप्रकरणी गुरुगोविंदसिंग शाळेतील पडताळणी केंद्रावर पडताळणी समितीने दोन दिवसांपूर्वी नाकारलेला अर्ज पुन्हा वैध ठरविल्याचा आरोप महापालिक ा शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकाऱ्यांकडे करण्यात आली.आरटीई अंतर्गत आपल्या पाल्यास प्रवेश मिळावा, यासाठी काही पालकांनी प्रवेश अर्जात खोटे पत्ते तसेच खोटे अंतर नमूद केल्याचे निदर्शनास आले आहे. विशिष्ट शाळेतच प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या घराचे प्रत्यक्षातील अंतर आणि अर्जावरील अंतर यात फरक दिसून आला आहे. पहिल्या सोडतीतून वंचित राहिलेल्या पालकांनी हा मुद्दा उपस्थित करत मनपा शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी उदय देवरे यांच्याकडे दाद मागितली होती. त्यावर देवरे यांनी लक्ष घालण्याच्या सूचना संबंधितांना केल्या होत्या. त्यानंतर बाद करण्यात आलेला अर्ज मंगळवारी (दि. १६) रोजी पडताळणी समितीने पुन्हा वैध ठरविल्याने काही पालकांनी याप्रक्रियेविषयी शंका उपस्थित केली आहे. याप्रकरणी तक्रार निवारण समितीने कार्यवाही करावी, यासाठी प्रशानाधिकारी उदय देवरे यांना निवेदन देण्यात आले आहे. दरम्यान, आरटीई अंतर्गत नाशिक शहरातील ९२ शाळांमध्ये पहिलीसाठी एक हजार ८२१, तर नर्सरीसाठी दोन शाळांमध्ये ३९ जागा आहेत. त्यापैकी पहिल्या लॉटरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना अर्ज पडताळणीसाठी शहरात के. एन. केला शाळा, गुरुगोविंद सिंग शाळा, होरायझन अकॅडमी, सरस्वतीनगर येथील के. के. वाघ शाळा असे चार केंद्र सुरू करण्यात आले आहेत.मंगळवारी १५८ प्रवेशआरटीई प्रवेशप्रक्रियेत पालकांकडून आक्षेप घेतले जात असताना दुसरीकडे प्रवेशप्रक्रिया सुरू असून, मंगळवारी शहरातील विविध शाळांमध्ये सुमारे १५८ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहे, तर शहरातील ९२ शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या एक हजार ८६० जागांपैकी आतापर्यंत ५२२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळा