शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

येवला-मनमाड मार्गावर भीषण अपघात,6 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 11:20 IST

येवला-मनमाड मार्गावर भीषण अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या दुर्घटनेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.  

ठळक मुद्देएकाच कुटुंबातील 6 जणांचा जागीच मृत्यूअर्टिगा आणि आयशर ट्रकची समोरासमोर धडक, कारचा चुराडाजेसीबीच्या मदतीनं अपघातग्रस्त गाड्या केल्या वेगळ्या, मृतदेह काढले बाहेर

नाशिक - येवला-मनमाड मार्गावर भीषण अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. बुधवारी (21  नोव्हेंबर) पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास झालेल्या या दुर्घटनेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 3 महिला, 2 पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. मृत्युमुखी पडलेले सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे. अर्टिगा आणि आयशर या दोन गाड्यांची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला आहे. अर्टिगामधील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. अनकाई बारी जवळील ही दुर्घटना आहे.  हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये अर्टिगा कारचा अक्षरशः चुराडा झाला. शिवाय, मृतदेह बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत घेऊन अपघातग्रस्त गाड्या वेगळ्या करण्यात आल्या. मृत्युमुखी पडलेले सर्व जण अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील रहिवासी होते.

कोपरगाव शहरातील बाबा पान स्टॉलचे मालक हे बाबा अनाड नावाने प्रसिद्ध आहेत. या दुर्घटनेत त्यांची पत्नी, मुलगा, सून, मुलगी आणि नातू  या सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. इंदुर(मध्य प्रदेश) हून माघारी येत असताना हा अपघात झाला.

मृतांची नावे

बाळासाहेब मुरलीधर अनाड ( वय 60 वर्ष)इंदूबाई बाळासाहेब अनाड ( वय 55 वर्ष)श्रीनाथ बाळासाहेब अनाड ( वय 25  वर्ष)मोहिनी गणेश खांदवे (वय 35 वर्ष, तेलीखुंट,नगर)हरी गणेश खांदवे ( वय 5 वर्ष )भीमाबाई बापू रोकले ( वय 70 वर्ष)

आयशर गाडी मनमाडच्या दिशेनं जात होती, तर अर्टिगा कार ही येवल्याच्या दिशेने जात प्रवास करत होती. यादरम्यान, दोन्ही गाड्या येवला-मनमाड मार्गावर समोरासमोर धडकल्या आणि भीषण अपघात झाला. अपघाताचे वृत्त कळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. 

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिक