शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

जिल्ह्यातील धरणांमध्ये जेमतेम १० टक्के पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 01:33 IST

नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून उष्णतेच्या पाऱ्याने चाळिशी ओलांडल्याने जिल्ह्णातील ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, विहिरींनी तळ ...

नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून उष्णतेच्या पाऱ्याने चाळिशी ओलांडल्याने जिल्ह्णातील ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, विहिरींनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवणभटकावे लागत आहे. मे महिन्याच्या तिसºया आठवड्यात जिल्ह्यातील धरणांमध्ये जेमतेम १० टक्केच साठा शिल्लक राहिला असून, हवामान खात्याने मान्सून लांबणीवर पडण्याचे संकेत दिल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जलसंकट उभे ठाकले आहे. मराठवाडा, नगर जिल्ह्णासह नाशिक जिल्ह्णातील पाणीपुरवठा योजना, औद्योगिक वसाहत, रेल्वे यांसह सिंचनासाठी पाणी राखून ठेवण्यात आले. तथापि, यंदा धरणांमध्येच जेमतेम ७२ टक्के जलसाठा असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी कपातीचा निर्णय घ्यावा लागला होता. अशातच फेब्रुवारी महिन्यापासून उन्हाचा कडाका वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात धरणाच्या पाण्याचे बाष्पिभवन होऊ लागले, त्यातच मार्च ते मे महिन्याच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने धरणातून पाणी सोडावे लागल्याने मे महिन्याच्या तिसºया आठवड्यापर्यंत जिल्ह्णातील धरणांमध्ये सरासरी १० टक्केच जलसाठा शिल्लक राहिला आहे. त्यातही आळंदी, पुणेगाव, भावली, वालदेवी, कडवा, भोजापूर, केळझर, नागासाक्या, माणिकपुंज ही नऊ धरणे कोरडीठाक पडली आहेत.नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणात सर्वाधिक म्हणजे २४ टक्के साठा असून, त्या खालोखाल चणकापूरमध्ये १९ टक्के, करंजवणला १७, पालखेडला १३, दारणा, गिरणा धरणात दहा टक्के साठा आहे. गंगापूर धरण समूहात १६ टक्के, पालखे ड समूहात १२ टक्के, दारणा समूहात ६ टक्के, गिरणा खोºयात १० टक्के पाणी साठा शिल्लक आहे.पाण्याची काटकसरयंदा कडाक्याच्या उन्हामुळे पिण्याच्या पाण्याची मागणी वाढली असून, ग्रामीण भागात अगोदरपासूनच असलेल्या टंचाईने भीषण स्वरूप प्राप्त झाले आहे. अशातच हवामान खात्याने यंदा मान्सूनचे आगमन लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आल्याने जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. धरणातील उपलब्ध पाणी साठ्याचे काटकसरीने वापर करण्याचे आवाहन व उपाययोजना करण्यात येत आहे.आरक्षण जाहीरगेल्या वर्षी सरासरीपेक्षा फक्त ८२ टक्केच पाऊस झाल्यामुळे धरणांमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध होऊ शकले नाही. विशेषत: सिन्नर, चांदवड, नांदगाव, येवला या तालुक्यांकडे पावसाने वक्रदृष्टी केल्याने भर पावसाळ्यातही या तालुक्यांना पिण्याचे पाणी टॅँकरद्वारे पुरवावे लागले. आॅक्टोबरपासूनच पाणीटंचाई जाणवण्याची चिन्हे दिसू लागत असताना डिसेंबरमध्ये टॅँकरची मागणी सुरू झाली. तत्पूर्वी धरणांतील जलसाठ्याचे पाणी आरक्षण जाहीर झाले.

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणीDamधरण